शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आनंद तरंग: सुख उत्पादन योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:05 IST

जेव्हा एखादा माणूस आतून चैतन्यमय बदलाचा अनुभव घेतो तेव्हा आनंदनिर्मितीच्या त्या तत्त्वांना यशस्वी व्हायला वेळ लागत नाही.

नीता ब्रह्मकुमारीदु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढवायचे असेल तर सकाळी अंथरुणातून उठण्याआधी शरीराला सैल सोडून आज दिवसभरात काय करायचे आहे, याची कामावली नजरेसमोर आणावी. प्रत्येक लहान कार्यात मला यश मिळतेय आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे, अशी कल्पनाही आनंद देईल. प्रत्येक कार्याचे सुंदर चित्र डोळ्यासमोर आणून त्यातील आनंद अनुभवायचा ध्यास घ्यावा. कारण ज्याचे चित्र मानसपटलावर रंगवले जाते ते वास्तवात उतरते. मग ते सुखाचे असो वा दु:खाचे. जर कोणी सकाळी उठल्यावर म्हणत असेल की ‘उगवला आणखी एक कठीण दिवस’ तर त्याचा दिवस कसा जाईल? म्हणून सकाळी उठल्यापासून अनेकदा स्वत:ला काही सकारात्मक विचार द्यावे... माझी खात्री आहे की आजचा दिवस अद्भुत असेल. मी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या उत्तम आहे. मला जे जे मिळाले आहे त्याबद्दल मी ऋ णी आहे. जे माझ्याजवळ आहे आणि जे मला मिळणार आहे त्याबद्दल मी आभारी आहे. आज उद्भवणाऱ्या समस्यांना मी यशस्वीपणे हाताळू शकतो असा माझा विश्वास आहे. ईश्वर माझ्यासोबत आहे आणि तोच मला सगळ्यातून पार पाडत आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे.’

जेव्हा एखादा माणूस आतून चैतन्यमय बदलाचा अनुभव घेतो तेव्हा आनंदनिर्मितीच्या त्या तत्त्वांना यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. एका कार्डवर लिहिले होते ‘सुखाचा, आनंदाचा मार्ग : - तुमचे हृदय तिरस्कारापासून आणि मन चिंतेपासून मुक्त ठेवा. साधेपणाने जगा, अपेक्षा कमी करा, इतरांचा विचार करा, तुमचे आयुष्य प्रेमाने भरून टाका, सूर्यप्रकाशाचा सडा टाका, स्वत:ला विसरा, इतरांचा विचार करा, तेच करा जे तुमच्यासाठी केले जावे असे तुम्हाला वाटते. एक आठवडाभर असे वागून पहा आणि तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल.’सुखाचे उत्पादन करायचे असेल तर अशा सकारात्मक विचारांचे साहित्य आपल्याजवळ जमा करा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक