शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

सज्जनगडावर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अशा पद्धतीने केली जाते 'दासनवमी!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 7, 2021 02:30 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये समर्थांनी केलेले जनजागृतीचे कार्य अनन्यसाधारण आहे. दासनवमीच्या दिवशीच नव्हे तर रोज निदान एक तरी श्रीदासबोधाचा समास प्रत्येकाने वेळात वेळ काढून अवश्य वाचावा. 

माघ कृष्ण नवमीला 'दासनवमी' असे म्हणतात. यंदा तारखेनुसार ७ मार्च आणि तिथीनुसार आजचाच तो दिवस! सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर या तिथीला श्रीसमर्थ रामदासस्वामींची पुण्यतिथी अतिशय भक्तिपूर्वक साजरी केली जाते. 'सज्जनगडवारी' म्हणून प्रतिवर्षी वारी करणारे महाराष्ट्रातील असंख्य समर्थभक्त या दिवशी गडावर येतात. मोठ्या श्रद्धेने समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांचे स्मरण करतात. याबाबत सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध ग्रंथात दिली आहे.

मुळात वारीचा हा सोहळा माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशीपर्यंत एकूण दहा दिवस चालतो. ह्यामध्ये ज्याला जेव्हा शक्य होईल, त्याप्रमाणे मंडळी गडवार दर्शनासाठी येतात. माघ कृष्ण पंचमीला समर्थांच्या सर्व शिष्यांच्या परंपरेतील शिष्य, महंत, अनुयायी आपापल्या मठांच्या पालख्यांसह साताऱ्यात येऊन दाखल होतात. त्यांची शहरातून मिरवणूक निघते. राजवाड्यासमोर या मिरवणुकीवर फुले गुलाल उधळून स्वागत केले जाते. नवमीच्या दिवशी गडावरील रामदासी मठाधीश भिक्षा मागतात. त्यांना भक्तमंडळींकडून भक्तिप्रेमपूर्वक भिक्षा घातली जाते. याच दिवशी म्हणजे नवमीला निर्वाणाचे कीर्तन केले जाते. दहा दिवस गडावर येणाऱ्या सर्व दर्शनार्थींसाठी महाप्रसादाची चोख व्यवस्था केली जाते. 

समर्थ रामदास स्वामींविषयीची सर्व विश्वसनीय माहिती आज आपल्याला त्यांच्या विविध चरित्रग्रंथरूपात उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये समर्थांनी केलेले जनजागृतीचे कार्य अनन्यसाधारण आहे. जीवनात पावलोपावली दक्ष राहून स्वत:ची आणि समाजाची उन्नती कशी साधता येईल, प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करता येईल, हे विचारधन समर्थांनी श्रीदासबोधातून आपल्या पुढील पिढ्यांसाठी भरभरून राखून ठेवले आहे, हे आपले केवढे महाभाग्य! म्हणूनच केवळ दासनवमीच्या दिवशीच नव्हे तर रोज निदान एक तरी श्रीदासबोधाचा समास प्रत्येकाने वेळात वेळ काढून अवश्य वाचावा. 

श्रीमनाचे श्लोकही सतत मनन पठनात असले, तर तेही उत्तमच. हल्ली या ग्रंथाच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. त्यादेखील ऐकता येतील. रोज अकरा श्लोक म्हणून मनाला बोध घ्यावा. तसेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून सज्जनगडावर यथाशक्ती दान करावे.