शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Ganesh Festival 2022: किशोरवयीन विद्यार्थी करताहेत सार्थ अर्थवशीर्षाचा प्रसार; ज्ञान प्रबोधिनी दलाचा कौतुकास्पद उपक्रम! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 6, 2022 16:33 IST

Ganesh Festival 2022: पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी दलामध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीदेखील संस्कृत आणि मराठीत रचलेले समश्लोकी अथर्वशीर्ष अस्खलितपणे म्हणतात; वाचा अधिक माहिती!

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

गणरायाची महती समजून घ्यायची असेल तर त्याचे सार गणपती अथर्वशीर्षात एकवटले आहे. परंतु हे स्तोत्र संस्कृतमध्ये असल्याने ते म्हणणे आणि समजून घेणे अनेकांना अवघड वाटते. यासाठीच पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी युवक विभागाच्या दलाने २००३ पासून पाचवी ते सातवी या वयोगटातील मुलांना मराठीतून अथर्वशीर्ष शिकवायला सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास दीड ते दोन हजार मुलांना मराठी आणि संस्कृतमध्ये अथर्वशीर्ष मुखोद्गत झाले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संस्कृती रुजवायची, टिकवायची आणि वृद्धिंगत करायची असे सर्वांना वाटते, परंतु त्याचा मूळ पाया असतो तो म्हणजे संस्कृतीचा मूळ उद्देश समजून घेण्याचा; ज्ञानप्रबोधिनीचे दल याच गोष्टीवर काम करते. सार्थ, सामूहिक आणि सुरचित या त्रिसूत्रीच्या आधारावर तिथे संस्कृती मूल्य जोपासले जाते. सार्थ अर्थात अर्थासहित, सामूहिक म्हणजे सर्वांना घेऊन आणि सुरचित म्हणजे रचनांचा योग्य क्रम लक्षात घेऊन हिंदू परंपरा, सण वार, श्लोक, संस्कार याचे महत्त्व तिथे शिकवले जाते. शिक्षण, संशोधन, विज्ञान, संघटन अशा अनेक विषयांवर ते काम करतात. शालेय तसेच महाविद्यालयीन मुले या उपक्रमात सहभागी होतात. अथर्वशीर्ष पठण हादेखील त्यातलाच एक भाग!

अथर्वशीर्षाचे श्लोक नुसते पाठ न करता ते अर्थासहित समजून घेतले आणि समश्लोकी म्हटले तर म्हणणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला जास्त भावतात. समश्लोकी अर्थात एक श्लोक संस्कृताचा तर दुसरा मराठीचा. भगवद्गीता व गीताई समश्लोकी म्हटली जाते. त्याच आधारे ज्ञानप्रबोधिनीने समश्लोकी अथर्वशीर्षाची सुरुवात केली. 

गणेशोत्सवापूर्वी दीड महिना आधीपासून अथर्वशीर्ष पठणाचे सराव वर्ग सुरू होतात. विविध शाळांमधील पाचवी ते सातवी इयत्तेतील मुले ज्ञान प्रबोधिनीच्या दलात अथर्वशीर्षाचे उत्साहाने पाठांतर करतात. अर्थ समजून घेतात आणि गणेशोत्सवात कोणाच्या घरी जाऊन, कोणी मंडळात जाऊन तर कोणी इतर उत्सवाच्या निमित्ताने या श्लोकांचे सादरीकरण करतात. शांत, सुस्वरात समश्लोकी अथर्वशीर्ष ऐकताना अनेकदा श्रोत्यांनाही नवे काहीतरी उमगल्याचा आनंद होतो. यंदाही जवळपास १५० हून अधिक मुलांनी ३००० कुटुंबांपर्यंत समश्लोकी अथर्वशीर्ष पोहोचवले आहे. 

ज्ञान प्रबोधिनीची मुख्य केंद्रे - पुणे,निगडी,सोलापूर,हराळी,साळुंब्रे,वेल्हे या विभागात आहेत, तर विस्तार केंद्रे - अंबाजोगाई, डोंबिवली, बोरिवली, चिपळूण, ठाणे या परिसरात आहेत. ज्ञान प्रबोधिनी युवक दलाचे अखिलेश कसबेकर (९३२५६३६८८८) यांनी ही माहिती दिली. 

बालपणी शिकलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात, पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात. सद्यस्थितीत मोबाईल, गेम, इंटरनेटच्या आहारी गेलेल्या मुलांना आपल्या संस्कृतीची अशा पद्धतीने ओळख करून देणे, त्यांना आवड लावणे आणि त्यांचे कुतूहल जागृत करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ते काम ज्ञानप्रबोधिनी समर्थपणे करत आहे. हीच खऱ्या अर्थाने सांस्कृतिक जपणूक म्हटली पाहिजे, नाही का? 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवdnyanprabodhiniज्ञान प्रबोधिनी