शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

द्वेष केवळ दोषांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 08:24 IST

श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?

- सुजाता पाटीलरावणाने सीतेला पळवून नेलं तेव्हा श्रीरामांसमोर युद्धाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी श्रीलंकेत युद्ध केले व जिंकलेही. परत येताना ते लक्ष्मणाला म्हणाले मी राज्यात जाऊ इच्छित नाही. हिमालयात अगस्त्य ऋषींच्या गुंफेत मला काही दिवस व्यतीत करायचे आहेत. आश्चर्यचकित लक्ष्मण म्हणाले, का? श्रीराम उत्तरले, मला दहावेळा रावणाचा वध करावा लागला. लक्ष्मण रागाने म्हणाले, ‘त्याने तुमची पत्नी पळवून नेली होती.’ शांतपणे श्रीराम म्हणाले, ‘ते वाईट काम त्याच्या त्या नऊ डोक्यांचं होतं; पण एक डोकं सुंदर होतं, ज्यात ज्ञान, धार्मिकता आणि भक्ती अपार होती. त्या डोक्याचा वध करण्याचा मला कोणताही अधिकार नाही. रागाच्या भरात केलेल्या या कृत्याने मीही पापीच ठरलो.’ श्रीराम आपल्याला हेच सांगतात की, व्यक्तींमध्ये असंख्य दोष असतात. त्या दोषांचा द्वेष करा, व्यक्तीचा नको. रावणाप्रमाणे प्रत्येकाला अशी दहा डोकी असतात. ज्यात मद, मत्सर, अहंकार, गर्व, घंमेड. गर्व असतो. जो प्रथम आपल्याला ज्या रूपात बघेल तसं आपल्या विषयीचं मत ठरवतो. म्हणजे कुणी भांडण करताना पाहिलं की भांडखोर असा शिक्का मनात कायमचा बसतो. कुणी अभ्यासू, कुणी स्वार्थी, कुणी वासनिक इ. म्हणजे ज्या रूपात आपल्याला पाहाणार, आपल्याबद्दलची तीच धारणा तो धरून बसणार. म्हणजे माणसांची दहा डोकी दहा ठिकाणी वेगवेगळी कामं करतं असतात. खूप दिवसांनी जुना मित्र आपल्याला वाईट दिसू लागतो तर एखाद्यी अपरिचित व्यक्ती लगेच चांगली वाटते. एखाद्या व्यक्तीशी मैत्री केल्याने तुम्हाला त्याचे गुण अवगुण, कमतरता हे सगळं चांगल्या तºहेने माहीत असते. त्याला उगाच भावनिक तिढ्यात अडकवून अबोल्याचं शस्त्र वापरणं चूक आहे. म्हणून त्याच्यातील एकतरी चांगला गुण जरूर ओळखा आणि मैत्रीचा हात एकवार स्वत:हून पुढे करा. श्रीरामांसारखे बनणं तर शक्यच नाही, पण त्यांची एक गोष्ट आचरणात आणायला काय हरकत आहे?