शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रेमाचा आनंद उपभोगायचा असेल, तर विनाआट प्रेम करायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 10:05 IST

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते.

भय नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे लोकांवर विनाअट प्रेम करा. तुमच्या मनात जर काही अटी असतील, तर तुम्ही कधीच प्रेम करू शकणार नाही. त्या अटीच तुमच्या मार्गातील अडथळे बनतील. प्रेम करण्याचा लाभ तुम्हाला स्वत:ला होत असतो. मग अटी कशासाठी हव्यात? प्रेम तुम्हाला इतका लाभ करून देते, इतक्या आशीर्वादाचा वर्षाव करते की त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला काहीच मागण्याची गरज उरत नाही. म्हणून विनाअट प्रेम करा. तुम्हाला लक्षात आले, की प्रेम करण्यानेच निर्भयता विकसित होऊ शकते, म्हणजे तुम्ही स्वाभाविकपणे प्रेम कराल. मग तुम्ही प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम कराल.

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. लोक म्हणतात, तू असा वागलास तर मी तुझ्यावर प्रेम करेन. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते. प्रेम म्हणजे अनंत आकाश आहे. त्याला तुम्ही अटींच्या सीमित, संकुचित अंगणात कसे उतरवू शकाल? तुम्ही घरात तजी हवा घेऊन या. मग घर कडेकोट बंद करून टाका. लवकरच ती हवा नासायला लागेल. प्रेम स्वतंत्र आहे, त्याला घराच्या भिंतीत कोंडून ठेवू नका.

तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा सारे काही सुंदर वाटते. कारण त्या घडीला तुमच्या मनात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. कोणत्याही अटी नसतात. दोन माणसं काहीही अपेक्षेविना एकमेकांच्या जवळ आलेली असतात. पण एकदा ते एकत्र राहायला लागले, अनोळखीपण संपले की अटी थोपवायला सुरुवात होते. अशा वेळी तुम्ही प्रेमाचा सौदा करता. 

प्रेम करणे हेच प्रेमाचे साध्य असले पाहिजे. तिथे कसलीही अपेक्षा नसेल, तरच प्रेमाचा निर्भेळ आनंद घेताही येईल आणि देताही येईल.