शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाभारताच्या युद्धांनंतर शांतीयज्ञ होणे गरजेचेच होते, अन्यथा...!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 18, 2021 12:12 IST

नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर नेते.

संसाराकडे, जीवनाकडे कर्मभोग म्हणून पाहणारी अर्थातच स्वहिताकडे लहानपणापासून लक्ष ठेवून असणारी महामाता कुंती, भगवान श्रीकृष्णांना एकदा म्हणाली, 'भगवान कृष्ण, हा अहंकार आत्मोन्नतीसाठी घातक ठरतो. याला बाजूला सारण्याचा हुकुमी उपाय म्हणजे तुझे सतत नामस्मरण माझ्या मनाला हे वारंवार बजावीत असतानाही हे नाठाळ मन या अहंकाराच्या आहारी जाऊन कधीकधी मला तुझे विस्मरण होण्यास भाग पाडते. म्हणून भगवंता, तुझ्याजवळ एकच मागणे आहे, ते म्हणजे जगातील दु:खे आशीर्वाद म्हणून माझ्या पदरी टाक, जेणे करून 'भगवंता सोडव' त्यापलीकडे माझ्या मुखातून काहीही येणार नाही.'

महाभारत युद्धानंतर झालेली जीवितहानी पाहून पांडवांचे मन विषण्ण झाले. दोन कुटुंबांच्या वादात, अहंकारात अकारण निष्पाप जीवांचा बळी गेला. विजय मिळूनही त्याचा आनंद उपभोगावा अशी परिस्थिती नव्हती. आपल्या हातून घडलेल्या पातकाची टोचणी त्यांना अस्वस्थ करत होती. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना एक यज्ञ करावयास सांगितला व त्याच्या मुख्य अधिकारपदासाठी जगातील घडामोडींचा संपर्कही नसलेल्या आणि निर्जन ठिकाणी आश्रम स्थापून राहिलेल्या वकदालभ्य मुनींना बोलवा, अशी आज्ञा केली. 

अनुक्रमे पाच पांडव त्यांना बोलवण्यास गेले. परंतु त्यांनी येण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे एकच! शंभर यज्ञ झाले असतील तरच त्या ठिकाणी मी जातो. अर्जुनाने तर महाभारत युद्धाचा विषय काढताच वीज कडाडावी तसे ते ओरडले, 'कसले युद्ध? आम्हाला असली भाषाच माहीत नाही. हा शांतिआश्रम आहे, चल नीघ इथून!' शेवटी कुंतिमातेने द्रौपदीच्या कानामध्ये काही सांगितले. शेवटचा उपाय म्हणून द्रौपदी त्यांना बोलवण्यास गेली. 

अहंकाररहित नम्र अशी ती पांचाली आश्रमात पोहोचताच त्यांना म्हणाली, 'मुनिवर्य, आपली शिष्या पांचाली आपणास अभिवादन करीत आहे. पांडवपत्नी द्रौपदी, आपण शांतियज्ञाला यावे अशी विनंती करत आहे. प्रत्येक जीवात्म्याला शांतता मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून शांतीयज्ञाचे आयोजन करत आहोत. अन्यथा गत जीवात्म्यांना मुक्ती मिळणार नाही. आजवर पांडवांनी धर्माला अनुसरूनच प्रत्येक कार्य केले आणि ते कार्य श्रीकृष्णाला समर्पित केले.  मुनिराज, लहानपणापासून महामाता कुंतीदेवींनी स्वत:ला व पांडवांना प्रत्येक कर्म भगवान स्मरणात करण्याची सवय लावून घेतली आहे. इतकेच नव्हे, तर आपणापुढे उभा असलेला हा नश्वर देहसुद्धा सतत नामचिंतन करीत असतो आणि मुनिवर्य, 'नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली' हे तर आपलेच वचन. यामुळे महामाता कुंतीच्या व त्यांच्या पुत्रसुनेच्या यज्ञांची संख्या कशी मोजणार?' एवढ्या संभाषणात 'मी' चा चुकूनसुद्धा उच्चार न झालेल्या व असंख्यात यज्ञ झाल्याची खात्री देणाऱ्या द्रौपदीला हसून मुनींनी होकार दिला.

पांचालीच्या नम्र आचरणाने आणि मधुर संभाषणाने शांतियज्ञ व्यवस्थितरित्या पार पडला. सर्व जीवात्म्यांना सदगती मिळाली. पांचालीच्या पुढाकाराने हे साध्य झाले. तिच्या ठायी एवढी विनम्रता आली, ती नामस्मरणामुळे आणि भगवंत भक्तीमुळे!  नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर नेते. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये लिहितात, 

रघुनायकावीण वाया शिणावे,जनासारिखे व्यर्थ का वोसणावे,सदा सर्वदा नाम वाचे वसो दे,अहंता मनी पापिणी ते नसो दे ।।श्रीराम।।