शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

तुम्ही सुद्धा हे तावीज तुमच्या जवळ बाळगा आणि गरज असेल तेव्हा उघडा; वाचा ही बोधकथा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 19, 2021 18:35 IST

सुख-दु:खाचे भांडवल न करता, स्वत:ला सतत दिलासा द्या, 'ही वेळ निघून जाईल...!'

ज्योत्स्ना गाडगीळ 

एकदा अकबर राजाने बिरबलाला प्रश्न विचारला, की बिरबला, 'असे कोणते वाक्य आहे, जे सुख आणि दु:खं अशा दोन्ही प्रसंगात कामी येईल?' हजरजबाबी बिरबल लगेच म्हणाला, 'हे ही दिवस जातील!' सुखाचे क्षण असो नाहीतर दु:खाचे, ते फार काळ टिकत नाहीत, हे सत्य बिरबलाने एका वाक्यातून अकबराला पटवून दिले. अकबर खुश झाला. तेव्हापासून घराघरामधून हे वाक्य मोठ्या अक्षरात भिंतीवर कोरून ठेवले जाते. जेणेकरून आनंदाच्या भरात आपल्याला अहंकार आणि संकटाच्या काळात नैराश्य येत नाही. अशीच एक गोष्ट एका राजाच्या बाबतीतही घडली.

एका राजाकडे एक साधू आले. राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. राजाचा नम्रभाव आणि प्रजेप्रती असलेली जबाबदारीची जाणीव पाहता साधूंनी राजाला सुरक्षाकवच म्हणून एक तावीज दिले. आणि साधू म्हणाले, `राजा, हे तावीज साधेसुधे नाही, तर या तावीजच्या आत एक कागद आहे. त्यावर एक मंत्र लिहिला आहे. मात्र, तो मंत्र काय, हे आता विचारू नकोस किंवा उघडूनही पाहू नकोस. जेव्हा तू खूपच अडचणीत असशील, तेव्हाच हे तावीज उघडून बघ. असे सांगून साधू महाराज निघून गेले. 

एकदा राजा शिकारीला गेला होता. तेव्हा घनदाट अरण्यात वाघाची शिकार करता करता राजाची आणि सैनिकांची ताटातूट झाली. राजा एकटा पडला. वाट शोधत शोधत तो दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचला. ते शत्रूराज्य होते, हे त्याच्या लक्षात आले. तो एका गुपेâत लपून राहिला. सायंकाळ झाली होती. दुसऱ्या राज्यातल्या सीमेवरील पहारेकरी सीमेवर पाळत ठेवत जंगलातून पेâरफटका मारत होते. ते त्या गुहेजवळ आले. 

राजा आत लपून बसला होता. त्याच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. राजा दचकला. आज जर आपण शत्रू राष्ट्रातील सैनिकांच्या हाती लागलो, तर आपली कोणीही गय करणार नाही. तो श्वास रोखून गुहेत लपून बसला. त्याक्षणी तो एकाकी पडल्याने खूप घाबरला होता. त्याला साधूंची आठवण आली. त्याने गळ्यातले तावीज उघडून पाहायचे ठरवले. सैनिक जवळपास असल्याचे त्याला जाणवत होते. त्याने घाबरतच तावीज उघडले. त्यातील कागद उलगडून पाहिला. तर त्या कागदावर लिहिले होते, 'ही वेळही निघून जाईल.' साधूंनी मंत्ररूपाने लिहिलेले हे वाक्य वाचून राजाला धीर मिळाला. तो शांत बसून होता. 

सीमेवर कोणीही न दिसल्याने काही काळातच पहारेकरी तिथून निघून गेले. त्यांच्याबरोबरच घोड्यांच्या टापांचा आवाजही येईनासा झाला. राजाचा जीव भांड्यात पडला. तो रात्रभर गुहेत थांबला आणि सूर्योदय होताच जीव  मुठीत घेऊन आपल्या राज्यात परतला. 

प्रत्येकावर अशी वेळ, असा अवघड प्रसंग येतो. तेव्हा आपला धीर, संयम सुटतो. आपण उलट सुलट विचार करू लागतो. परंतु, तसे न करता, तावीजमध्ये बंदिस्त असलेला मंत्र आपणही लक्षात ठेवला, तर आपलीही अवघड परिस्थितीतून सहज सुटका होऊ शकते. म्हणून सुख-दु:खाचे भांडवल न करता, स्वत:ला सतत दिलासा द्या, 'ही वेळ निघून जाईल...!'