शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिंकणे आणि हरणे हा तर खेळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 03:02 IST

‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?

-प्रल्हाद वामनराव पैएक आजोबा आपल्या नातवाबरोबर नेहमी कॅरम खेळत असत. नातू नेहमी जिंकावा म्हणून ते मुद्दाम हरत; पण त्याच्या बाबांबरोबर खेळताना मात्र बाबा त्याला कधी जिंकू देत नसत. तो त्या बाबांबरोबर खेळताना हरायचा. हरल्यामुळे त्याला रडू यायचे. एक दिवस आजोबांनी त्याला समजावले, ‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?’ तो पुन्हा म्हणाला, ‘नाही’. मग त्यांनी त्याला सांगितले, ‘जिंकणे आणि हरणे हा खेळाचा परिणाम आहे. तो आपण हसत-हसत स्वीकारला पाहिजे आणि जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा तो खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे, तरच खेळाचा आनंद सतत मिळेल!’ मित्रांनो, क्रिकेटची मॅच संपल्यावर आपण टी.व्ही.वर पाहतो, हरलेल्या संघाचे खेळाडू जिंकलेल्या खेळाडूंचे हसत-हसत अभिनंदन करत असतात. खेळ म्हटला की, कोणीतरी हरणार अन् कोणीतरी जिंकणार! म्हणून हे आपल्याला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आलं पाहिजे. फुटबॉलचा संघ एकदा जिंकतो. संघातील सगळे खेळाडू आनंद साजरा करत असतात; पण एवढा संघ जिंकूनही त्यातील एक खेळाडू मात्र नाराज असतो, कारण काय? तर त्या विजयी सामन्यात त्याला एकदाही चेंडू टोलवायला मिळालेला नसतो! म्हणजे संघभावनेपेक्षा वैयक्तिक आनंदाचा विचार तो जास्त करत होता. हेसुद्धा खिलाडूवृत्तीच्या अभावामुळेच होतं! मुलांनो, जीवन जगात असताना या खिलाडूवृत्तीची फार गरज असते. कारण अनेकांशी आपला रोज संबंध येत असतो. प्रत्येकाचा स्वभाव, वागणं, बोलणं वेगळं असतं; पण खिलाडूवृत्तीने आलेल्या प्रसंगाचा स्वीकार करायचा असतो. जिंकणं जसं महत्त्वाचं आहे तसंच ‘हरणं’ आनंदाने स्वीकारणंही! रडत स्वीकारलं तर त्रास होणार! हसत स्वीकारलं तर आपला अभ्यास, सराव कुठे कमी पडला, आपलं काय चुकलं, कोणतं ज्ञान मिळविलं पाहिजे, या विचाराने प्रगती नक्की साधाल!