शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ज्ञान ईश्वरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 18:56 IST

अज्ञानाचा अंधार दूर करायचा तर आत्मज्ञानाचा प्रकाशच जरुरी आहे.

ज्यांचे अज्ञान आत्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला प्रकाशित करते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला प्रकाशीत करते. ज्ञान काय आहे ? आत्मज्ञानं परं ज्ञानम्। आत्मज्ञान हेच परम ज्ञान मानले गेले आहे. अज्ञानाला नेहमी अंधाराची उपमा दिली जाते आणि ज्ञानाला प्रकाशाची. अज्ञानाचा अंधार दूर करायचा तर आत्मज्ञानाचा प्रकाशच जरुरी आहे. आत्मज्ञानाने केवळ अंधारच दूर नाही होत तर आत्मज्ञानच परमला त्या परमात्म्यालाही सूर्याप्रमाणे प्रकाशीत करते असे भगवान म्हणताहेत. भौतिक प्रगती सोबतच आज भौतिक ज्ञानालाच महत्व आले आहे. निश्चित भौतिक ज्ञान हे मानवी जीवनाला फायदेशीर ठरले आहे. परंतु केवळ भौतिक ज्ञान श्रेष्ठ मानत, भौतिक सामुग्री जुटविण्यात व त्याचा उपभोग घेण्यात मनुष्य आत्मज्ञानाचे प्रकाशा अभावी अज्ञानाचे अंधारात विनाशाच्या गर्तेकडेही वाटचाल करीत आहे. आत्मज्ञान परम ईश्वराला प्रकाशीत करते तर भौतिकज्ञान भौतिकालाच प्रकाशीत करते. भौतिकज्ञानाने बाह्य अंधकार मनुष्याने कमी केला असला तरी मनुष्याचे अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार अजून गडद होत आहे. आत्मज्ञानाला प्रकाशाची उपमा यामुळेच दिल्या गेली आहे की, आत्मज्ञानाचे प्रकाशात जीवनात सार्थक काय व निरर्थक काय याची ओळख होते. मनुष्य ज्याला सार्थक ठरवितो ते सार्थक भ्रांतीरुप, स्वप्नरुप तर नाही ? हा विवेक ज्यावेळी प्रकाशीत होतो. ज्ञानाचे उदयाची सुरुवात होते. भ्रांतीचा गडद अंधार हळुहळु दूर होणे सुरु होते. मग वास्तवाचा व सत्याचा उदय होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले निरुपणात हेच समजावितात. जेव्हा अज्ञान पूर्णतः मिटते, तेव्हांच भ्रांतीचा काळोखही नाहीसा होतो. भ्रांती, भ्रम मिटला की, ईश्वर हा सर्व काही करुनही कसा अकर्ता आहे हे प्रगट होते, स्पष्ट होते. दुसरी महत्वाची गोष्ट चित्तात घडून येते की ईश्वर हा जर अकर्ता आहे तर स्वभावतः ईश्वर व मी आदिकाळा पासून एकच आहे तर मीही अकर्ताच ठरतो. असा विवेक जर चित्तात निर्माण झाला तर , त्या मनुष्याला तिन्ही लोकात भेद कुठे आला? त्या स्वानुबोधाने तो मग पाहू लागतो की अवघे जगच मुक्त आहे. ज्या प्रमाणे पूर्व दिशेच्या गाभारी जेव्हां सूर्योदय होऊन प्रकाशाची दिवाळी होते तेव्हां इतर दिशांचाही काळोख मिटून सर्व दिशा प्रकाशमय होतात. मग अशा व्यापक स्वरुपाचे ज्ञान ज्या योग्याला शोधित आले त्याचेत समदृष्टीचा बोध विशेषत्वाने बोलु लागतो.भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानेश्वर माऊलींना श्रध्दापूर्ण नमन !प्रा.रामदास डांगे सरांचे ज्ञानेश्वरीचे प्रतिशुध्दी कार्याला अभिवादन. शं.ना.बेंडे पाटील, अकोला.
टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक