शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

....म्हणून या औषधाला च्यवनप्राश हे नाव प्राप्त झाले!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 15, 2021 22:59 IST

उत्तम आरोग्यासाठी रामबाण उपाय म्हणून जो प्राचीन उपाय वापरला जातो, तो म्हणजे च्यवनप्राश! त्याच्या निर्मितीची ही पौराणिक कहाणी!

फार पूर्वी शर्याति नावाचा राजा होता. त्याला अनेक अपत्ये होती. तो प्रजाहितदक्ष राजा होताच, शिवाय तो कुटुंबवत्सलदेखील होता. आपला राज्यकारभार सांभाळून तो आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. एकदा सहपरिवार राना वनाचा फेरफटका करत असताना राजा राणी बोलत बसले. त्यांची मुले वयाने मोठी होती, शूर होती. ती इतरत्र फिरत होती. 

असाच फेरफटका मारत असताना राजकुमारी सुकन्या हिच्या हातून एका मातीच्या ढीगाला दगड लागला आणि त्यातून रक्त वाहू लागले. ती घाबरली. तो मातीचा ढीग नसून त्यात कोणाचा तरी मानवी देह आहे, याची तिला कल्पना आली. तिने तत्काळ ओरडून आपल्या आई वडिलांना आणि भावंडांना तिथे बोलावून घेतले. रक्त थांबत नव्हते. 

राजाने पुढाकार घेऊन मातीचा थर दूर केला. तर त्या ढीगाखाली च्यवन नावाचे थोर तपस्वी तपश्चर्या करत बसले होते. राजकुमारी सुकन्याच्या हातून चुकून लागलेल्या दगडामुळे त्यांचा डोळा जखमी झाला आणि त्यातून रक्त वाहू लागले. 

राजाने तत्काळ आपल्या राज्यातून राजवैद्यांना बोलावून घेतले. ऋषींची मलमपट्टी केली. परंतु, राजवैद्यांच्या सांगण्यानुसार च्यवन ऋषींनी आपली दृष्टी गमावली होती.

हे वृत्त कळल्यावर राजकुमारी सुकन्येला अपराधी वाटू लागले. ऋषींनी क्षमा केली, तरी तिला तिच्या चुकीचे प्रायश्चित्त करून घ्यायचे होते. ती आपल्या वडिलांना म्हणाली, `पिताश्री, माझ्यामुळे ऋषींची दृष्टी गेली, आता मीच त्यांचे नेत्र होईन. अर्थात मी त्यांच्याशी विवाह करून त्यांचा सांभाळ करीन.'

दोघांच्या वयातील तफावत पाहता राजाने तिला अडवले, परंतु तिने आपलेच म्हणणे पुढे रेटले. राजाने च्यवन ऋषींशी राजकन्येचा विवाह लावून दिला. च्यवन ऋषींची तपश्चर्या पाहून देवतांनी त्यांना वरदान दिले आणि आयुर्वेदीक औषधे दिली, ज्यामुळे च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झाले आणि सर्व देवतांच्या आशीर्वादाने ऋषींनी पुढे राजकन्येसोबत सुखाने संसार केला.