शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

आधी स्वत:ला तपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 02:10 IST

ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.

- मोहनबुवा रामदासीएक भक्त होता. तो प.पू. गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला ‘महाराज! हा समाज सुधारला पाहिजे हो! ही समाजाची दु:ख वेदना पहावत नाहीत हो! आपणच काहीतरी करा.’ प.पू. महाराजांनी त्याचे ते आवेशपुर्व बोलणं ऐकले आणि एवढेच म्हणाले, ‘समाजातील दु:खे योग्य वेळी कमी होतीलच. पण समाजातील ही दु:खे तुला खरेच कमी व्हावीत असे वाटत असेल तर तू तुझ्या दु:खाची भर त्यात टाकू नकोस...’ म्हणून यासाठी समर्थही म्हणतात ‘पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।’ कोणत्याही समाजसुधारणेचा मूळ ज्ञानाचा अंकूर प्रत्येकाच्या अंत:करणात असतो. त्याचे संवर्धन विवेकसंपन्नतेने करता येणे अवश्यक आहे. दुसऱ्याला तपासण्यातच माणूस स्वत:ची युक्ती, शक्ती आणि बुद्धी वाया घालवतो. समर्थांनी समाजसुधारणेचा संकल्प रामापुढे केला व सुरवात स्वत:पासून केली. ते म्हणतातकेल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहीजे।यत्न तो देव जाणावा। अंतरी धरता बरे।।समाज सुधारणेसाठी समर्थांचे खूप बोलके विचार पहा.शरीर परोपकारी लावावे। बहुतांचे कार्यास यावे।उणे पडो नेदावे। कोणी एकाचे।आडले जाकसले जाणावे। यथानुशक्ती कामास यावे।मृदूवचने बोलीत जावे। कोणी एकासी।।दुसºयाच्या दु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।प्राणीमात्रास मेळवून घ्यावे। बºया शब्दे।।ही समर्थांची समाजसेवेची गीता आहे. म्हणून पंपू गोंदवलेकर महाराजही म्हणतात : ज्याने समाजसेवेचे व्रत घेतले असेल त्याने स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात त्या रामरायाचेच अस्तित्व आहे, या श्रद्धेने समाजसेवा करावी.समाजसेवा हीच खºया अर्थाने ईश सेवा असते. ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.