शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आदिमानवाने ईश्वराचे रूप कसे शोधले व भक्तीमार्ग कसा उदयास आला, त्याचे विवरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 10:16 IST

इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे. 

आपण त्या सर्वशक्तीमान जगन्नियंत्याला ईश्वर किंवा परमेश्वर म्हणतो. तो जगदुत्पत्तिकर्ता, जगत्पालक व जगविनाशक आहे, अशी आपली पक्की धारण आहे. त्या महत्तम शक्तीला आपण ईश, ईश्वर, परमेश्वर, देव, देवता किंवा ब्रह्म म्हणतो. पण या शब्दांचे मूळ खरे अर्थ सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञ सर्वशक्तीमान, निर्गुण, निराकार, परमशक्ती होय. संस्कृतीदर्शन या पुस्तकात लेखक शंकर काश्यपे या ईशतत्त्वाचा सविस्तर खुलासा करताना लिहितात-

ईश म्हणजे ताब्यात ठेवणे, नियमन करणे, सत्ता चालवणे या विंâवा अश म्हणजे व्यापून राहणे या धातूपासून ईश्वर हा शब्द बनला आहे. तर देव म्हणजे जी दिव्य शक्ती अदृश्य रूपाने सर्वत्र संचार करते, भक्तांची श्रद्धा भक्ती उत्कट झाल्यावर जी दृश्य रूपानेही प्रकट होते, जी पूजा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करते, त्यांचे जीवन निर्भय, निराबाध करते, जी भक्ताजवळच असते, जिची पूजा अर्चा केल्याने प्रसन्न होते, जी सृष्टीतील पंचमहाभूते भक्ताला अनुकूल करते, ती शक्ती म्हणजे देव किंवा देवता.

इंद्र, अग्नी, वरूण, शिव, विष्णू, काली, दुर्गा, गणपती इ. सर्व देवता आहेत, पण ईश्वर हा एकमेवाद्वितीय परमपुरुष आहे. 

आदिमानवाला ईश्वर हा निर्गुण, निराकार, सर्वशक्तीमान आहे याचा बोध झाला, तरी त्याची कल्पना, पूजा, भक्ती त्या स्वरूपात करता आली नाही. आदिमानवाने वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, महापूर, अतिवृष्टी, भूकंप इ. उत्पात पाहिले आणि आपण त्यांच्याशी सामना करू शकणार नाही हे जाणले. त्यांना वाटले की प्रचंड शक्तीच्या देवता आहेत. या देवतांनी आपले अहित, अशुभ करू नये म्हणून त्याने त्यांना नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गद्य-पद्य प्रार्थना केल्या.

या देवदेवता माणसाला क्रूर वाटल्या. पण माणूस जसजसा सुसंस्कृत होऊ लागला, तसतसा या देवता कृपाळू आहेत, त्यांची प्रार्थना केल्यास त्या आपल्याला सन्मार्ग दाखवतात हे लक्षात आल्यावर भक्तीमार्ग उदयास आला. 

या देवतांच्या मागे कोणती तरी अध्यात्मिक शक्ती वास्तव्य करते, असे वैदिक ऋषींच्या लक्षात आले आणि पुढे याच कल्पनेचे वेदान्ताच्या ब्रह्म कल्पनेत रूपांतर झाले. या देव देवता अवतार कार्य करणाऱ्या होत्या. म्हणजेच विशिष्ट उद्देश पूर्ण झाल्यावर अवतार कार्य संपवणाऱ्या होत्या. परंतु हे चराचर सांभाळणारी शक्ती अखंड कार्यरत होती.