शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 21, 2020 21:34 IST

मनात स्वार्थ ठेवून केलेल्या कामापेक्षा निष्काम मनाने केलेली सेवा, कर्मयज्ञाचे पुण्य मिळवून देते.

ज्योत्स्ना गाडगीळ 

कुरुक्षेत्रावरील घनघोर युद्धाचा वणवा शांत झाल्यानंतर पाचही  पांडवांनी मिळून एक महायज्ञ केला. यज्ञाचा थाटमाट पाहून सगळे लोक दिपून जाऊन एकमुखाने यज्ञाची प्रशंसा करीत म्हणू लागले, की असा यज्ञ यापूर्वी साऱ्या दुनियेत कधी झाला नसेल. यज्ञाची सांगता होत होती आणि अशा समयी एक लहानसे मुंगूस तिथे येऊन उपस्थित झाले.  त्या अद्भुत मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी आणि अर्धे काळे होते. यज्ञमंडपात शिरताच ते मुंगूस तेथील यज्ञभूमीच्या मृत्तिकेवर इतस्तत: लोळू लागले. शेवटी ते तेथे जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणू लागले, 'तुम्ही सारे लबाड, खोटारडे आहात. असा यज्ञ पूर्वी कधी झाला नव्हता म्हणे! हूह...! अहो, हा तर मुळी यज्ञच नाही.'

लोक म्हणाले, 'काय, म्हणतोस तरी काय तू? त्यावर ते मुंगूस महणाले, `असं होय, ऐका तर मग. एक लहानसे खेडेगाव होते, तिथे एक लहानसे खेडेगाव होते, तिते एक गरीब माणूस आपल्या स्त्री, पुत्र नि सुनेसह राहत होता. तो अतिशय ज्ञानी होता. पोथ्यापुराणे व धर्मोपदेश यांच्याद्वारा मिळणाऱ्या दक्षिणेवरच त्याची गुजराण होत असे.

हेही वाचा : प्रत्येक काम भगवंताचे समजून करा; पांडुरंगशास्त्री आठवलेंचा 'स्वाध्याय'

एकदा त्या देशात एकामागून एक सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. बिचाऱ्या  त्या माणसाच्या कुटुंबाला पराकाष्ठेचे दु:ख सहन करावे लागले. एक वेळ तर त्या कुटुंबाला पाच दिवस फाके पडले. सहाव्या दिवशी सकाळी पित्याला मोठ्या सुदैवाने थोडेसे जवाचे पीठ मिळाले. त्याने ते घरी आणून त्याचे चार भाग केले आणि ते चौघात वाटून घेतले. स्वयंपाक आटपून त्यांनी जेवणाची तयारी केली आणि आता तोंडात घास घालणार इतक्यात दारावर थाप वाजली. दार उघडून बघतो तो एक अतिथी समोर उभा. तो माणूस अतिथीला म्हणाला, `यावे महाराज, आपले स्वागत आहे.'

त्या उदार माणसाने अतिथीसमोर स्वत:चा भाग ठेवला. क्षणार्धात सारे मटकावून अतिथी म्हणाला, `महाराज, मी दहा दिवसांचा उपाशी मी ह्या अपुऱ्या अन्नाने दोन घासांनी तर माझ्या पोटातील आगीचा डोंब आणखीनच भडकवला आहे.'

हे ऐकून त्याची पत्नी आपल्या पतीस म्हणाली, `हे अतिथी आपल्या घरी आले आहेत. त्यांना पोटभर जेवू घालणे, आपले कर्तव्य आहे. त्याअर्थी माझाही वाटा मी यांना देणे उचित..' असे म्हणून त्या पतिव्रतेने आपला भाग त्या अतिथीपुढे ठेवला. क्षणर्धात त्याचाही चट्टामट्टा करून अतिथी म्हणाला, `बापरे, ही राक्षसी भूक मला अजूनही नुसती जाळत आहे. प्राण चाललेत माझे.' त्यावर उदार माणसाचा मुलगा लगबगीने उद्गारला, `आपण माझ्याही वाटचे अन्न ग्रहण करावे. पित्याला आपल्या कर्तव्यपालनात हातभार लावणे हा पुत्र या नात्याने माझा धर्मच होय.' अतिथीने तेही संपवले. परंतु त्याची भूक मात्र मुळीच शमली नाही. आता पूत्रवधूची पाळी आली. त्या साध्वीनेही आपला वाटा अतिथीला अर्पण केला आणि तेव्हा कुठे भूक शांत होऊन अतिथी तृप्त झाला. अखेरीस सर्वांना मनापासून आशीर्वाद देत तो मार्गस्थ झाला.

भुकेने व्याकुळ होऊन चौघेही इहलोकीची यात्रा संपवून गेले. मात्र जाता जाता त्यांच्याकडून निरपेक्षपणे हा महान यज्ञ झाला होता. त्या पिठातील काही थोडेसे तेथील जमिनीवर पडले होते. त्यावर मी लोळलो आणि चमत्कार असा की माझे अर्धे शरीर सोनेरी बनून गेले. तेव्हापासून, आणखी एखादातरी तसा यज्ञ पाहावयासा मिळावा या इच्छेने मी सारे जग पालथे घालत भटकत फिरतो आहे. परंतु, परत तसा यज्ञ कुठे दिसला नाही आणि माझे उरलेले अर्धे शरीर सोन्याचे झाले नाही. समजले, एवढ्यासाठी मी म्हणालो होतो, की तुम्ही ज्याचा एवढा उदो उदो करत आहात तो मुळात यज्ञ नाहीच!' कर्तव्यासाठी संपूर्ण स्वार्थ-त्यागाचे, निष्काम कर्मरूपी यज्ञचे हे परमोज्ज्वल उदाहरण! आता तुम्हीच सांगा, या सकाम यज्ञाची तुलना त्या निष्काम यज्ञाशी होऊ शकेल का?

मुंगसाचे बोलणे ऐकून पांडवांसह नगरजनही वरमले. 

हेही वाचा : हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!