शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

आध्यात्मिकतेची संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 04:22 IST

कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

-सद्गुरू जग्गी वासुदेवमानवी बुद्धीने जीवन आणि त्यापलीकडे काय आहे, याचा शोध घेणे स्वाभाविक आहे.ङ्क्तजीवनाचे अवलोकन करणे आणि ते जाणून घेण्यासाठी आतुर असणे. वास्तविकता अशी असताना, तुम्ही अध्यात्म कसे टाळू शकता? दीर्घकाळापासून तुम्ही हे टाळत आला आहात. कारण जे तुम्ही नाही, अशा अनेक गोष्टींप्रती तुम्ही आसक्त झाला आहात आणि तुमची ओळख बांधली आहे. जेव्हा मी ‘जे तुम्ही नाही अशा गोष्टी’ असे म्हणतो, तेव्हा त्यात तुमचे शरीर आणि मनही सामील आहे. एकदा तुम्ही ‘जे नाही’ अशा गोष्टींसोबत तुमची ओळख बांधली की तुमची बुद्धी विकृत होते आणि मग ती काहीही स्पष्टपणे पाहू शकत नाही. कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

समजा तुम्ही म्हणालात, ‘मी एक स्त्री आहे.’ मग तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या भावना, सर्वकाही एका स्त्रीसारखे असणार. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या काही अवयवांसोबत तुमची ओळख जोडली. यासाठीच ‘आध्यात्मिक प्रक्रिया’ आवश्यक ठरतात. जर लोक सहज, निरागस असते तर अध्यात्म ही एक नैसर्गिक गोष्ट असली असती. तुमच्या सभोवताली दृष्टिक्षेप टाकणे आणि जीवनाच्या भौतिकतेच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव होणे फार स्वाभाविक आहे आणि हे जाणून घेणेही फार सोपे आहे; पण जगातील बहुतेक लोकांच्या हे लक्षात येत नाही ही आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही जर फक्त दोन मिनिटांसाठी डोळे बंद केले तर पाहाल की, तुम्ही शरीरापेक्षा जरा अधिक काहीतरी आहात हे लक्षात येईल. एक प्रकारे, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे की, आपल्याला लोकांना त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल आठवण करून द्यावी लागत आहे. आम्हाला आध्यात्मिक प्रक्रि या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा अशी इच्छा आहे. एक आई आपल्या मुलाला दात घासण्यास शिकविते त्याप्रमाणे, आपल्याला आध्यात्मिक प्रक्रियाही तशी व्हायला हवी आहे, कोणत्याही प्रयत्नांशिवाय.