शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आदिमानवाने ईश्वराचे रूप कसे शोधले व भक्तीमार्ग कसा उदयास आला, त्याचे विवरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 10:16 IST

इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे. 

आपण त्या सर्वशक्तीमान जगन्नियंत्याला ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतो. तो जगदुत्पत्तिकर्ता, जगत्पालक व जगविनाशक आहे, अशी आपली पक्की धारण आहे. त्या महत्तम शक्तीला आपण ईश, ईश्वर, परमेश्वर, देव, देवता किंवा ब्रह्म म्हणतो. पण या शब्दांचे मूळ खरे अर्थ सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञ सर्वशक्तीमान, निर्गुण, निराकार, परमशक्ती होय. संस्कृतीदर्शन या पुस्तकात लेखक शंकर काश्यपे या ईशतत्त्वाचा सविस्तर खुलासा करताना लिहितात-

ईश म्हणजे ताब्यात ठेवणे, नियमन करणे, सत्ता चालवणे या विंâवा अश म्हणजे व्यापून राहणे या धातूपासून ईश्वर हा शब्द बनला आहे. तर देव म्हणजे जी दिव्य शक्ती अदृश्य रूपाने सर्वत्र संचार करते, भक्तांची श्रद्धा भक्ती उत्कट झाल्यावर जी दृश्य रूपानेही प्रकट होते, जी पूजा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करते, त्यांचे जीवन निर्भय, निराबाध करते, जी भक्ताजवळच असते, जिची पूजा अर्चा केल्याने प्रसन्न होते, जी सृष्टीतील पंचमहाभूते भक्ताला अनुकूल करते, ती शक्ती म्हणजे देव किंवा देवता.

इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे. 

आदिमानवाला ईश्वर हा निर्गुण, निराकार, सर्वशक्तीमान आहे याचा बोध झाला, तरी त्याची कल्पना, पूजा, भक्ती त्या स्वरूपात करता आली नाही. आदिमानवाने वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, महापूर, अतिवृष्टी, भूकंप इ. उत्पात पाहिले आणि आपण त्यांच्याशी सामना करू शकणार नाही हे जाणले. त्यांना वाटले की प्रचंड शक्तीच्या देवता आहेत. या देवतांनी आपले अहित, अशुभ करू नये म्हणून त्याने त्यांना नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गद्य-पद्य प्रार्थना केल्या.

या देवदेवता माणसाला क्रूर वाटल्या. पण माणूस जसजसा सुसंस्कृत होऊ लागला, तसतसा या देवता कृपाळू आहेत, त्यांची प्रार्थना केल्यास त्या आपल्याला सन्मार्ग दाखवतात हे लक्षात आल्यावर भक्तीमार्ग उदयास आला. 

या देवतांच्या मागे कोणती तरी अध्यात्मिक शक्ती वास्तव्य करते, असे वैदिक ऋषींच्या लक्षात आले आणि पुढे याच कल्पनेचे वेदान्ताच्या ब्रह्म कल्पनेत रूपांतर झाले. या देव देवता अवतार कार्य करणाऱ्या होत्या. म्हणजेच विशिष्ट उद्देश पूर्ण झाल्यावर अवतार कार्य संपवणाऱ्या होत्या. परंतु हे चराचर सांभाळणारी शक्ती अखंड कार्यरत होती.