शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 7, 2020 15:40 IST

माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला काहीच मिळाले नाही तर? या विचाराने घाबरतो-व.पु.

ठळक मुद्देमाणसं आडवी गेली, की मांजराचीही कामे होत नाहीत!इजिप्तमध्ये मांजरांची पूजा होते.

ज्योत्स्ना गाडगीळ

अलीकडेच दोन मांजरींचा हृदयद्रावक किस्सा कानावर पडला. एक मांजर दुसऱ्या मांजरीचे सांत्वन करत होती. मी कानोसा घेतला, तर ती सांगत सांगत होती, 'आज सकाळच्या न्याहारीला आमच्याकडे उत्तम बेत होता, तो म्हणजे, मऊ, लुसलुशीत, गुबगुबीत, लांब शेपटीचा काळाभोर उंदिर! मुलांना मेन्यू सांगितला. मुले खुशीत होती. बोक्यासुद्धा डायनिंग टेबलवर माझी वाट बघत बसला होता. मात्र, मी उंदराचा पाठलाग करत असताना एक माणूस आडवा गेला. मनात म्हटले आजचा बेत फसणार. म्हणून बाजूने दुसऱ्या मांजरीला पुढे जाऊ दिले. ते गेल्यावर मग मी उंदराच्या मागे धूम ठोकली. तोवर, टॉम अँड जेरीतल्या कार्टुन मालिकेसारखी माझी अवस्था झाली. उंदराने मला 'जेरी'स आणले आणि माझ्या घरचे न्याहारी मिळाली नाही, म्हणून मलाच 'टॉम'णे मारू लागले.'

हा संवाद ऐकला आणि काळजाचे पाणी पाणी झाले. आजवर आपण मांजरांना दोष देत होतो. परंतु, ते सुद्धा आपल्याला दोष देतात, हे कळल्यावर मनात अपराधी भाव दाटून आला. याचा अर्थ, मांजर आडवे गेले, तर आपलेच नाही, तर त्याचेही काम होत नाही, असे म्हणायला हवे. माझ्या डोक्यात हे विचारचक्र सुुरू असताना, प्रख्यात लेखक व.पु.काळे यांचे वाक्य आठवले,

'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला काहीच मिळाले नाही तर? या विचाराने घाबरतो.'

हेही वाचा: पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

वरील रुपक कथेतून हीच बाब सांगण्याचा प्रयत्न आहे, की दुर्बल माणूस अपयशाची कारणे शोधतो. मग समोरून मांजर जावो नाहीतर अन्य कोणीही! 

तरीदेखील ८४ लक्ष योनी वगळून एकट्या मांजराच्या डोक्यावरच माणसाने अपयशाचे खापर का फोडले असावे? तर...मांजर अतिशय संशयास्पद नजरेने प्रत्येक गोष्टीकडे पाहत असते. गाय, म्हैस, कुत्रा, हे आपल्या परिसरात सहजतेने आढळणारे प्राणी बघा, त्यांच्या नजरेत असा संशयकल्लोळ आढळत नाही. ते बिचारे स्थितप्रज्ञ नजरेने सृष्टी पाहत असतात. तशीच संशयी दृष्टी कावळ्याची. तोही फार बारकाईने सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्याच्या डोळ्यात अल्ट्रा लेन्सेस असतात. म्हणून फार चिकित्सक असलेल्या व्यक्तीला 'काकदृष्टी' आहे, असे आपण म्हणतो. 

आपण दूध-पोळीवर समाधान मानतो, तशी मांजर दूध आणि उंदीर यावर समाधान मानते. त्यामुळे तिचे विशेष काही हट्ट नसतात. मात्र, ती एवढी चिवट असते, की तिला कितीही दूर नेऊन सोडा, ती दिशा कधीच विसरत नाही आणि मांजरपावलांनी बरोबर घरी येते. 

मांजरीचे फिस्कारून अंगावर येणे, तिच्या भांडकुदळ स्वभावाचे द्योतक आहे. गुरगुरत राहणे, समोरच्याकडे रागाने पाहणे, रात्रीच्या वेळी बाळ रडावे, तसे तासन् तास रडत राहणे, कोणाला आवडेल सांगा? म्हणून तिच्यावर हा राग. 

चांगल्या कामात कोणी शंका उपस्थित केली किंवा संशय व्यक्त केला, की आपली चिडचिड होते. तशीच कामासाठी बाहेर पडल्यावर मांजरीची संशयी नजर आपल्या नजरेस पडली, की त्रासदायक वाटते आणि काम झाले नाही, की आपण तिला दोषी ठरवतो.

मांजर, तीही काळी...!

आपण भारतीय कृष्णवर्णी, तरी आपल्याला काळा रंग आवडत नाही. 'लज्जा' चित्रपटात अनिल कपूरचा एक संवाद आहे, 'आपल्या देशात मुलगा काळाठिक्कर का असेना, त्याला मुलगी गोरीपानच लागते.' या गोऱ्या रंगाच्या प्रेमात पडूनच दीडशे वर्ष भारतीयांनी गुलामगिरीत काढली आणि पुनश्च त्याच दृष्टीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे, आधीच मांजर, तिही काळी, म्हणजे 'काम होणारच नाही' असे आपले मन परस्पर ठरवून टाकते. यात मांजरीचा काहीही दोष नसतो. दोष असतो, तो आपल्या कलुषित आणि भेदरलेल्या मनाचा.  इजिप्तमध्ये मांजरांची पूजा होते. आपल्याकडेही अनेक घरात उंदरापासून बचावासाठी मांजर पाळली जाते. कोकणात तर माणसं कमी आणि मांजरी जास्त, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ती इतकी माणसाळलेली असतात, की सतत पायात, हातात, जेवणाच्या ताटात घुटमळत असतात. तिथे मांजर 'आडवी' गेली, तरी कोकणी माणसांची `उभ्या उभ्या' असंख्य कामे सुरूच राहतात. 

हेही वाचा: 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

म्हणून, यापुढे मांजरांना दोष देणे सोडा आणि आपले अपयश आपण स्वीकारायला शिका. म्याऊऽऽऽ!