शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

...म्हणतात ना, 'ज्याचं जळतं, त्याला कळतं'; वाचा ही मार्मिक व मजेदार गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 10, 2021 16:23 IST

समोरच्याला नावं ठेवण्याआधी एकदा, स्वत:ला त्याचा जागी नक्कीच ठेवून पहा.

दुसऱ्याचे सांत्वन करताना आपण म्हणतो, 'मी समजू शकतो', वास्तविक पाहता, कोणीही कोणाचे दु:खं समजून घेऊ शकत नाही. आपबिती आल्याशिवाय दु:खाची झळ कळत नाही. म्हणून कोणाचे दु:खं समजून घेता आले, तरी हरकत नाही, पण समोरच्याला नावं ठेवण्याआधी एकदा, स्वत:ला त्याचा जागी नक्कीच ठेवून पहा. वाचा ही मार्मिक आणि मजेदार गोष्ट.

एका शेठजींकडे पाळीव कुत्रा होता. तो त्यांना अतिशय प्रिय होता. ते त्याला जीवापाड जपत असत. ते जिथे जात, तिथे त्यालाही नेत असत. कुत्र्यालादेखील शेठजींचा लळा होता. जणू काही दोघांचा गेल्या जन्मीचा ऋणानुबंध असावा, असे परस्परांशी नाते होते. 

एकदा शेठजींना व्यवहारासाठी परगावी जावे लागणार होते. नौकाप्रवासाशिवाय पर्याय नव्हता. याआधी त्यांनी आपल्या कुत्र्याला इतक्या दूर नेले नव्हते. त्याला घरी सोडून जाण्यासाठी त्यांचा जीव होईना. त्याला सोबत न्यावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना शेठजी प्रवासाचे सामान घेऊन जायला निघाले, तो कुत्रा त्यांच्याआधी जायला हजर! शेवटी त्यांनी कुत्र्याला सोबत घेतले. 

नावड्याने त्याला प्रवेश नाकारला. शेठजींनी बरीच मनधरणी केल्यावर कुत्र्यालाही नावेत घेण्यात आले. त्या नावेने आणखीही काही प्रवासी प्रवास करत होते. नावाडी नाव वल्हवत दुसऱ्या तीराच्या दिशेने नेत होता. प्रवास सुरू होता. पाण्यावर हलणाऱ्या नावामुळे कुत्रा त्या प्रवासात घाबरला होता. तो भीतीने इथून तिथे धावपळ करत होता. त्याची अस्वस्थता पाहून अन्य प्रवासी घाबरले. अंग चोरून बसू लागले. त्या सगळ्यांच्या हालचालींमुळे नावही डोलू लागली. नदीच्या मध्यावर नाव पोहोचली होती. थोडा जरी तोल गेला, तरी नावेचा अपघात निश्चित होता. कुत्र्याला कसे आवरावे शेठजींना कळेना. त्यांचीही तारांबळ उडाली. 

त्या नावेत एक आजोबा होते. ते शेठजींना म्हणाले, यावर मी तोडगा काढू का? शेठजींनी नाईलाजाने मान डोलवली. आजोबांनी एक दोन तरुणांना हाताशी घेऊन कुत्र्याला पकडले आणि शेठजींच्या डोळ्यादेखत पाण्यात फेकले. शेठजी ओरडू लागले. सगळ्याच प्रवाशांना आजोबांच्या अशा वागण्याचा धक्का बसला. आजोबांनी शेठजींसह सगळ्यांना शांत केले. तेवढ्यात कुत्रा पोहत, जीव वाचवत नावेच्या काठाला पकडून कुडकुडत होता. आजोबांनी त्याला वर ओढले आणि नावेत घेतले. कुत्रा गपचूप एका कोपऱ्यात जाऊन बसला. पण शेठजींचा राग अजूनही शांत झाला नव्हता.

यावर आजोबा शेठजींना म्हणाले, 'हे बघा, तुम्हाला माझा राग येणे स्वाभाविक आहे. पण हे मी आपल्या सर्वांच्या हितासाठी केले. तुमचा कुत्रा अजूनही इथून तिथे भीतीने पळत राहिला असता, तर त्याच्या भीतीने अन्य प्रवाशांपैकी कोणाचा तोल गेला असता. परिणामी एकामुळे पूर्ण नाव कलंडली असती. मात्र, आपल्याला वाटत असलेली भीती कुत्र्याला कळणार नव्हती. म्हणून मी त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली. पाण्यात पडल्यावर, नाकातोंडात पाणी गेल्यावर जीव मुठीत धरून कसे बसावे लागते, याची त्यालाही कल्पना आली. म्हणून तो गुमान कोपऱ्यात जाऊन बसला आहे.

आजोबांच्या या तोडग्यावर शेठजींना हसू की रडू असे झाले. काही का असेना, पण कुत्र्याचा इतरांना होणारा उपद्रव थांबला आणि पूर्ण प्रवासात शेठजींना आपल्या लाडक्या कुत्र्याची साथ मिळाली. 

तात्पर्य हेच, की समोरच्याला बोलण्याआधी शंभर वेळा विचार करा. कुठली व्यक्ती कोणत्या परिस्थितीचा सामना करत असेल, याची आपल्याला कल्पनाही नसते. आपण बाह्य परिस्थिती पाहून निष्कर्ष लावून मोकळे होतो. म्हणूनच म्हणतात, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं!