शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 27, 2020 07:30 IST

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत.

ज्योत्स्ना गाडगीळ

हिंदू धर्मातील सगळे देव तंदुरुस्त असताना, एकटा गणपती बाप्पा तुंदिल तनू का? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे कारण म्हणजे, आपण सगळे रोज त्याच्याकडे करत असलेली प्रार्थना...!

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे,अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

आपल्याला एखादे काम करून घ्यायचे असेल, तर आपण आपल्या लाडक्या व्यक्तीला गळ घालतो. गणपती बाप्पा हे तर सर्वांचेच लाडके दैवत! मग सुख असो, दु:ख असो, तक्रार असो नाहीतर अपराध असो, आपण आपले गाऱ्हाणे त्यालाच जाऊन सांगतो. तोही बिचारा सुपाएवढे कान पसरून भक्तांचे सगळे बोलणे निमुटपणे ऐकून घेतो. एवढा ताण सहन करूनही त्याचा चेहरा कधीच तणावग्रस्त दिसत नाही. याचे कारण, सूप ज्याप्रमाणे धान्य पाखडताना फोलकटे फेकून देते आणि चांगले धान्य जवळ ठेवते, तसेच बाप्पासुद्धा बरे-वाईट सगळे ऐकून घेतो आणि चांगल्या गोष्टी जवळ ठेवून वाईट गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. पण तो एक `गुड लिसनर' अर्थात `उत्तम श्रोता' असल्यामुळे आपण सगळे काही त्यालाच जाऊन सांगतो. इथवर ठीक आहे. 

हेही वाचा : गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा!

परंतु, आपली चूक कबुल करताना आपण त्याला घातलेली अट महाभयंकर आहे, `देवा, तू आमचा पालक आहेस. आम्ही तुझे बालक आहोत. आई जशी आपल्या मुलांच्या चुका पदरात घेते, तसे तू देखील आमचे कोट्यानु कोटी अन्याय पोटात घे.' बाप्पा तथास्तु म्हणतो आणि सगळ्या गोष्टी पोटात दडवून ठेवतो. 

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामी सांगतात, `राम म्हणता राम होईजे...' आपण ज्या दैवताची उपासना करतो, त्याचे गुण आपण आपल्या अंगी बाणले पाहिजेत. केवळ बाप्पाला मोदक आवडतात, म्हणून आपणही चवीने मोदक खायचे, हा एकमेव गुण घ्यायचा नाही. तर, बाप्पासारखे आपल्यालाही उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम लढवय्या आणि जिज्ञासू विद्यार्थी होता आले पाहिजे. 

आपल्याला कोणी काही सांगत असेल, तर ते शांतपणे ऐकून घेता आले पाहिजे. ऐकलेल्या गोष्टी डोक्यात न साठवता, पोटात साठवल्या पाहिजेत. अर्थात त्या गुपित ठेवता आल्या पाहिजेत. देवाचे सूपासारखे कान त्याचे डोक शांत ठेवतात, तसे आपणही आपल्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर फार विचार करत न बसता, अनावश्यक गोष्टी डोक्यातून डिलीट करून चित्त स्थिर ठेवले पाहिजे. बाप्पाचे बारीक डोळे, दूरदृष्टीचे सूचक आहेत. आपल्यालाही दैनंदिन जीवनात आगामी संधी, संकटे यांचा अंदाज घेता आला पाहिजे. बाप्पाला आपल्या सोंडेने चांगल्या-वाईट गोष्टी हुंगूनही ओळखता येतात. त्याप्रमाणे आपल्यालाही परिस्थितीचा ओळखता आली पाहिजे. तो मंगलमूर्ती आहे. त्याला पाहून इतरांना जसा आनंद होतो, तसा आपल्याला पाहून लोकांना आनंद वाटला पाहिजे. आपले अनंत अपराध पोटात घेऊन बाप्पा तुंदिलतनू झाला, तरी युद्धात त्याला कोणीही हरवू शकले नाही. कारण, त्याने कधी युक्तीने तर कधी शक्तीने शत्रूचा पराभव केला. त्याच्याप्रमाणे आपणही शत्रूसमोर केवळ शक्तीप्रदर्शन न करता, स्थलकालानुरूप लढाई जिंकली पाहिजे. त्यासाठी बाप्पा जसा पाशांकुशधारी आहे, तसा आपल्यालाही हाताशी मिळेल त्या साधनाचा प्रसंगी शस्त्राप्रमाणे वापर करून आपला आणि इतरांचा बचाव करता आला पाहिजे. उंदरासारख्या कुरतडणाऱ्या काळ्या कभिन्न वृत्तीवर स्वार होता आले पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन नेतृत्त्व निभावता आले पाहिजे. 

या सगळ्या गोष्टी आत्मसात करता आल्या, तरच आपण बाप्पाचे भक्त म्हणवून घेऊ शकू . मग बाप्पाही न सांगता आपले अनंत अपराध पोटात घेईल आणि मोबदल्यात मोदकाचा गोड गोड प्रसाद देईल. 

गणपती बाप्पा मोऽऽऽरया!

हेही वाचा : लक्ष्मी तुमच्या हाती, म्हणा 'कराग्रे वसते लक्ष्मी:'

टॅग्स :ganpatiगणपती