शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

जिंकणे आणि हरणे हा तर खेळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 03:02 IST

‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?

-प्रल्हाद वामनराव पैएक आजोबा आपल्या नातवाबरोबर नेहमी कॅरम खेळत असत. नातू नेहमी जिंकावा म्हणून ते मुद्दाम हरत; पण त्याच्या बाबांबरोबर खेळताना मात्र बाबा त्याला कधी जिंकू देत नसत. तो त्या बाबांबरोबर खेळताना हरायचा. हरल्यामुळे त्याला रडू यायचे. एक दिवस आजोबांनी त्याला समजावले, ‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?’ तो पुन्हा म्हणाला, ‘नाही’. मग त्यांनी त्याला सांगितले, ‘जिंकणे आणि हरणे हा खेळाचा परिणाम आहे. तो आपण हसत-हसत स्वीकारला पाहिजे आणि जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा तो खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे, तरच खेळाचा आनंद सतत मिळेल!’ मित्रांनो, क्रिकेटची मॅच संपल्यावर आपण टी.व्ही.वर पाहतो, हरलेल्या संघाचे खेळाडू जिंकलेल्या खेळाडूंचे हसत-हसत अभिनंदन करत असतात. खेळ म्हटला की, कोणीतरी हरणार अन् कोणीतरी जिंकणार! म्हणून हे आपल्याला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आलं पाहिजे. फुटबॉलचा संघ एकदा जिंकतो. संघातील सगळे खेळाडू आनंद साजरा करत असतात; पण एवढा संघ जिंकूनही त्यातील एक खेळाडू मात्र नाराज असतो, कारण काय? तर त्या विजयी सामन्यात त्याला एकदाही चेंडू टोलवायला मिळालेला नसतो! म्हणजे संघभावनेपेक्षा वैयक्तिक आनंदाचा विचार तो जास्त करत होता. हेसुद्धा खिलाडूवृत्तीच्या अभावामुळेच होतं! मुलांनो, जीवन जगात असताना या खिलाडूवृत्तीची फार गरज असते. कारण अनेकांशी आपला रोज संबंध येत असतो. प्रत्येकाचा स्वभाव, वागणं, बोलणं वेगळं असतं; पण खिलाडूवृत्तीने आलेल्या प्रसंगाचा स्वीकार करायचा असतो. जिंकणं जसं महत्त्वाचं आहे तसंच ‘हरणं’ आनंदाने स्वीकारणंही! रडत स्वीकारलं तर त्रास होणार! हसत स्वीकारलं तर आपला अभ्यास, सराव कुठे कमी पडला, आपलं काय चुकलं, कोणतं ज्ञान मिळविलं पाहिजे, या विचाराने प्रगती नक्की साधाल!