शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मनाचे कल्पवृक्षात रूपांतर करता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:11 IST

विश्वात सगळ्यात अद्भुत यंत्र हे कॉम्प्युटर किंवा कार किंवा अंतराळयान पण नाही ते आहे माणसाचे मन.

मनाचे कल्पवृक्षात रूपांतर करणेसद्गुरू: या सृष्टीतील सगळ्यात अद्भुत यंत्र हे कॉम्प्युटर किंवा कार किंवा अंतराळयानही नाही तर ते मानवी मन आहे. ही सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे. जर तुम्हाला माहिती असेल की ते जागरूकपणे कसं वापरावं.

तुमचं मन पाच अवस्थांमध्ये असू शकतं. ते निद्रिय अवस्थेत असू शकतं. याचा अर्थ ते सक्रीय नाहीये, ते खूपच प्राथमिक अवस्थेत आहे. निद्रिय मन ही काही समस्या नाही. ज्याचं मन खूपच साधं असतं आणि ज्याची बुद्धिमत्ता कुशाग्र नाही त्याला काही त्रास नाही. तो नीट खातो, नीट झोपतो. केवळ विचार करणाऱ्या माणसांनाच झोपेची समस्या आहे. साध्या मनाचे लोक शरीराच्या सर्व क्रिया बुद्धिमान लोकांना पेक्षा खूप चांगल्या प्रकारे करतात कारण गोंधळासाठी साठी थोड्या बुद्धीमत्तेची आवश्यकता असते पण निद्रिय मन हे मानवी शक्यतांपेक्षा पशु प्रकृतीच्या जास्त जवळ असते.

ज्याक्षणी निद्रिय मनामध्ये तुम्ही थोडी ऊर्जा भरता, ते सक्रिय होते पण ते भरकटलेले असू शकते. जर तुम्ही त्यामध्ये अजून ऊर्जा भरलीत तर मग अशा स्थितीला पोहोचते जिथे भरकटलेले नसते पण ते दोलायमान असते. एक दिवस तिकडे जाते तर दुसऱ्या दिवशी तिकडे जाते. हे भरकटलेल्या मनापेक्षा खूप चांगले आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये अजून ऊर्जा भरली तर हळूहळू ते एकाग्र होत जाते. हे खूपच चांगले आहे. पण मन ही एक जागरूक प्रक्रिया होणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे.मर्कट मनयोगामध्ये एक खूप सुंदर कथा आहे. एक माणूस फिरायला जातो आणि अचानकपणे स्वर्गात पोहोचतो. खूप चालल्यावर तो थोडा दमतो आणि विचार करतो “मला आराम करायला जागा मिळाली असती तर किती झालं असतं”

मग त्याला एक सुंदर झाड दिसतं आणि त्याच्या खाली खूप छान मऊ गवत असते. मग तो तिथे जातो आणि त्या गवतावर झोपतो. काही तासानंतर तो आराम करून उठतो आणि मग विचार करतो “मला भूक लागली आहे, मला काही खायला मिळालं तर खूप बर होईल.” मग तो खूप सुंदर गोष्टींचा विचार करतो ज्या त्याला खायला हव्यात आणि त्या सगळ्या त्याच्यासमोर प्रकट होतात. त्याचं पोट भरल्यावर तो माणूस विचार करतो “मला प्यायला मिळालं तर बरं होईल” आणि हव्या असणाऱ्या सगळ्या पेयांचा तो विचार करतो आणि ती सर्व त्याच्यासमोर प्रकट होतात.

योगामध्ये मानवी मनाला मर्कट म्हणजेच माकड म्हटले आहे. कारण तीच त्याची प्रकृती आहे. माकड म्हणजेच नक्कल करणे होय. जर तुम्ही असं म्हणालात की तुम्ही माकडाप्रमाणे वागताय याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणाची तरी नक्कल करताय. हेच तुमच्या मनाचे पूर्णवेळ काम आहे. म्हणूनच अव्यवस्थित मनाला माकड म्हटले आहे.

जेव्हा त्याच स्वर्गात गेलेल्या माणसात हे माकड सक्रिय झाले, त्याने असा विचार केला “अरे बापरे हे काय घडतय, मी जेवण मागितलं, जेवण आलं, मी प्यायला मागितलं, पेय आली. कदाचित इथे भूतं असतील.” त्याने आजूबाजूला पाहिलं आणि तिथे भुतं होती. ज्या क्षणी त्याने त्यांना पाहिलं तो घाबरला आणि म्हणाला “अरे बापरे इथे भुतं आहेत, कदाचित ती मला त्रास देणार” आणि भुतांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, आणि तो दुःखाने ओरडायला किंचाळायला लागला. तो म्हणाला “ही भुते मला त्रास देतात ती मला ठार मारणार” आणि तो मेला.

समस्या ही होती की तो एका कल्पवृक्षाखाली बसला होता. त्याने जे मागितलं ते घडलं. सुव्यवस्थित मनाला कल्पवृक्ष म्हटले जाते. या मनामध्ये जे काही तुम्ही मागाल ते खरं होतं. आयुष्यात तुम्ही सुद्धा कायम कल्पवृक्षाखाली बसलेले असता म्हणूनच तुमचे मन हे कल्पवृक्ष होईपर्यंत विकसित करणे गरजेचे आहे. वेडेपणाचा स्रोत म्हणून नाही.