शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

रोज सकाळी मोबाईल, लॅपटॉपआधी मनाचे चार्जिंग करून घ्या- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 5, 2021 09:00 IST

अतिश्रमामुळे जसे शरीर थकते, तसे अतिविचारामुळे मन थकते. त्याला गरज असते विश्रांतीची.

रोज सकाळी उठल्यापासून आपण यंत्रवत कामाला सुरू करतो.  सुटीचा दिवस वगळता आपल्या दिनचर्येत सहसा बदल होत नाही. मात्र, याच तोचतोपणामुळे आपले आयुष्यसुद्धा चाकोरीबद्ध झाले आहे. त्यावर पर्याय एकच, ज्याप्रमाणे उठल्यावर आपण मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगला लावतो, तसे रोज किमान तासभर आपल्या मनाचेही चार्जिंग करून घ्या, सांगत आहेत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी.

अतिश्रमामुळे जसे शरीर थकते, तसे अतिविचारामुळे मन थकते. त्याला गरज असते विश्रांतीची. परंतु आपण ती मिळूच देत नाही. सतत आपल्या मनावर, बुद्धीवर विचारांचा भडीमार करत राहतो. त्यामुळे मन योग्य दिशेने विचार करायचे सोडून चुकीच्या दिशेने विचार करू लागते. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी दिवसभरातील चोवीस तासांपैकी एक तास फक्त मनासाठी द्या. ते शांत असेल, तर बाह्य जगतात कितीही तणावाचे प्रसंग आले, तरी तुम्ही ते सहज हाताळू शकाल. 

आपल्याला स्वत:मध्ये बदल करायचा आहे. आपला प्रवास कलियुगाकडून सत्ययुगाच्या दिशेने न्यायचा आहे. सत्यनारायण पूजेत सांगितले जाते, ज्याचे कर्म चांगले तो नराचा नारायण होतो. याचा अर्थ सत्ययुगात नारायण आणि लक्ष्मीचे अस्तित्त्व होते, कलियुगात नर आणि नारीचे अस्तित्त्व आहे. परंतु, आपल्या चांगल्या कर्माने आपण कलियुगातही सत्ययुग आणू शकतो. त्यासाठी आपल्याठायी क्षमाशील वृत्ती हवी.

कोणाचे आभार मानायचे आहेत, कोणाचे माफी मागायची आहे, कोणाला मदत करायची आहे, कोणाशी हितगुज करायची आहे, तर आज करू उद्या करू म्हणत दिरंगाई करू नका. वर्तमानात जगा, आहे तो क्षण अनुभवून घ्या, जगून घ्या. ज्या क्षणी जे महत्त्वाचे आहे, त्या गोष्टी करून मोकळे व्हा. असे केल्यामुळे तुमच्या मनावर कसलेही ओझे राहणार नाही. मन आपोआप शांत राहील. शांत मन चांगल्या कामात रमवता येईल. तुम्ही प्रसन्न व्हाल आणि तुम्हाला पाहून इतरांनाही प्रसन्न वाटेल. 

या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे, फक्त मनाचे चार्जिंग विसरू नका.