शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
2
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
4
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
5
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
6
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
7
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
8
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
9
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
10
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
11
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
12
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
13
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
14
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
15
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
16
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
17
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
18
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
19
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
20
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”

युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण रथातून आधी उतरले असते, तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 15, 2021 10:00 IST

ज्या भक्ताची भक्ती आणि श्रद्धा दृढ असेल, त्याच्यावर आलेल्या संकटांना आधी भगवंताला सामोरे जावे लागेल. तसे भगवंताने गीतेत वचनच दिले आहे.

भगवंत आपल्या भक्तासाठी वाट्टेल ते करतो. कारण भक्ताचीसुद्धा भगवंतप्रति तेवढी दृढ भक्ती असते. त्याच्या प्रेमाखातर तो कधी त्याचा सेवक होतो, तर कधी मार्गदर्शक. मग तो आपल्या मदतीला कधीच का येत नाही, असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचे कारण म्हणजे आपण तितक्या आर्ततेने त्याला हाक मारतच नाही. तरीसुद्धा तो न बोलवता आपल्याला मदत पुरवत असतो. आपल्याला ती कधी ओळखता येते, तर कधी येत नाही. कधी कधी आपल्या अडचणीच्या वेळी अनपेक्षित पणे येऊन कोणी आपली मदत करून जातो, तेव्हा आपल्या तोंडून सहज निघून जाते, 'देवासारखा धावून आलास बघ!' देवाच्या ठायी आपली श्रद्धा दृढ असेल, तर देवाच्या मदतीची प्रचिती आपल्याला वारंवार येत राहील. जशी अर्जुनाला वेळोवेळी आली. 

महाभारतयुद्ध संपले आणि अर्जुनाने आदराने नम्रतेने त्या क्षणी भगवान श्रीकृष्णांना त्यांचा मान राखण्यासाटी रथामधून आधी उतरण्याची विनंती केली. परंतु भगवंतांनी मात्र एक वेगळेच हास्य करून त्या विनंतीला नकार दिला. अर्थातच अर्जुन आधी खाली उतरला. पाठोपाठ श्रीकृष्ण उतरले आणि अर्जुनाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण, सबंध रथ भगवंताचा पदस्पर्श सुटताच धडाधड जळून गेला.

पहिले अठरा दिवस मात्र त्या रथाला काहीही झाले नाही. उघड आहे. कौरवांच्या दुष्ट प्रवृत्तींनी वेढून राहिलेल्या त्या रथावरील वासनांचा ज्वालामुखी, जो अर्जुनाला कोणत्याही क्षणी जाळू शकला असता, तो भगवंतांनी आपल्या दिव्य शक्तींनी अडवून धरला होता. युद्ध संपले होते. अर्थातच रथाची गरज संपली होती. म्हणून केवळ भगवंतांनी अर्जुनाला आधी खाली उतरवले. भक्ताचा अभिमान असणारा भगवंत त्याच्या रक्षणार्थ वेळप्रसंगी उत्कृष्ट सारथी होतो आणि त्याच्या प्राणांचे अशा प्रकारे रक्षण करतो. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात,

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी,धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी,जना रक्षणाकारणे नीच योनी, नुपेक्षा कदा देव भक्ताभिमानी।। श्रीराम।।