शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

दुर्योधन आपले पाप कृष्णाला अर्पण करायला निघाला होता; स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेला दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:45 IST

निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो.

स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती आहे. फाल्गुन शुक्ल द्वितीयेला त्यांचा जन्म झाला. तिथीनुसार आज म्हणजे १५ मार्च रोजी त्यांची जयंती आहे. रामकृष्ण परमहंस महाकाली मातेचे परमभक्त होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्वामी विवेकानंदांना तसेच समस्त शिष्यगणांना शिकवलेला कर्मयोग आपणही समजून घेऊया. 

कर्मयोग म्हणजे कर्मातून केलेली ईश्वर सेवा. निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो. आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून ईश्वर प्राप्ती हे ध्येय ठेवून कर्मयोग आत्मसात करता येतो. त्यामुळे आपोआपच विषयातील आसक्ती कमी होऊन ईश्वर चरणी मन गुंतून राहते. 

कर्मातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. साधा विचार करणे, हे सुद्धा कर्म आहे परंतु त्या विचारात भगवंत आहे किंवा भगवंताच्या कार्याचा विचार आहे, तर तो देखील कर्मयोगच आहे. आपले प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करण्याच्या हेतूने धार्मिक विधींमध्ये शेवटी पळीभर पाणी ताम्हनात सोडून श्री कृष्णार्पणमस्तु म्हणतात. आपण जे देवाला अर्पण करतो, त्याच्या हजार पट पुण्य आपल्या पदरात पडते. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक केले पाहिजे. 

दुर्योधन आपले कुकर्म अर्थात पाप श्रीकृष्णाला अर्पण करायला निघाला होता, तेव्हा भीमाने त्या सावध करत म्हटले, तू जेवढी पापं कृष्णाच्या चरणी वाहशील त्याच्या हजार पट  पाप तुझ्या माथ्यावर चढेल. त्याचप्रमाणे आपणही भगवंताच्या चरणी चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगले योगदानच अर्पण केले पाहिजे, तरच हजार पट पुण्य आपल्या पदरात पडेल. 

प्रेम करायचेच असेल तर भगवंतावर करा. एकदा का त्याच्या प्रति आसक्ती निर्माण झाली, की अन्य भौतिक सुखांची गोडी वाटणार नाही. ती सुखं क्षणभंगुर आहेत, हे जाणवत राहील आणि तुम्ही कर्मयोगापासून कधीच दूर होणार नाही. आपले काम प्रामाणिकपणे करणे आणि भगवंताला साक्ष ठेवून करणे हा खरा भक्तियोग!

रामकृष्ण परमहंस यांचे सुंदर विचार आचरणात आणून स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचा आणि साऱ्यांचा जसा उत्कर्ष केला, तसा आपणही आपल्या आयुष्यात कर्मयोग अंगिकारण्याचा प्रयत्न करूया.