शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

जिंकणे आणि हरणे हा तर खेळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 03:02 IST

‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?

-प्रल्हाद वामनराव पैएक आजोबा आपल्या नातवाबरोबर नेहमी कॅरम खेळत असत. नातू नेहमी जिंकावा म्हणून ते मुद्दाम हरत; पण त्याच्या बाबांबरोबर खेळताना मात्र बाबा त्याला कधी जिंकू देत नसत. तो त्या बाबांबरोबर खेळताना हरायचा. हरल्यामुळे त्याला रडू यायचे. एक दिवस आजोबांनी त्याला समजावले, ‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?’ तो पुन्हा म्हणाला, ‘नाही’. मग त्यांनी त्याला सांगितले, ‘जिंकणे आणि हरणे हा खेळाचा परिणाम आहे. तो आपण हसत-हसत स्वीकारला पाहिजे आणि जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा तो खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे, तरच खेळाचा आनंद सतत मिळेल!’ मित्रांनो, क्रिकेटची मॅच संपल्यावर आपण टी.व्ही.वर पाहतो, हरलेल्या संघाचे खेळाडू जिंकलेल्या खेळाडूंचे हसत-हसत अभिनंदन करत असतात. खेळ म्हटला की, कोणीतरी हरणार अन् कोणीतरी जिंकणार! म्हणून हे आपल्याला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आलं पाहिजे. फुटबॉलचा संघ एकदा जिंकतो. संघातील सगळे खेळाडू आनंद साजरा करत असतात; पण एवढा संघ जिंकूनही त्यातील एक खेळाडू मात्र नाराज असतो, कारण काय? तर त्या विजयी सामन्यात त्याला एकदाही चेंडू टोलवायला मिळालेला नसतो! म्हणजे संघभावनेपेक्षा वैयक्तिक आनंदाचा विचार तो जास्त करत होता. हेसुद्धा खिलाडूवृत्तीच्या अभावामुळेच होतं! मुलांनो, जीवन जगात असताना या खिलाडूवृत्तीची फार गरज असते. कारण अनेकांशी आपला रोज संबंध येत असतो. प्रत्येकाचा स्वभाव, वागणं, बोलणं वेगळं असतं; पण खिलाडूवृत्तीने आलेल्या प्रसंगाचा स्वीकार करायचा असतो. जिंकणं जसं महत्त्वाचं आहे तसंच ‘हरणं’ आनंदाने स्वीकारणंही! रडत स्वीकारलं तर त्रास होणार! हसत स्वीकारलं तर आपला अभ्यास, सराव कुठे कमी पडला, आपलं काय चुकलं, कोणतं ज्ञान मिळविलं पाहिजे, या विचाराने प्रगती नक्की साधाल!