शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

आजोबांनी एका क्षणात वीस हजार कमावले, पण कसे? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:00 IST

दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात.

एक जहाज एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासाला निघाले होते. त्या जहाजात हजारो प्रवासी होते. त्यात एक अतिशय श्रीमंत व्यापारीदेखील होता. जहाज समुद्राच्या मध्यभागी आले आणि एका मोठ्या वादळात सापडले. त्याचवेळेस अचानक इंजिनने काम करणे बंद केले. 

जहाजातले सगळे अभियंते गोळा झाले आणि समस्येवर तोडगा शोधू लागले. आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. मध्य सागरात जहाज हिंदकळत होते. हा हा म्हणता म्हणता ही बाब सर्वत्र पसरली आणि सगळ्या प्रवाशांमध्ये घाबरगुंडी उडाली. त्यावेळेस घाबरलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याने जाहीर केले, जो कोणी हे जहाज आणि पर्यायाने सर्व प्रवाशांचा जीव वाचवेल त्याला मी बक्षीस देईन. 

परंतु जहाजाचे इंजिन दुरुस्त करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हते. सगळ्या अभियंत्यांनी हात टेकले. त्यावेळेस एक मुलगा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एकदा माझ्या आजोबांना प्रयत्न करू द्या.' असे म्हणत तो आजोबांना घेऊन तिथे आला. आजोबा निवृत्त तांत्रिक अभियंता होते. तरुण अभियंत्यांनी आजोबांची टिंगल केली. जे आम्हाला जमले नाही, ते आजोबांना कुठून जमणार आहे, अशा आविर्भावात ते कुत्सितपणे हसत होते. 

आजोबांनी मशीनची नीट पाहणी केली आणि बाजूला पडलेला हातोडा इंजिनावर जोरात मारला आणि घुर्घुर आवाज करत इंजिन सुरु झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आजोबांचे अभिनंदन केले. श्रीमंत व्यापाऱ्याने खुश होऊन आजोबांना एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. ते पैसे एका हातात घेत आजोबांनी दुसरा हात पुढे करत म्हटले, बाकीचे एकोणीस हजार रुपये सुद्धा द्या!'

त्यावर व्यापारी म्हणाला, 'एक हातोडा मारण्याचे वीस हजार रुपये?'आजोबा म्हणाले, 'एक हजार रुपये हातोडा मारण्याचे आणि एकोणीस हजार रुपये योग्य जागी मारण्याचे!' 

तात्पर्य हेच, की दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात. असे आजोबा तुम्हालाही भेटले तर त्यांची टिंगल न करता त्यांच्या ज्ञानाचा जरूर वापर करा.