शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

द्वेष केवळ दोषांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 08:24 IST

श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?

- सुजाता पाटीलरावणाने सीतेला पळवून नेलं तेव्हा श्रीरामांसमोर युद्धाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी श्रीलंकेत युद्ध केले व जिंकलेही. परत येताना ते लक्ष्मणाला म्हणाले मी राज्यात जाऊ इच्छित नाही. हिमालयात अगस्त्य ऋषींच्या गुंफेत मला काही दिवस व्यतीत करायचे आहेत. आश्चर्यचकित लक्ष्मण म्हणाले, का? श्रीराम उत्तरले, मला दहावेळा रावणाचा वध करावा लागला. लक्ष्मण रागाने म्हणाले, ‘त्याने तुमची पत्नी पळवून नेली होती.’ शांतपणे श्रीराम म्हणाले, ‘ते वाईट काम त्याच्या त्या नऊ डोक्यांचं होतं; पण एक डोकं सुंदर होतं, ज्यात ज्ञान, धार्मिकता आणि भक्ती अपार होती. त्या डोक्याचा वध करण्याचा मला कोणताही अधिकार नाही. रागाच्या भरात केलेल्या या कृत्याने मीही पापीच ठरलो.’ श्रीराम आपल्याला हेच सांगतात की, व्यक्तींमध्ये असंख्य दोष असतात. त्या दोषांचा द्वेष करा, व्यक्तीचा नको. रावणाप्रमाणे प्रत्येकाला अशी दहा डोकी असतात. ज्यात मद, मत्सर, अहंकार, गर्व, घंमेड. गर्व असतो. जो प्रथम आपल्याला ज्या रूपात बघेल तसं आपल्या विषयीचं मत ठरवतो. म्हणजे कुणी भांडण करताना पाहिलं की भांडखोर असा शिक्का मनात कायमचा बसतो. कुणी अभ्यासू, कुणी स्वार्थी, कुणी वासनिक इ. म्हणजे ज्या रूपात आपल्याला पाहाणार, आपल्याबद्दलची तीच धारणा तो धरून बसणार. म्हणजे माणसांची दहा डोकी दहा ठिकाणी वेगवेगळी कामं करतं असतात. खूप दिवसांनी जुना मित्र आपल्याला वाईट दिसू लागतो तर एखाद्यी अपरिचित व्यक्ती लगेच चांगली वाटते. एखाद्या व्यक्तीशी मैत्री केल्याने तुम्हाला त्याचे गुण अवगुण, कमतरता हे सगळं चांगल्या तºहेने माहीत असते. त्याला उगाच भावनिक तिढ्यात अडकवून अबोल्याचं शस्त्र वापरणं चूक आहे. म्हणून त्याच्यातील एकतरी चांगला गुण जरूर ओळखा आणि मैत्रीचा हात एकवार स्वत:हून पुढे करा. श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?