शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आधी स्वत:ला तपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 02:10 IST

ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.

- मोहनबुवा रामदासीएक भक्त होता. तो प.पू. गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला ‘महाराज! हा समाज सुधारला पाहिजे हो! ही समाजाची दु:ख वेदना पहावत नाहीत हो! आपणच काहीतरी करा.’ प.पू. महाराजांनी त्याचे ते आवेशपुर्व बोलणं ऐकले आणि एवढेच म्हणाले, ‘समाजातील दु:खे योग्य वेळी कमी होतीलच. पण समाजातील ही दु:खे तुला खरेच कमी व्हावीत असे वाटत असेल तर तू तुझ्या दु:खाची भर त्यात टाकू नकोस...’ म्हणून यासाठी समर्थही म्हणतात ‘पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।’ कोणत्याही समाजसुधारणेचा मूळ ज्ञानाचा अंकूर प्रत्येकाच्या अंत:करणात असतो. त्याचे संवर्धन विवेकसंपन्नतेने करता येणे अवश्यक आहे. दुसऱ्याला तपासण्यातच माणूस स्वत:ची युक्ती, शक्ती आणि बुद्धी वाया घालवतो. समर्थांनी समाजसुधारणेचा संकल्प रामापुढे केला व सुरवात स्वत:पासून केली. ते म्हणतातकेल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहीजे।यत्न तो देव जाणावा। अंतरी धरता बरे।।समाज सुधारणेसाठी समर्थांचे खूप बोलके विचार पहा.शरीर परोपकारी लावावे। बहुतांचे कार्यास यावे।उणे पडो नेदावे। कोणी एकाचे।आडले जाकसले जाणावे। यथानुशक्ती कामास यावे।मृदूवचने बोलीत जावे। कोणी एकासी।।दुसºयाच्या दु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।प्राणीमात्रास मेळवून घ्यावे। बºया शब्दे।।ही समर्थांची समाजसेवेची गीता आहे. म्हणून पंपू गोंदवलेकर महाराजही म्हणतात : ज्याने समाजसेवेचे व्रत घेतले असेल त्याने स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात त्या रामरायाचेच अस्तित्व आहे, या श्रद्धेने समाजसेवा करावी.समाजसेवा हीच खºया अर्थाने ईश सेवा असते. ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.