शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दुर्योधन आपले पाप कृष्णाला अर्पण करायला निघाला होता; स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेला दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:45 IST

निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो.

स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती आहे. फाल्गुन शुक्ल द्वितीयेला त्यांचा जन्म झाला. तिथीनुसार आज म्हणजे १५ मार्च रोजी त्यांची जयंती आहे. रामकृष्ण परमहंस महाकाली मातेचे परमभक्त होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्वामी विवेकानंदांना तसेच समस्त शिष्यगणांना शिकवलेला कर्मयोग आपणही समजून घेऊया. 

कर्मयोग म्हणजे कर्मातून केलेली ईश्वर सेवा. निरिच्छ मनाने केलेले कोणतेही सत्कर्म , सेवा ईश्वराच्या चरणी रुजू होते. संसारात राहूनही कर्मयोग साधता येतो. आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून ईश्वर प्राप्ती हे ध्येय ठेवून कर्मयोग आत्मसात करता येतो. त्यामुळे आपोआपच विषयातील आसक्ती कमी होऊन ईश्वर चरणी मन गुंतून राहते. 

कर्मातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. साधा विचार करणे, हे सुद्धा कर्म आहे परंतु त्या विचारात भगवंत आहे किंवा भगवंताच्या कार्याचा विचार आहे, तर तो देखील कर्मयोगच आहे. आपले प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करण्याच्या हेतूने धार्मिक विधींमध्ये शेवटी पळीभर पाणी ताम्हनात सोडून श्री कृष्णार्पणमस्तु म्हणतात. आपण जे देवाला अर्पण करतो, त्याच्या हजार पट पुण्य आपल्या पदरात पडते. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक केले पाहिजे. 

दुर्योधन आपले कुकर्म अर्थात पाप श्रीकृष्णाला अर्पण करायला निघाला होता, तेव्हा भीमाने त्या सावध करत म्हटले, तू जेवढी पापं कृष्णाच्या चरणी वाहशील त्याच्या हजार पट  पाप तुझ्या माथ्यावर चढेल. त्याचप्रमाणे आपणही भगवंताच्या चरणी चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगले योगदानच अर्पण केले पाहिजे, तरच हजार पट पुण्य आपल्या पदरात पडेल. 

प्रेम करायचेच असेल तर भगवंतावर करा. एकदा का त्याच्या प्रति आसक्ती निर्माण झाली, की अन्य भौतिक सुखांची गोडी वाटणार नाही. ती सुखं क्षणभंगुर आहेत, हे जाणवत राहील आणि तुम्ही कर्मयोगापासून कधीच दूर होणार नाही. आपले काम प्रामाणिकपणे करणे आणि भगवंताला साक्ष ठेवून करणे हा खरा भक्तियोग!

रामकृष्ण परमहंस यांचे सुंदर विचार आचरणात आणून स्वामी विवेकानंद यांनी स्वतःचा आणि साऱ्यांचा जसा उत्कर्ष केला, तसा आपणही आपल्या आयुष्यात कर्मयोग अंगिकारण्याचा प्रयत्न करूया.