शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सुंदर सारवलेले अंगण असेल, तर अंगण पूजेचा मोह तरी कसा आवरणार?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 29, 2021 09:00 IST

अंगण हे भूमीचे प्रतीकात्मक रूपदर्शन आहे. अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरात. त्यांचे तेजस्वी प्रकाशकिरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे.

अंगणाला घराच्या अंतरंगाचे प्रतीक मानतात. अंगणावरून घराची कळा, घराचे रूप, घराचे सौंदर्य ओळखणे यासारखा वाकप्रचार अशा अर्थाचे द्योतक आहे. अंगणाविषयी असलेल्या अतीव आदरामुळे अंगणपूजेचा विधी हा हिंदू जीवनपद्धतीतील भावभक्तीचा अगाध महिमा आहे. गावाकडे आजही अंगण सारवले जाते, सुशोभित केले जाते. तो आनंद शहरात अनुभवणे कठीण आहे. म्हणून आजही शहरी माणूस मोकळ्या वेळेत गावातच जास्त रमतो.

घराच्या पुढच्या आणि मागच्या मोकळ्या जागेला अंगण म्हणतात. अंगण म्हणजे घराच्या परिसराचे मुक्त वातावरण होय. प्राचीनकाळी भव्य वाडे, राजवाडे इत्यादी वास्तू अनेक चौकांच्या असता. या चौकोनांनाही अंण असेच संबोधण्यात आले आहे. वाल्मिकी रामायण, हर्षचरित इ. ग्रंथांमध्ये अशी अंगणे उल्लेखली आहेत. अंगण हे भूमीचे प्रतीकात्मक रूपदर्शन आहे.

सूर्योदयापूर्वी झाडून त्यावर गोमयमिश्रित जलाने सडासंमार्जन करून रांगोळी घालून अंगणाचा परिसर व वातावरण प्रसन्न करणे, यालाच अंगणपूजा म्हणतात. शेणखळा, सडा याने माती बसते. घरात येत नाही. घरातील हवा शुद्ध राहते. शेण, गोमूत्र हे प्रदूषण निवारक आहेत. हे मान्य होऊ लागले आहे. अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरात. त्यांचे तेजस्वी प्रकाशकिरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे.

प्राचीन काळापासून घरापुढील अंगणाशी अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुबंधित आहेत. आपल्याकडे सण, उत्सव, व्रतवैकल्ये आणि धार्मिक विधिप्रसंगी अंगणात सडासंमार्जन करून त्यावर रांगोळी घालण्याची पूर्वापार पद्धत आहे. यशोदेला पूत्र झाला असता, गोकुळात झालेल्या जल्लोषाच्या आनंदोत्सवात या बाबीचा उल्लेख आहे. बहिरा जातवेदाने या प्रसंगाचे वर्णन करताना म्हटले आहे-

मग गौळी काय केले, समग्र वाडे झाडिले,आणि संमार्जन केले, गृहद्वारी।सडे घातले अंगणी, चौक घालिती सुहासिनी,विचित्र ध्वजा तोरणी, माळा पुष्पाचिया।

अंगणात रंगमाळा रेखणे हा स्त्रियांच्या व्रतवैकल्यातला एक उपचार आहे. चैत्रांगण ही रांगोळी लौकक व्रताचाच एक कुळधर्म आहे. चातुर्मासात अंगणात स्त्रिया विविधरंगी रांगोळ्या काढण्याचे व्रत करतात. संस्कृतीतील अनेक वा काही खास प्रतीके या चैत्रांगण रांगोळीत रेखाटलेली असतात. संस्कृतीजतनाचा हा एक सुरेख शैक्षणिक उपक्रम होता.

लोकसाहित्यातील अंगणाचे वर्णन हे छोट्या देऊळवाड्याची आठवण करून देणारे आहे. त्याचे भावस्वरूप लोकगीतातून मार्मिकपणे मांडले आहे. 

माझ्या अंगणात पिवळ्या लाल ग कर्दळी,बाळाची वर्दळी चारी दिशा।माझ्या अंगणात लाविल्या तुळशी,नाही होणार आळशी तान्हे बाळ।माझ्या अंगणात तुळशीचा वाफा,गोविंद घाली खेपा मंजुळींना,माझ्या अंगणात शोभती दुर्वा फुले ,खेळाया येती मुले बाळासंगे।

अंगण हे घराच्या प्रारंभाचे प्रवेशाच ठिकाण. तिथपासून पवित्र, स्वच्छ, मंगल, वातावरण निर्माण व्हावे, हा या अंगणपूजेचा हेतू. अंगण स्वच्छ, नीटनेटके करून नि रांगोळीने भवतालच्या झाडांनी सुशोभित करणे हेच पूजन!