शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आदिमानवाने ईश्वराचे रूप कसे शोधले व भक्तीमार्ग कसा उदयास आला, त्याचे विवरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 10:16 IST

इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे. 

आपण त्या सर्वशक्तीमान जगन्नियंत्याला ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतो. तो जगदुत्पत्तिकर्ता, जगत्पालक व जगविनाशक आहे, अशी आपली पक्की धारण आहे. त्या महत्तम शक्तीला आपण ईश, ईश्वर, परमेश्वर, देव, देवता किंवा ब्रह्म म्हणतो. पण या शब्दांचे मूळ खरे अर्थ सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञ सर्वशक्तीमान, निर्गुण, निराकार, परमशक्ती होय. संस्कृतीदर्शन या पुस्तकात लेखक शंकर काश्यपे या ईशतत्त्वाचा सविस्तर खुलासा करताना लिहितात-

ईश म्हणजे ताब्यात ठेवणे, नियमन करणे, सत्ता चालवणे या विंâवा अश म्हणजे व्यापून राहणे या धातूपासून ईश्वर हा शब्द बनला आहे. तर देव म्हणजे जी दिव्य शक्ती अदृश्य रूपाने सर्वत्र संचार करते, भक्तांची श्रद्धा भक्ती उत्कट झाल्यावर जी दृश्य रूपानेही प्रकट होते, जी पूजा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करते, त्यांचे जीवन निर्भय, निराबाध करते, जी भक्ताजवळच असते, जिची पूजा अर्चा केल्याने प्रसन्न होते, जी सृष्टीतील पंचमहाभूते भक्ताला अनुकूल करते, ती शक्ती म्हणजे देव किंवा देवता.

इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे. 

आदिमानवाला ईश्वर हा निर्गुण, निराकार, सर्वशक्तीमान आहे याचा बोध झाला, तरी त्याची कल्पना, पूजा, भक्ती त्या स्वरूपात करता आली नाही. आदिमानवाने वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, महापूर, अतिवृष्टी, भूकंप इ. उत्पात पाहिले आणि आपण त्यांच्याशी सामना करू शकणार नाही हे जाणले. त्यांना वाटले की प्रचंड शक्तीच्या देवता आहेत. या देवतांनी आपले अहित, अशुभ करू नये म्हणून त्याने त्यांना नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गद्य-पद्य प्रार्थना केल्या.

या देवदेवता माणसाला क्रूर वाटल्या. पण माणूस जसजसा सुसंस्कृत होऊ लागला, तसतसा या देवता कृपाळू आहेत, त्यांची प्रार्थना केल्यास त्या आपल्याला सन्मार्ग दाखवतात हे लक्षात आल्यावर भक्तीमार्ग उदयास आला. 

या देवतांच्या मागे कोणती तरी अध्यात्मिक शक्ती वास्तव्य करते, असे वैदिक ऋषींच्या लक्षात आले आणि पुढे याच कल्पनेचे वेदान्ताच्या ब्रह्म कल्पनेत रूपांतर झाले. या देव देवता अवतार कार्य करणाऱ्या होत्या. म्हणजेच विशिष्ट उद्देश पूर्ण झाल्यावर अवतार कार्य संपवणाऱ्या होत्या. परंतु हे चराचर सांभाळणारी शक्ती अखंड कार्यरत होती.