शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

द्वेष केवळ दोषांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 08:24 IST

श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?

- सुजाता पाटीलरावणाने सीतेला पळवून नेलं तेव्हा श्रीरामांसमोर युद्धाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी श्रीलंकेत युद्ध केले व जिंकलेही. परत येताना ते लक्ष्मणाला म्हणाले मी राज्यात जाऊ इच्छित नाही. हिमालयात अगस्त्य ऋषींच्या गुंफेत मला काही दिवस व्यतीत करायचे आहेत. आश्चर्यचकित लक्ष्मण म्हणाले, का? श्रीराम उत्तरले, मला दहावेळा रावणाचा वध करावा लागला. लक्ष्मण रागाने म्हणाले, ‘त्याने तुमची पत्नी पळवून नेली होती.’ शांतपणे श्रीराम म्हणाले, ‘ते वाईट काम त्याच्या त्या नऊ डोक्यांचं होतं; पण एक डोकं सुंदर होतं, ज्यात ज्ञान, धार्मिकता आणि भक्ती अपार होती. त्या डोक्याचा वध करण्याचा मला कोणताही अधिकार नाही. रागाच्या भरात केलेल्या या कृत्याने मीही पापीच ठरलो.’ श्रीराम आपल्याला हेच सांगतात की, व्यक्तींमध्ये असंख्य दोष असतात. त्या दोषांचा द्वेष करा, व्यक्तीचा नको. रावणाप्रमाणे प्रत्येकाला अशी दहा डोकी असतात. ज्यात मद, मत्सर, अहंकार, गर्व, घंमेड. गर्व असतो. जो प्रथम आपल्याला ज्या रूपात बघेल तसं आपल्या विषयीचं मत ठरवतो. म्हणजे कुणी भांडण करताना पाहिलं की भांडखोर असा शिक्का मनात कायमचा बसतो. कुणी अभ्यासू, कुणी स्वार्थी, कुणी वासनिक इ. म्हणजे ज्या रूपात आपल्याला पाहाणार, आपल्याबद्दलची तीच धारणा तो धरून बसणार. म्हणजे माणसांची दहा डोकी दहा ठिकाणी वेगवेगळी कामं करतं असतात. खूप दिवसांनी जुना मित्र आपल्याला वाईट दिसू लागतो तर एखाद्यी अपरिचित व्यक्ती लगेच चांगली वाटते. एखाद्या व्यक्तीशी मैत्री केल्याने तुम्हाला त्याचे गुण अवगुण, कमतरता हे सगळं चांगल्या तºहेने माहीत असते. त्याला उगाच भावनिक तिढ्यात अडकवून अबोल्याचं शस्त्र वापरणं चूक आहे. म्हणून त्याच्यातील एकतरी चांगला गुण जरूर ओळखा आणि मैत्रीचा हात एकवार स्वत:हून पुढे करा. श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?