शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 27, 2020 07:30 IST

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत.

ज्योत्स्ना गाडगीळ

हिंदू धर्मातील सगळे देव तंदुरुस्त असताना, एकटा गणपती बाप्पा तुंदिल तनू का? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे कारण म्हणजे, आपण सगळे रोज त्याच्याकडे करत असलेली प्रार्थना...!

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे,अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

आपल्याला एखादे काम करून घ्यायचे असेल, तर आपण आपल्या लाडक्या व्यक्तीला गळ घालतो. गणपती बाप्पा हे तर सर्वांचेच लाडके दैवत! मग सुख असो, दु:ख असो, तक्रार असो नाहीतर अपराध असो, आपण आपले गाऱ्हाणे त्यालाच जाऊन सांगतो. तोही बिचारा सुपाएवढे कान पसरून भक्तांचे सगळे बोलणे निमुटपणे ऐकून घेतो. एवढा ताण सहन करूनही त्याचा चेहरा कधीच तणावग्रस्त दिसत नाही. याचे कारण, सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना फोलकटे फेकून देते आणि चांगले धान्य जवळ ठेवते, तसेच बाप्पासुद्धा बरे-वाईट सगळे ऐकून घेतो आणि चांगल्या गोष्टी जवळ ठेवून वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. पण तो एक `गुड लिसनर' अर्थात `उत्तम श्रोता' असल्यामुळे आपण सगळे काही त्यालाच जाऊन सांगतो. इथवर ठीक आहे. 

हेही वाचा : गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा!

परंतु, आपली चूक कबुल करताना आपण त्याला घातलेली अट महाभयंकर आहे, `देवा, तू आमचा पालक आहेस. आम्ही तुझे बालक आहोत. आई जशी आपल्या मुलांच्या चुका पदरात घेते, तसे तू देखील आमचे कोट्यानु कोटी अन्याय पोटात घे.' बाप्पा तथास्तु म्हणतो आणि सगळ्या गोष्टी पोटात दडवून ठेवतो. 

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, `राम म्हणता राम होईजे...' आपण ज्या दैवताची उपासना करतो, त्याचे गुण आपण आपल्या अंगी बाणले पाहिजेत. केवळ बाप्पाला मोदक आवडतात, म्हणून आपणही चवीने मोदक खायचे, हा एकमेव गुण घ्यायचा नाही. तर, बाप्पासारखे आपल्यालाही उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम लढवय्या आणि जिज्ञासू विद्यार्थी होता आले पाहिजे. 

आपल्याला कोणी काही सांगत असेल, तर ते शांतपणे ऐकून घेता आले पाहिजे. ऐकलेल्या गोष्टी डोक्यात न साठवता, पोटात साठवल्या पाहिजेत. अर्थात त्या गुपित ठेवता आल्या पाहिजेत. देवाचे सूपासारखे कान त्याचे डोक शांत ठेवतात, तसे आपणही आपल्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर फार विचार करत न बसता, अनावश्यक गोष्टी डोक्यातून डिलीट करून चित्त स्थिर ठेवले पाहिजे. बाप्पाचे बारीक डोळे, दूरदृष्टीचे सूचक आहेत. आपल्यालाही दैनंदिन जीवनात आगामी संधी, संकटे यांचा अंदाज घेता आला पाहिजे. बाप्पाला आपल्या सोंडेने चांगल्या-वाईट गोष्टी हुंगूनही ओळखता येतात. त्याप्रमाणे आपल्यालाही परिस्थितीचा ओळखता आली पाहिजे. तो मंगलमूर्ती आहे. त्याला पाहून इतरांना जसा आनंद होतो, तसा आपल्याला पाहून लोकांना आनंद वाटला पाहिजे. आपले अनंत अपराध पोटात घेऊन बाप्पा तुंदिलतनू झाला, तरी युद्धात त्याला कोणीही हरवू शकले नाही. कारण, त्याने कधी युक्तीने तर कधी शक्तीने शत्रूचा पराभव केला. त्याच्याप्रमाणे आपणही शत्रूसमोर केवळ शक्तीप्रदर्शन न करता, स्थलकालानुरूप लढाई जिंकली पाहिजे. त्यासाठी बाप्पा जसा पाशांकुशधारी आहे, तसा आपल्यालाही हाताशी मिळेल त्या साधनाचा प्रसंगी शस्त्राप्रमाणे वापर करून आपला आणि इतरांचा बचाव करता आला पाहिजे. उंदरासारख्या कुरतडणाऱ्या काळ्या कभिन्न वृत्तीवर स्वार होता आले पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन नेतृत्त्व निभावता आले पाहिजे. 

या सगळ्या गोष्टी आत्मसात करता आल्या, तरच आपण बाप्पाचे भक्त म्हणवून घेऊ शकू . मग बाप्पाही न सांगता आपले अनंत अपराध पोटात घेईल आणि मोबदल्यात मोदकाचा गोड गोड प्रसाद देईल. 

गणपती बाप्पा मोऽऽऽरया!

हेही वाचा : लक्ष्मी तुमच्या हाती, म्हणा 'कराग्रे वसते लक्ष्मी:'

टॅग्स :ganpatiगणपती