शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

रामायणातील हा 'अवघड' प्रसंग अनेक स्त्रियांच्या आयुष्यात आजही येतो.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 18, 2021 15:15 IST

अनेकदा समज गैरसमजातून नात्यांची गुंतागुंत होते. हे सर्वसामान्य मानवी आयुष्यातील कंगोरे रामायणातही वाचायला मिळतात.

प्रात:स्मरणी पाच कन्यांमध्ये तारा या नावाचा समावेश आहे. वालीच्या पत्नीचे आणि अंगदाच्या मातेचे नाव जसे तारा होते, तसेच हरिश्चंद्राच्या पत्नीचे नावही तारा होते. त्यामुळे कोणत्या तारेचा सन्मान प्रात:कालीन वंदनात केला आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु, दोघींचाही गौरव त्यात आहे, असे आपण मानुया.

किष्किंधेच्या राज्यावर वाली नावाचा वानर राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव तारा आणि मुलाचे नाव अंगद. वालीच्या धाकट्या भावाचे नाव होते सुग्रीव. एकदा वाली आणि सुग्रीव, दुंदुभी राक्षसाचा भाऊ मायावी याचा पाठलाग करीत होते. मायावी एका मोठ्या गुहेत शिरल्यावर वालीही आत शिरला. त्याने सुग्रीवाला गुहेच्या दाराशी संरक्षण करण्याकरता ठेवले. त्यानंतर कित्येक महिने लोटले पण वाली बाहेर आला नाही. 

एक दिवस रक्ताचा मोठा प्रवाह गुहेतून बाहेर वाहत आला. सुग्रीवाला वाटले मायावी राक्षसाला वालीने ठार मारले असावे. तो आतुरतेने वालीची वाट बघत होता. पण वाली बाहेर आला नाही. गुहेत सारे सामसुम होते. गुहा बरीच खोल होती. त्यामुळे सुग्रीवाला वाटले वालीदेखील मेला असावा. तेव्हा गुहेच्या दारावर एक मोठी धोंड ठेवून तो किष्किंधेला परत आला. 

सर्वांच्या आग्रहास्तव सुग्रीवाने राज्यगादीवर बसण्याचे मान्य केले. परंतु पुढे काही महिन्यांनी वाली गुहेतून आला आणि त्याने सुग्रीवावर हल्ला केला तेव्हा सुग्रीवाचा पराजय होऊन तो ऋषमूक पर्वतावर पळाला. या पर्वतावर गेलास तर तुला मृत्यू येईल असा वालीला शाप मिळाला होता. त्यामुळे सुग्रीव त्या पर्वतावर सुरक्षित होता. पण वालीने सुग्रीवाची बायको तारा हिला सुग्रीवापासून हिरावून नेले होते. तारेने वालीचा मृत्यू झाला असे समजून सुग्रीवाशी पुनर्विवाह केला असावा. पुढे सुग्रीवाचे आणि रामाचे सख्य झाले. दोघे समदु:खी होते. दोघांनाही पत्नीचा विरह सहन करावा लागत होता. 

रामाने झाडाआडून बाण मारून, वाली सुग्रीव द्वंद युद्ध चालू असताना वालीला ठार मारले. तेव्हा तारा तिथे आली. तिने अनिवार शोक केला. वालीने उदार मनाने तारेला आणि सुग्रीवाला मरता मराता क्षमा केली होती. अखेर तारा आणि सुग्रीवाचे पुनर्मीलन झाले. वालीचा मुलगा अंगद याचा प्रेमाने सांभाळ करण्याचे आपले वचन सुग्रीवाने पाळले. अशी आहे ही तारा राणीची कथा. 

पुनर्विवाह रूढ झाल्यानंतरच्या काळात, पती लढाईत मृत्यू पावला असे समजल्यावर, एखाद्या स्त्रीने पुनर्विवाह करावा आणि अखेर तिचा पती युद्धातून सुखरूप परत यावा, असे घडले, तर तिच्या मनाची काय स्थिती होईल, याचे प्रात्यक्षिक वाली, तारा आणि सुग्रीव यांच्या गोष्टीत पाहावयाला सापडते. या प्रसंगात सुग्रीवाने दाखवले तसे सामंजस्य आताच्या काळातील लोक दाखवू शकतील का?