शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

आजोबांनी एका क्षणात वीस हजार कमावले, पण कसे? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:00 IST

दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात.

एक जहाज एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासाला निघाले होते. त्या जहाजात हजारो प्रवासी होते. त्यात एक अतिशय श्रीमंत व्यापारीदेखील होता. जहाज समुद्राच्या मध्यभागी आले आणि एका मोठ्या वादळात सापडले. त्याचवेळेस अचानक इंजिनने काम करणे बंद केले. 

जहाजातले सगळे अभियंते गोळा झाले आणि समस्येवर तोडगा शोधू लागले. आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. मध्य सागरात जहाज हिंदकळत होते. हा हा म्हणता म्हणता ही बाब सर्वत्र पसरली आणि सगळ्या प्रवाशांमध्ये घाबरगुंडी उडाली. त्यावेळेस घाबरलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याने जाहीर केले, जो कोणी हे जहाज आणि पर्यायाने सर्व प्रवाशांचा जीव वाचवेल त्याला मी बक्षीस देईन. 

परंतु जहाजाचे इंजिन दुरुस्त करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हते. सगळ्या अभियंत्यांनी हात टेकले. त्यावेळेस एक मुलगा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एकदा माझ्या आजोबांना प्रयत्न करू द्या.' असे म्हणत तो आजोबांना घेऊन तिथे आला. आजोबा निवृत्त तांत्रिक अभियंता होते. तरुण अभियंत्यांनी आजोबांची टिंगल केली. जे आम्हाला जमले नाही, ते आजोबांना कुठून जमणार आहे, अशा आविर्भावात ते कुत्सितपणे हसत होते. 

आजोबांनी मशीनची नीट पाहणी केली आणि बाजूला पडलेला हातोडा इंजिनावर जोरात मारला आणि घुर्घुर आवाज करत इंजिन सुरु झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आजोबांचे अभिनंदन केले. श्रीमंत व्यापाऱ्याने खुश होऊन आजोबांना एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. ते पैसे एका हातात घेत आजोबांनी दुसरा हात पुढे करत म्हटले, बाकीचे एकोणीस हजार रुपये सुद्धा द्या!'

त्यावर व्यापारी म्हणाला, 'एक हातोडा मारण्याचे वीस हजार रुपये?'आजोबा म्हणाले, 'एक हजार रुपये हातोडा मारण्याचे आणि एकोणीस हजार रुपये योग्य जागी मारण्याचे!' 

तात्पर्य हेच, की दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात. असे आजोबा तुम्हालाही भेटले तर त्यांची टिंगल न करता त्यांच्या ज्ञानाचा जरूर वापर करा.