शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रामायणातील हा 'अवघड' प्रसंग अनेक स्त्रियांच्या आयुष्यात आजही येतो.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 18, 2021 15:15 IST

अनेकदा समज गैरसमजातून नात्यांची गुंतागुंत होते. हे सर्वसामान्य मानवी आयुष्यातील कंगोरे रामायणातही वाचायला मिळतात.

प्रात:स्मरणी पाच कन्यांमध्ये तारा या नावाचा समावेश आहे. वालीच्या पत्नीचे आणि अंगदाच्या मातेचे नाव जसे तारा होते, तसेच हरिश्चंद्राच्या पत्नीचे नावही तारा होते. त्यामुळे कोणत्या तारेचा सन्मान प्रात:कालीन वंदनात केला आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु, दोघींचाही गौरव त्यात आहे, असे आपण मानुया.

किष्किंधेच्या राज्यावर वाली नावाचा वानर राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव तारा आणि मुलाचे नाव अंगद. वालीच्या धाकट्या भावाचे नाव होते सुग्रीव. एकदा वाली आणि सुग्रीव, दुंदुभी राक्षसाचा भाऊ मायावी याचा पाठलाग करीत होते. मायावी एका मोठ्या गुहेत शिरल्यावर वालीही आत शिरला. त्याने सुग्रीवाला गुहेच्या दाराशी संरक्षण करण्याकरता ठेवले. त्यानंतर कित्येक महिने लोटले पण वाली बाहेर आला नाही. 

एक दिवस रक्ताचा मोठा प्रवाह गुहेतून बाहेर वाहत आला. सुग्रीवाला वाटले मायावी राक्षसाला वालीने ठार मारले असावे. तो आतुरतेने वालीची वाट बघत होता. पण वाली बाहेर आला नाही. गुहेत सारे सामसुम होते. गुहा बरीच खोल होती. त्यामुळे सुग्रीवाला वाटले वालीदेखील मेला असावा. तेव्हा गुहेच्या दारावर एक मोठी धोंड ठेवून तो किष्किंधेला परत आला. 

सर्वांच्या आग्रहास्तव सुग्रीवाने राज्यगादीवर बसण्याचे मान्य केले. परंतु पुढे काही महिन्यांनी वाली गुहेतून आला आणि त्याने सुग्रीवावर हल्ला केला तेव्हा सुग्रीवाचा पराजय होऊन तो ऋषमूक पर्वतावर पळाला. या पर्वतावर गेलास तर तुला मृत्यू येईल असा वालीला शाप मिळाला होता. त्यामुळे सुग्रीव त्या पर्वतावर सुरक्षित होता. पण वालीने सुग्रीवाची बायको तारा हिला सुग्रीवापासून हिरावून नेले होते. तारेने वालीचा मृत्यू झाला असे समजून सुग्रीवाशी पुनर्विवाह केला असावा. पुढे सुग्रीवाचे आणि रामाचे सख्य झाले. दोघे समदु:खी होते. दोघांनाही पत्नीचा विरह सहन करावा लागत होता. 

रामाने झाडाआडून बाण मारून, वाली सुग्रीव द्वंद युद्ध चालू असताना वालीला ठार मारले. तेव्हा तारा तिथे आली. तिने अनिवार शोक केला. वालीने उदार मनाने तारेला आणि सुग्रीवाला मरता मराता क्षमा केली होती. अखेर तारा आणि सुग्रीवाचे पुनर्मीलन झाले. वालीचा मुलगा अंगद याचा प्रेमाने सांभाळ करण्याचे आपले वचन सुग्रीवाने पाळले. अशी आहे ही तारा राणीची कथा. 

पुनर्विवाह रूढ झाल्यानंतरच्या काळात, पती लढाईत मृत्यू पावला असे समजल्यावर, एखाद्या स्त्रीने पुनर्विवाह करावा आणि अखेर तिचा पती युद्धातून सुखरूप परत यावा, असे घडले, तर तिच्या मनाची काय स्थिती होईल, याचे प्रात्यक्षिक वाली, तारा आणि सुग्रीव यांच्या गोष्टीत पाहावयाला सापडते. या प्रसंगात सुग्रीवाने दाखवले तसे सामंजस्य आताच्या काळातील लोक दाखवू शकतील का?