शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

फाशीची शिक्षा मिळूनही प्रधानाने केला जन्मदिवसाचा जल्लोष, आणि शेवटी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 17:17 IST

संकटाच्या भीतीने आताच्या आनंदाचा क्षण गमवू नका. काय सांगावं? ज्या संकटाला घाबरतोय, ते कदाचित आपल्या वाट्याला येणारही नाही! 

एकदा एका राज्यात राजाचा न्यायदरबार भरला होता. त्यात एका तुरळक खटल्याचा निवाडा करताना राजाने रागारागात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली. तो गुन्हेगार त्याचा प्रधान होता आणि त्यादिवशी तो दरबारात गैरहजर होता. राजाने सैनिक पाठवले आणि प्रधानाला सूचना द्यायला सांगितली, 'आज संध्याकाळी ६ वाजता त्याला फाशी सुनावली जाणार आहे, त्याने शिक्षा भोगण्यास तयार राहावे!'

राजाचा निरोप घेऊन सैनिक प्रधानाच्या घरी पोहोचले. तिथे तर कौटुंबिक सोहळा रंगला होता. लोक नाचत गात होते. खमंग पदार्थांचा वास येत होता. गाण्यांचे आवाज कानावर पडत होते. सगळीकडे रोषणाई केली होती. चौकशी केल्यावर कळले, की त्या दिवशी प्रधानाचा वाढदिवस होता. सैनिकांना ही बातमी देताना खूप वाईट वाटले, पण निरोप देणे भाग होते. म्हणून त्यांनी प्रधानांना बाजूला बोलावले आणि राजाचा निरोप दिला. 

ही वार्ता कळताच माहोल स्तब्ध झाला. वातावरणात शोक कळा पसरली. प्रधानांनी मात्र निरोप ऐकून हसत राजाचे आभार मानले आणि सैनिकांना म्हणाला, 'राजासाहेबांचे फार उपकार झाले. त्यांनी सायंकाळची शिक्षा सुनावल्यामुळे आज माझा जन्मदिवसाचा सोहळा माझ्या सर्व आप्त जनांबरोबर साजरा करता येईल.' हे ऐकून सगळे अचंबित झाले. प्रधानाने सर्वांना सोहळ्याचा आनंद घेण्याची विनवणी केली. हृदयावर दगड ठेवून सगळे जण त्याच्या आनंदात सहभागी झाले. 

सैनिकांनी राजाला हा निरोप दिला. राजाला आश्चर्य वाटले, ज्याला आज फाशीची शिक्षा मिळणार आहे, ती व्यक्ती आपला जन्मदिवस साजरा करतेय? म्हणून राजा स्वतः प्रधानाच्या घरी पोहोचला. तिथे सगळा सोहळा पाहून तो चकित झाला. त्याने प्रधानाची भेट घेतली. प्रधानाने राजालाही आपल्या आनंदात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. 

राजा प्रधानाला म्हणाला, 'तुला शिक्षेची भीती वाटत नाही? तू चक्क आनंद साजरा करतोय?'प्रधान म्हणाला, 'राजेसाहेब, तुमच्यामुळे मला शेवटचा वाढदिवस पूर्ण साजरा करून मग जगाचा निरोप घेण्याची संधी मिळाली आहे. मग मी ही संधी का दवडावी? म्हणून मी आताचा क्षण जगून घेत आहे!'राजाने प्रधानसमोर हात जोडत म्हटले, 'तुझ्यासारख्या सकारात्मक विचारसरणीच्या लोकांची जगाला गरज आहे. तुम्ही जगले पाहिजे! तुझी शिक्षा मी रद्द करत आहे. असाच आनंद तू स्वतः घेत राहा आणि इतरांना देत राहा...!'

म्हणून संकटाच्या भीतीने आताच्या आनंदाचा क्षण गमवू नका. काय सांगावं? ज्या संकटाला घाबरतोय, ते कदाचित आपल्या वाट्याला येणारही नाही!