शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

फाशीची शिक्षा मिळूनही प्रधानाने केला जन्मदिवसाचा जल्लोष, आणि शेवटी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 17:17 IST

संकटाच्या भीतीने आताच्या आनंदाचा क्षण गमवू नका. काय सांगावं? ज्या संकटाला घाबरतोय, ते कदाचित आपल्या वाट्याला येणारही नाही! 

एकदा एका राज्यात राजाचा न्यायदरबार भरला होता. त्यात एका तुरळक खटल्याचा निवाडा करताना राजाने रागारागात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली. तो गुन्हेगार त्याचा प्रधान होता आणि त्यादिवशी तो दरबारात गैरहजर होता. राजाने सैनिक पाठवले आणि प्रधानाला सूचना द्यायला सांगितली, 'आज संध्याकाळी ६ वाजता त्याला फाशी सुनावली जाणार आहे, त्याने शिक्षा भोगण्यास तयार राहावे!'

राजाचा निरोप घेऊन सैनिक प्रधानाच्या घरी पोहोचले. तिथे तर कौटुंबिक सोहळा रंगला होता. लोक नाचत गात होते. खमंग पदार्थांचा वास येत होता. गाण्यांचे आवाज कानावर पडत होते. सगळीकडे रोषणाई केली होती. चौकशी केल्यावर कळले, की त्या दिवशी प्रधानाचा वाढदिवस होता. सैनिकांना ही बातमी देताना खूप वाईट वाटले, पण निरोप देणे भाग होते. म्हणून त्यांनी प्रधानांना बाजूला बोलावले आणि राजाचा निरोप दिला. 

ही वार्ता कळताच माहोल स्तब्ध झाला. वातावरणात शोक कळा पसरली. प्रधानांनी मात्र निरोप ऐकून हसत राजाचे आभार मानले आणि सैनिकांना म्हणाला, 'राजासाहेबांचे फार उपकार झाले. त्यांनी सायंकाळची शिक्षा सुनावल्यामुळे आज माझा जन्मदिवसाचा सोहळा माझ्या सर्व आप्त जनांबरोबर साजरा करता येईल.' हे ऐकून सगळे अचंबित झाले. प्रधानाने सर्वांना सोहळ्याचा आनंद घेण्याची विनवणी केली. हृदयावर दगड ठेवून सगळे जण त्याच्या आनंदात सहभागी झाले. 

सैनिकांनी राजाला हा निरोप दिला. राजाला आश्चर्य वाटले, ज्याला आज फाशीची शिक्षा मिळणार आहे, ती व्यक्ती आपला जन्मदिवस साजरा करतेय? म्हणून राजा स्वतः प्रधानाच्या घरी पोहोचला. तिथे सगळा सोहळा पाहून तो चकित झाला. त्याने प्रधानाची भेट घेतली. प्रधानाने राजालाही आपल्या आनंदात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. 

राजा प्रधानाला म्हणाला, 'तुला शिक्षेची भीती वाटत नाही? तू चक्क आनंद साजरा करतोय?'प्रधान म्हणाला, 'राजेसाहेब, तुमच्यामुळे मला शेवटचा वाढदिवस पूर्ण साजरा करून मग जगाचा निरोप घेण्याची संधी मिळाली आहे. मग मी ही संधी का दवडावी? म्हणून मी आताचा क्षण जगून घेत आहे!'राजाने प्रधानसमोर हात जोडत म्हटले, 'तुझ्यासारख्या सकारात्मक विचारसरणीच्या लोकांची जगाला गरज आहे. तुम्ही जगले पाहिजे! तुझी शिक्षा मी रद्द करत आहे. असाच आनंद तू स्वतः घेत राहा आणि इतरांना देत राहा...!'

म्हणून संकटाच्या भीतीने आताच्या आनंदाचा क्षण गमवू नका. काय सांगावं? ज्या संकटाला घाबरतोय, ते कदाचित आपल्या वाट्याला येणारही नाही!