शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांनी एका क्षणात वीस हजार कमावले, पण कसे? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:00 IST

दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात.

एक जहाज एका देशातून दुसऱ्या देशात प्रवासाला निघाले होते. त्या जहाजात हजारो प्रवासी होते. त्यात एक अतिशय श्रीमंत व्यापारीदेखील होता. जहाज समुद्राच्या मध्यभागी आले आणि एका मोठ्या वादळात सापडले. त्याचवेळेस अचानक इंजिनने काम करणे बंद केले. 

जहाजातले सगळे अभियंते गोळा झाले आणि समस्येवर तोडगा शोधू लागले. आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. मध्य सागरात जहाज हिंदकळत होते. हा हा म्हणता म्हणता ही बाब सर्वत्र पसरली आणि सगळ्या प्रवाशांमध्ये घाबरगुंडी उडाली. त्यावेळेस घाबरलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याने जाहीर केले, जो कोणी हे जहाज आणि पर्यायाने सर्व प्रवाशांचा जीव वाचवेल त्याला मी बक्षीस देईन. 

परंतु जहाजाचे इंजिन दुरुस्त करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हते. सगळ्या अभियंत्यांनी हात टेकले. त्यावेळेस एक मुलगा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एकदा माझ्या आजोबांना प्रयत्न करू द्या.' असे म्हणत तो आजोबांना घेऊन तिथे आला. आजोबा निवृत्त तांत्रिक अभियंता होते. तरुण अभियंत्यांनी आजोबांची टिंगल केली. जे आम्हाला जमले नाही, ते आजोबांना कुठून जमणार आहे, अशा आविर्भावात ते कुत्सितपणे हसत होते. 

आजोबांनी मशीनची नीट पाहणी केली आणि बाजूला पडलेला हातोडा इंजिनावर जोरात मारला आणि घुर्घुर आवाज करत इंजिन सुरु झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आजोबांचे अभिनंदन केले. श्रीमंत व्यापाऱ्याने खुश होऊन आजोबांना एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. ते पैसे एका हातात घेत आजोबांनी दुसरा हात पुढे करत म्हटले, बाकीचे एकोणीस हजार रुपये सुद्धा द्या!'

त्यावर व्यापारी म्हणाला, 'एक हातोडा मारण्याचे वीस हजार रुपये?'आजोबा म्हणाले, 'एक हजार रुपये हातोडा मारण्याचे आणि एकोणीस हजार रुपये योग्य जागी मारण्याचे!' 

तात्पर्य हेच, की दरवेळी फक्त ज्ञान कामी येते असे नाही, तर ज्ञानाला अनुभवाचीही जोड असावी लागते. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना मान देतो. कारण ती ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असतात. असे आजोबा तुम्हालाही भेटले तर त्यांची टिंगल न करता त्यांच्या ज्ञानाचा जरूर वापर करा.