शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

रामसेतूच्या बांधणीत 'हे' दोन बंधू होते मूळ स्थापत्यकार!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 1, 2021 09:00 IST

नल आणि नील यांना मिळालेला शाप रामसेतू बांधणीसाठी वरदान ठरला.

ज्योत्स्ना गाडगीळ 

रामसेतू आजही इतिहास संशोधकांपासून आध्यात्मिक क्षेत्रातील समस्त मंडळींसाठी कुतुहलाचा विषय आहे. रामसेतूशी निगडीत अनेक रोचक कथा वाचायला आणि ऐकायला मिळतात. तशीच एक छान कथा आहे, रामसेतूचे स्थापत्यकार म्हणून ज्यांनी भूमिका बजावली, त्या नल आणि नील या बंधूद्वयींची!

सीतेच्या शोधार्थ लंकेवर चाल करून जाताना रामाला अथांग समुद्राचा अडसर आला. एकट्या हनुमंताच्या खांद्यावर बसून राम आणि लक्ष्मण सहजपणे लंकेत पोहोचले असते. परंतु सबंध वानरसेना समुद्राच्या तीरावर खोळंबली असती. धर्मयुद्धासाठी मनाची एवढी तयारी करूनही केवळ समुद्र पार करता न आल्याने आपण युद्धात सहभागी होऊ शकलो नाही, याची त्यांना खंत वाटली असती. शिवाय रावण आणि त्याच्या सैन्याशी युद्ध करायचे म्हटल्यावर रामालासुद्धा वानरसेनेची निकड भासली असती. 

यावर उपाय म्हणून रामाने सागराला आवाहन केले. तीन दिवस सागरतटाशी बसून समुद्र देवतेला मार्ग मोकळा करून द्यावा अशी प्रार्थना केली. रामाची पूजा मान्य होईल आणि काहीतरी मार्ग निघेल या प्रतिक्षेत वानरसेना आशेवर होती. परंतु, नुसत्या प्रार्थनेत वेळ वाया जात असल्याने आणि दिवसेंदिवस सीतेचा विरह सहन होत नसल्याने रामाने आपल्याजवळील सर्वात प्रभावी ब्रह्मास्त्र सोडण्याचा निर्णय घेतला. 

ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी राम सिद्ध झाले, तो समुद्रातून देव प्रगट झाले आणि त्यांनी हात जोड ब्रह्मास्र सोडून प्रलय आणू नये, अशी विनंती केली. शिवाय दोन उपाय सांगितले. पहिला म्हणजे त्यांच्या सेनेत नल आणि नील नावाचे दोन भाऊ आहेत. ते बालपणी अत्यंत खोडकर होते. ऋषीमुनींना त्रास देत त्यांच्या वापरातल्या गोष्टी नदीत फेकून देत असत. त्यांच्या या खोड्यांना कंटाळून ऋषींनी त्यांना शाप दिला, तुम्ही पाण्यात टाकलेल्या वस्तू पाण्यात बुडणार नाहीत, तर पाण्यावर तरंगत राहतील.

नल आणि नील यांना मिळालेला शाप रामसेतू बांधणीसाठी वरदान ठरेल. त्यांनी समुद्र तटावरील दगडांवर श्रीराम लिहून समुद्रात दगड टाकावा. तो आपोआप तरंगत वर येईल आणि त्यांच्या हातून बांधला गेलेला सेतू दृढ ठेवण्यासाठी मी सहकार्य करेन. 

रामाने समुद्र देवाला अभिवादन केले आणि दुसरा उपाय कोणता हे विचारले. त्यावर समुद्र देव म्हणाले, `हे कार्य पूर्ण होईपर्यंत आपण शिवलिंग प्रस्थापित करून कार्यसिद्धी होण्यासाठी पूजा करावी.

असे बोलून समुद्र देव गुप्त झाले. वानरांनी जल्लोष केला आणि नल व नील या द्वयींनी रामकार्यात आपल्याला एवढे चांगले काम करायला मिळत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. वानरसेना कामाला लागली. नल व नील श्रीरामाचे नाव लिहून समुद्रात दगड टाकत गेले. दगड तरंगत गेले आणि पाहता पाहता या तीरापासून त्या तीरापर्यंत जोडणारा दगडांचा भरभक्कम सेतू बांधला गेला. 

त्यावेळेस रामाने शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ज्या शिवलिंगाची पूजा केली, ते शिवलिंग आज रामेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.