शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सुद्धा हे तावीज तुमच्या जवळ बाळगा आणि गरज असेल तेव्हा उघडा; वाचा ही बोधकथा

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 19, 2021 18:35 IST

सुख-दु:खाचे भांडवल न करता, स्वत:ला सतत दिलासा द्या, 'ही वेळ निघून जाईल...!'

ज्योत्स्ना गाडगीळ 

एकदा अकबर राजाने बिरबलाला प्रश्न विचारला, की बिरबला, 'असे कोणते वाक्य आहे, जे सुख आणि दु:खं अशा दोन्ही प्रसंगात कामी येईल?' हजरजबाबी बिरबल लगेच म्हणाला, 'हे ही दिवस जातील!' सुखाचे क्षण असो नाहीतर दु:खाचे, ते फार काळ टिकत नाहीत, हे सत्य बिरबलाने एका वाक्यातून अकबराला पटवून दिले. अकबर खुश झाला. तेव्हापासून घराघरामधून हे वाक्य मोठ्या अक्षरात भिंतीवर कोरून ठेवले जाते. जेणेकरून आनंदाच्या भरात आपल्याला अहंकार आणि संकटाच्या काळात नैराश्य येत नाही. अशीच एक गोष्ट एका राजाच्या बाबतीतही घडली.

एका राजाकडे एक साधू आले. राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. राजाचा नम्रभाव आणि प्रजेप्रती असलेली जबाबदारीची जाणीव पाहता साधूंनी राजाला सुरक्षाकवच म्हणून एक तावीज दिले. आणि साधू म्हणाले, `राजा, हे तावीज साधेसुधे नाही, तर या तावीजच्या आत एक कागद आहे. त्यावर एक मंत्र लिहिला आहे. मात्र, तो मंत्र काय, हे आता विचारू नकोस किंवा उघडूनही पाहू नकोस. जेव्हा तू खूपच अडचणीत असशील, तेव्हाच हे तावीज उघडून बघ. असे सांगून साधू महाराज निघून गेले. 

एकदा राजा शिकारीला गेला होता. तेव्हा घनदाट अरण्यात वाघाची शिकार करता करता राजाची आणि सैनिकांची ताटातूट झाली. राजा एकटा पडला. वाट शोधत शोधत तो दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचला. ते शत्रूराज्य होते, हे त्याच्या लक्षात आले. तो एका गुपेâत लपून राहिला. सायंकाळ झाली होती. दुसऱ्या राज्यातल्या सीमेवरील पहारेकरी सीमेवर पाळत ठेवत जंगलातून पेâरफटका मारत होते. ते त्या गुहेजवळ आले. 

राजा आत लपून बसला होता. त्याच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. राजा दचकला. आज जर आपण शत्रू राष्ट्रातील सैनिकांच्या हाती लागलो, तर आपली कोणीही गय करणार नाही. तो श्वास रोखून गुहेत लपून बसला. त्याक्षणी तो एकाकी पडल्याने खूप घाबरला होता. त्याला साधूंची आठवण आली. त्याने गळ्यातले तावीज उघडून पाहायचे ठरवले. सैनिक जवळपास असल्याचे त्याला जाणवत होते. त्याने घाबरतच तावीज उघडले. त्यातील कागद उलगडून पाहिला. तर त्या कागदावर लिहिले होते, 'ही वेळही निघून जाईल.' साधूंनी मंत्ररूपाने लिहिलेले हे वाक्य वाचून राजाला धीर मिळाला. तो शांत बसून होता. 

सीमेवर कोणीही न दिसल्याने काही काळातच पहारेकरी तिथून निघून गेले. त्यांच्याबरोबरच घोड्यांच्या टापांचा आवाजही येईनासा झाला. राजाचा जीव भांड्यात पडला. तो रात्रभर गुहेत थांबला आणि सूर्योदय होताच जीव  मुठीत घेऊन आपल्या राज्यात परतला. 

प्रत्येकावर अशी वेळ, असा अवघड प्रसंग येतो. तेव्हा आपला धीर, संयम सुटतो. आपण उलट सुलट विचार करू लागतो. परंतु, तसे न करता, तावीजमध्ये बंदिस्त असलेला मंत्र आपणही लक्षात ठेवला, तर आपलीही अवघड परिस्थितीतून सहज सुटका होऊ शकते. म्हणून सुख-दु:खाचे भांडवल न करता, स्वत:ला सतत दिलासा द्या, 'ही वेळ निघून जाईल...!'