शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सूर्यासारखे तेज हवे असेल, तर उद्यापासून सुरू करा अतिशय सोपे 'विवस्वान' व्रत; वाचा सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 13:26 IST

गायत्री मंत्राचा जप केल्याने जप करणाऱ्याला, राष्ट्राला आणि सूर्यनारायणाला एक विशेष तेज प्राप्त होते. म्हणून या निवशी निदान दहा वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करावा.

आषाढ शुक्ल सप्तमी या तिथीला सूर्य विवस्वान म्हणून प्रसिद्ध पावला म्हणून या तिथीला विवस्वान या नावाने गंधाक्षताफुलांनी पूजा करावी व गायत्री मंत्र म्हणावा, त्याचा विशेष फायदा होतो. विवस्वान म्हणजे उगवता सूर्य! सूर्योपासनेला आपल्या धर्मात अतिशय महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या चोवीस सप्तम्यांपैकी प्रत्येक सप्तमीला कोणते तरी सूर्यव्रत सांगितले असते. त्यापैकीच एक आहे विवस्वान व्रत! 

आपल्याला जीवन देणाऱ्या, प्राणवायू, प्रकाश, ऊर्जा देणाऱ्या सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपला धर्म, आपली संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी विविध निमित्ताने आपल्याला देत आली आहे. आपण तिचे पालन केले पाहिजे. 

सध्या पावसाचे दिवस त्यात वीजटंचाईची झळ अनेक ठिकाणी बसत असल्यामुळे आपल्याला विजेचे, ऊर्जेचे महत्त्व विशेषत्त्वाने कळले आहे. प्रकाशाची, ऊर्जेची फार मोठी सुवर्णखाणच या दिनकराने साऱ्याला दिली आहे. `वीज कमीत कमी वापरू. विनाकारण उधळपट्टी करणार नाही. विजेची बचत करू' अशी शपथ सामुहिकरीतीने घेण्यासाठी हा एक सुमूहूर्त आहे.  सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे स्वत: वापरणे आणि इतरांनाही त्यांचा वापर करण्यास उद्युक्त करणे गरजेचे आहे. या दिवशी लोकप्रबोधनाचे हे कार्य 'धर्मकार्य' समजून केले पाहिजे.

गायत्री मंत्राचा जप केल्याने जप करणाऱ्याला, राष्ट्राला आणि सूर्यनारायणाला एक विशेष तेज प्राप्त होते. म्हणून या निवशी निदान दहा वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करावा. या जपाची सवय लावून घेत तो रोज केल्यास उत्तम! लहान मुलांनी, तरुणांनी आणि शक्य असल्यास ज्येष्ठांनीदेखील आपली तब्येत सांभाळून सूर्यनमस्कार घालावेत व तो कायमस्वरूपी नेम करावा.