शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराची आठवण करून देणारी कूर्मद्वादशी!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 23, 2021 18:24 IST

भगवंताच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार हा कूर्मअवतार मानला जातो. या निमित्ताने भगवंताच्या कूर्म अवताराची आठवण, हाही हेतू असेल.

पौष शुक्ल द्वादशीला सुजन्मद्वादशी असे एक नाव आहे. ज्या वर्षी पौष शुक्ल द्वादशीला ज्येष्ठा नक्षत्र येते त्या वर्षी या तीथीला व्रताचा प्रारंभ करावा, असे सांगितले आह़े  पुढे वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल द्वादशीला भगवान विष्णूंची पूजा करावी. व्रतकर्त्याने एकादशीसारखा द्वादशीला उपवास करावा.  दान करावे आणि फलाहार करावा, असे व्रताचे स्वरूप असते. 

पौषामध्ये द्वादशीला ज्येष्ठा नक्षत्र असेल, तेव्हा घृताचे दान अर्थात तुपाचे दान आणि केवळ गोमूत्र प्राशन करून उपवास सांगितला आहे. तर एरव्ही पौष शुक्ल द्वादशीला तांदळाचे दान करून केवळ पाणी पिऊन राहावे, असा नियम आहे. सर्व इच्छांची पूर्ती व्हावी, घराण्यात मान मिळावा, लक्ष्मीचे कृपाछत्र सदैव लाभावे, अशा विविध फुलांच्या लाभासाठी हे व्रत केले जात असे. 

प्रगतीच्या वाटा मर्यादित असलेल्या पूर्वीच्या काळी देव आणि दैव या दोन्हीवर समाजाला अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता संधीची नवनवीन दालने रोज उघडत आहेत. प्रगतीसाठी आवश्यक असे अनुकूल वातावरण साऱ्यांनाच उपलब्ध झालेले आहे. प्रगती करणे, पैसा कमवणे, सुखसोयी प्राप्त करून घेणे सोपे नसले तरीही प्रयत्नाने मात्र सहज शक्य झाले आहे. त्यामुळे माणूस आशा, आकांक्षा आणि कर्तृत्व या तिन्हीच्या सहाय्याने पुढे जाऊ बघतो आहे. म्हणूनच केवळ व्रत वैकल्ये, उपास, नवस अशा कर्मकांडांपासून समाज विचारपूर्वक काहीसा दूर गेला आहे. माणसाच्या मनात श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धेपासून तो स्वत:ला दूर ठेवण्याएवढा विचारी झाला आहे. म्हणून सांप्रतच्या काळात `सुजन्मद्वादशी' सारखी व्रते कालबाह्य होताना दिसतात. त्यातच या व्रतातील दानविधी तसेच स्वत: व्रतकर्त्याने सेवन करावयाचे पदार्थ हेदेखील आजच्या काळात कोणाला शारीरिक दृष्ट्या पेलवणारे नाही. उदा तूपाचे दान सर्वांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.  तसेच गोमूत्र पिऊन संपूर्ण दिवस उपास करणे हेही शक्य नाही. 

पौष शुक्ल द्वादशीला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे कूर्मद्वादशी. नारायणासाठी घृत भरलेला कलश, एक कासवाची आणि एक मंदारपर्वताची अशा दोन मूर्तींसह दान देण्याचा विधी या तिथीला सांगितला आहे.

भगवंताच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार हा कूर्मअवतार मानला जातो. इतर अवतारांमध्ये कोणत्या न कोणत्या दैत्याच्या संहारासाठी भगवंतांनी अवतार घेतल्याच्या कथा आहेत. मात्र कूर्मावताराचे कारण वेगळे आहे. भागवत  पुराणानुसार समुद्रमंथनाच्यावेळी मंदारपर्वत पाताळात गेला त्यावेळ भगवंतांनी कूर्मरूप घेऊन त्याला वर उचलून आपल्या पाठीवर घेतले. नंतर कूर्मरुपातील भगवंत क्षीरसागरात शयन करते झाले.

या कथेचा संदर्भ लक्षात घेऊन कूर्मद्वादशीचे व्रत योजले असावे. या निमित्ताने भगवंताच्या कूर्मअवताराची आठवण, हाही हेतू असेल. एकादशीप्रमाणे द्वादशी देखील विष्णूंची प्रिय तिथी मानली जाते. ज्यांना शक्य आहे. त्यांनी निदान पितळ्याचे वा लाकडाचे सुंदर कासव आपल्या स्नेह्याला या दिवसाची आठवण म्हणून द्यावे. किंवा भगवान महाविष्णूंचे स्मरण करावे.