शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराची आठवण करून देणारी कूर्मद्वादशी!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 23, 2021 18:24 IST

भगवंताच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार हा कूर्मअवतार मानला जातो. या निमित्ताने भगवंताच्या कूर्म अवताराची आठवण, हाही हेतू असेल.

पौष शुक्ल द्वादशीला सुजन्मद्वादशी असे एक नाव आहे. ज्या वर्षी पौष शुक्ल द्वादशीला ज्येष्ठा नक्षत्र येते त्या वर्षी या तीथीला व्रताचा प्रारंभ करावा, असे सांगितले आह़े  पुढे वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल द्वादशीला भगवान विष्णूंची पूजा करावी. व्रतकर्त्याने एकादशीसारखा द्वादशीला उपवास करावा.  दान करावे आणि फलाहार करावा, असे व्रताचे स्वरूप असते. 

पौषामध्ये द्वादशीला ज्येष्ठा नक्षत्र असेल, तेव्हा घृताचे दान अर्थात तुपाचे दान आणि केवळ गोमूत्र प्राशन करून उपवास सांगितला आहे. तर एरव्ही पौष शुक्ल द्वादशीला तांदळाचे दान करून केवळ पाणी पिऊन राहावे, असा नियम आहे. सर्व इच्छांची पूर्ती व्हावी, घराण्यात मान मिळावा, लक्ष्मीचे कृपाछत्र सदैव लाभावे, अशा विविध फुलांच्या लाभासाठी हे व्रत केले जात असे. 

प्रगतीच्या वाटा मर्यादित असलेल्या पूर्वीच्या काळी देव आणि दैव या दोन्हीवर समाजाला अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता संधीची नवनवीन दालने रोज उघडत आहेत. प्रगतीसाठी आवश्यक असे अनुकूल वातावरण साऱ्यांनाच उपलब्ध झालेले आहे. प्रगती करणे, पैसा कमवणे, सुखसोयी प्राप्त करून घेणे सोपे नसले तरीही प्रयत्नाने मात्र सहज शक्य झाले आहे. त्यामुळे माणूस आशा, आकांक्षा आणि कर्तृत्व या तिन्हीच्या सहाय्याने पुढे जाऊ बघतो आहे. म्हणूनच केवळ व्रत वैकल्ये, उपास, नवस अशा कर्मकांडांपासून समाज विचारपूर्वक काहीसा दूर गेला आहे. माणसाच्या मनात श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धेपासून तो स्वत:ला दूर ठेवण्याएवढा विचारी झाला आहे. म्हणून सांप्रतच्या काळात `सुजन्मद्वादशी' सारखी व्रते कालबाह्य होताना दिसतात. त्यातच या व्रतातील दानविधी तसेच स्वत: व्रतकर्त्याने सेवन करावयाचे पदार्थ हेदेखील आजच्या काळात कोणाला शारीरिक दृष्ट्या पेलवणारे नाही. उदा तूपाचे दान सर्वांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.  तसेच गोमूत्र पिऊन संपूर्ण दिवस उपास करणे हेही शक्य नाही. 

पौष शुक्ल द्वादशीला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे कूर्मद्वादशी. नारायणासाठी घृत भरलेला कलश, एक कासवाची आणि एक मंदारपर्वताची अशा दोन मूर्तींसह दान देण्याचा विधी या तिथीला सांगितला आहे.

भगवंताच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार हा कूर्मअवतार मानला जातो. इतर अवतारांमध्ये कोणत्या न कोणत्या दैत्याच्या संहारासाठी भगवंतांनी अवतार घेतल्याच्या कथा आहेत. मात्र कूर्मावताराचे कारण वेगळे आहे. भागवत  पुराणानुसार समुद्रमंथनाच्यावेळी मंदारपर्वत पाताळात गेला त्यावेळ भगवंतांनी कूर्मरूप घेऊन त्याला वर उचलून आपल्या पाठीवर घेतले. नंतर कूर्मरुपातील भगवंत क्षीरसागरात शयन करते झाले.

या कथेचा संदर्भ लक्षात घेऊन कूर्मद्वादशीचे व्रत योजले असावे. या निमित्ताने भगवंताच्या कूर्मअवताराची आठवण, हाही हेतू असेल. एकादशीप्रमाणे द्वादशी देखील विष्णूंची प्रिय तिथी मानली जाते. ज्यांना शक्य आहे. त्यांनी निदान पितळ्याचे वा लाकडाचे सुंदर कासव आपल्या स्नेह्याला या दिवसाची आठवण म्हणून द्यावे. किंवा भगवान महाविष्णूंचे स्मरण करावे.