शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चात्ताप टाळायचा असेल, तर चाणक्य नीतीत सांगितलेल्या व्यक्तींशीच मैत्री करा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 17:30 IST

चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात.

रक्ताची नाती आपण निवडू शकत नाही पण मैत्रीतून जुळणारी नाती आपण निवडू शकतो. आपल्याला संगत कोणाची असते यावरून आपले चारित्र्य घडत जाते. यासाठी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये काही सूचना केल्या आहेत. चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात. एवढा दूरदृष्टीने विचार आचार्यांनी केलेला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्याचा आपण उपयोग करून घेऊया. ते सांगतात, 

समाने शोभते प्रीती राज्ञि सेवा च शोभते।वाणिज्यं व्यवहारेषु स्त्री दिव्या शोभते गृहे ॥

मैत्री नेहमी आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी केली, तरच भविष्यात वाद विवादाचे प्रसंग टाळता येतात. अशी मैत्री लोकांसाठी देखील आदर्श ठरते. राजेशाही लोकांच्या हाताखाली सेवकवर्ग शोभून दिसतो. व्यवहारात वाकचातुर्य शोभून दिसते आणि सुसंस्कृत घरात शालीन, कुलीन, दिव्य स्त्री शोभून दिसते. 

याचाच अर्थ, आपल्या  वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक बाबतीत म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या प्रगतीला अनुकूल असतील अशीच माणसे जोडावीत. त्यांच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. आपल्यापेक्षा वरचढ लोक आपल्याला मागे सारतात, तर आपल्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले लोक आपला पाय खेचतात. म्हणून आपल्या बरोबरीची व्यक्ती आपल्याला पुढे नेण्यासाठी किंवा निरोगी स्पर्धेसाठी उत्तम ठरते. 

चाणक्य यांनी सांगितलेली सूचना लक्षात ठेवली, तर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. आपल्या पूर्वजांनीदेखील 'सुसंगती सदा घडो' असेच श्लोकातून म्हटले आहे. संतांनी तर सत्संग घडावा असे म्हटले आहे. आपणही माणसांची पारख करायला शिकूया आणि स्वतःचा व दुसऱ्याचा विकास घडवूया.