शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 24, 2020 12:32 IST

शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'दूर कुठे तरी निघून जावे' असे आपल्या प्रत्येकाला वरचेवर वाटत असते. अशी जागा, जिथे खूप शांतता असेल, कुठलाही त्रास नसेल, कोणाशीही स्पर्धा नसेल, कोणी आपल्याला दुखावणारे नसेल, आयुष्याचा भरभरून आनंद घेता येईल. मात्र, दुदैवाने अशी जागा मनुष्याने शिल्लकच ठेवलेली नाही. पृथ्वी कमी पडते म्हणून की काय, तो चंद्रारवर, मंगळावर जागा विकत घेऊ लागला आहे. परंतु, तिथे तरी अपेक्षित असलेला एकांत गवसणार आहे का? मग तो कुठे मिळेल? जगभरात अशी एकही जागा नाही का, जिथे मन:शांती मिळेल? याबाबत गुरु गौर गोपाल दास आश्वस्थ करतात, अशी एक जागा आहे. कोणती, ती या कथेत सापडेल.

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.

एक राजा होता. तो अजातशत्रू होता. शत्रू त्याला पाहून थरथर कापत असत. त्याच्या रयतेवर अनिष्ट आणण्याचे धाडस कोणात्याही सम्राटात नव्हते. सगळी आलबेल होती. सुबत्ता होती. राजाच्या पायाशीदेखील सगळी सुखं लोळण घेत होती. संसारसुखाचीही कमतरता नव्हती. असे सगळे असूनही, राजाचे मन मन:शांतीसाठी व्याकूळ असे. ती कुठे गवसेल, या शोधात तो होता. त्याने एक स्पर्धा आयोजित केली आणि 'मन:शांती' हा विषय चित्रातून अभिव्यक्त करण्याचे आवाहन केले. विजेत्याला भरघोस संपत्तीने  भरलेली धनाची पेटी बक्षिस म्हणून देण्याचेही घोषित केले. देशोदेशिच्या चित्रकारांनी स्पर्धेत भाग घेतला. राजाने जातीने लक्ष घालून सर्व चित्रांची तपासणी केली. या विषयातील तज्ञांचीदेखील मते घेतली. सरतेशेवटी दोन चित्रांची निवड झाली. 

पहिले चित्र, अतिशय सुंदर होते. नावे ठेवायला जागाच नाही. शांतता हा भाव चित्रातील प्रत्येक बारकाव्यातून उमटत होता. सुंदर निसर्ग, उंच पर्वत, कोवळे ऊन, झुळझुळू वाहणारी नदी, नदीच्या काठावर हिरवळ, खुल्या आकाशाखाली पंख पसरवून विहार करणारे मोर, नाजूक सुकोमल फुलांतून गंध प्राशन करणारे मधुकर आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेत बासरीवादनात दंग झालेले श्रीकृष्ण. संगीत ऐकताना देहभान विसरून गेलेल्या गायी, श्वान, पशू-पक्षी. ते चित्र पाहता, राजाचे भान हरखून गेले. मनोमन त्याने चित्रकाराला बक्षिस जाहीरही करून टाकले. परंतु, दुसरे चित्र पाहिल्यानंतरच नाम घोषित करता येणार होते. म्हणून राजाने दुसऱ्या चित्राकडे मोर्चा वळवला. 

दुसरे चित्र पाहत असताना क्षणभरापुर्वीची शांतता क्षणात भंग पावली. मन उद्विग्न झाले. हे चित्र विषयाला अनुसरून नाही, असे म्हणत तो, त्या चित्राच्या निवडीबद्दल तज्ञांना जाब विचारणार, तोच क्षणभर थांबला. त्याने चित्र निरखून पाहिले. रखरखीत डोंगराळ परिसर, निष्पर्ण झाडं, उजाड वस्ती, कुपोषित जनता, घोंगावणारे वादळ, काही क्षणात धुंवाधार पावसाची शक्यता, पावसाच्या पाण्यात वाहून जातील, अशी मोडकळीस आलेली घरे, हे पाहताना राजा कमालीचा अस्वस्थ झाला. त्याचवेळेस त्याचे लक्ष तुटक्या झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या वृद्ध माणसाकडे गेले. त्या वादळी प्रसंगातही त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती. संकट थैमान घालत असतानाही, तो स्थितप्रज्ञ होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची, काळजीची पुसटशी रेषाही नव्हती. त्याला पाहिल्यावर राजाचे व्याकूळ झालेले मन एकाएक शांत झाले. ही शांतता क्षणिक नव्हती. चिरकाल टिकणारी होती. कारण, चित्रातल्या वृद्ध माणसाने आपल्या चेहऱ्यावरील भावांनी शांततेची खरी व्याख्या राजाला न बोलता समजावून सांगितली होती. ती व्याख्या म्हणजे, 

'शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे. शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. मग तुम्ही कितीही विकेंड पिकनिक काढा, मन:शांती लाभणार नाही. बाहेरच्या प्रवासाऐवजी आतला प्रवास करा. शांततेला शोधण्याचा प्रयत्न करा. ती सापडली, अवगत झाली, तर कोणीही बाह्य व्यक्ती, परिस्थिती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. जगातील सर्वात शांत जागा बाहेर नाही, तर तुमच्या मनात आहे. ती शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी बोलू नका. डोळे मिटून स्वतःकडे शांतपणे पहा. स्वतःचे आकलन करा. मी कोण आहे, मला काय आवडते, मी का जगतोय, माझे ध्येय काय, माझं स्वतःवर आणि इतरांवर किती प्रेम आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मन आपोआप शांत होईल. समाजासमोर मिरवणारा खोटा मुखवटा गळून पडेल आणि स्वतःशी नव्याने ओळख होईल. ती ओळखच तुम्हाला मनातला शांत कोपरा दाखवेल. 

हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...