शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पश्चात्ताप टाळायचा असेल, तर चाणक्य नीतीत सांगितलेल्या व्यक्तींशीच मैत्री करा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 17:30 IST

चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात.

रक्ताची नाती आपण निवडू शकत नाही पण मैत्रीतून जुळणारी नाती आपण निवडू शकतो. आपल्याला संगत कोणाची असते यावरून आपले चारित्र्य घडत जाते. यासाठी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये काही सूचना केल्या आहेत. चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात. एवढा दूरदृष्टीने विचार आचार्यांनी केलेला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्याचा आपण उपयोग करून घेऊया. ते सांगतात, 

समाने शोभते प्रीती राज्ञि सेवा च शोभते।वाणिज्यं व्यवहारेषु स्त्री दिव्या शोभते गृहे ॥

मैत्री नेहमी आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी केली, तरच भविष्यात वाद विवादाचे प्रसंग टाळता येतात. अशी मैत्री लोकांसाठी देखील आदर्श ठरते. राजेशाही लोकांच्या हाताखाली सेवकवर्ग शोभून दिसतो. व्यवहारात वाकचातुर्य शोभून दिसते आणि सुसंस्कृत घरात शालीन, कुलीन, दिव्य स्त्री शोभून दिसते. 

याचाच अर्थ, आपल्या  वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक बाबतीत म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या प्रगतीला अनुकूल असतील अशीच माणसे जोडावीत. त्यांच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. आपल्यापेक्षा वरचढ लोक आपल्याला मागे सारतात, तर आपल्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले लोक आपला पाय खेचतात. म्हणून आपल्या बरोबरीची व्यक्ती आपल्याला पुढे नेण्यासाठी किंवा निरोगी स्पर्धेसाठी उत्तम ठरते. 

चाणक्य यांनी सांगितलेली सूचना लक्षात ठेवली, तर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. आपल्या पूर्वजांनीदेखील 'सुसंगती सदा घडो' असेच श्लोकातून म्हटले आहे. संतांनी तर सत्संग घडावा असे म्हटले आहे. आपणही माणसांची पारख करायला शिकूया आणि स्वतःचा व दुसऱ्याचा विकास घडवूया.