शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

प्रभू श्रीरामचंद्रांनीदेखील लंकेवर आक्रमणापूर्वी केले होते 'विजया' एकादशीचे व्रत!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 8, 2021 04:30 IST

इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते. 

माघ कृष्ण एकादशीला 'विजया' एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीचे व्रत केल्याने जय प्राप्त होतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा नाश करण्यासाठी लंकेवर केलेल्या स्वारीमध्ये जय प्राप्त व्हावा म्हणून बक दाल्भ्य ऋषींच्या सांगण्यानुसार समुद्राच्याकाठी हे व्रत वानरसेनेसह केले होते. परिणामी या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे रावणासह असंख्य राक्षसांचा वध होऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय झाला होता. यंदा मंगळवारी अर्थात ९ मार्च रोजी विजया एकादशी आहे.

एकादशी ही भगवान विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी व्हावी, आपल्या हातून उपासना घडावी, व्रतामध्ये सातत्य राहावे, यासाठी अनेक जण श्रद्धेने महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा उपास करतात. हा उपास इतर उपासासारखा एक वेळ किंवा एकभुक्त नसून दोन्ही वेळेस फलाहार करून किंवा काहीही न खाता करायचा असतो. आपल्या शारीरिक गरजा न थांबणाऱ्या आहेत. त्यावर नियंत्रण मिळवणे, मनावर ताबा मिळवणे आणि मन सन्मार्गी लावणे, हा एकादशी व्रताचा मुख्य हेतू असतो. जेव्हा आपण देहाची आसक्ती कमी करू, तेव्हाच आपल्या हातून हरीनाम घडू शकेल. यासाठी एकादशी व्रताची आखणी केली आहे. 

विजया एकादशीबाबत म्हणायचे, तर प्रभू रामचंद्रांनी हे व्रत केल्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे. इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते. 

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आपल्या कामात विजय हवा असतो. या विजया एकादशी व्रताने जसा रामाला रावणाशी केलेल्या युद्धात विजय मिळाला, तसा आपल्यालाही मिळेल अशा केवळ मानसिक बळानेही आपल्याला मोठा आधार वाटेल. मनोबलाच्या आधारेच तर आपण प्रतिकू लतेवर जय मिळवू शकतो. प्रयत्न करण्यासाठी ज्या मानसिक आधाराची गरज असते, तो ह्या व्रताने नक्कीच मिळू शकेल. मन:शांती, ताणतणावर कमी करण्यासाठी अशी व्रते फार उपयोगी ठरतात.