शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

रडत राहण्यापेक्षा हसत राहणे केव्हाही चांगले; वाचा ही बोधकथा!`

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 2, 2021 15:48 IST

उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात, ते मरणासमान आहे. त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे!'

रडायला कारण लागत नाही, पण हसायला कारण शोधावे लागते, अशी आजची परिस्थिती झाली आहे. आपण शेवटचे मनमोकळेपणाने केव्हा हसलो होतो, हेही  आता आठवावे लागेल. परंतु सतत रडून प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना? मग हसून प्रश्नांना सामोरे जायला तरी शिकूया!

तीन साधू असतात. त्यांचा पेहराव अगदी साधा. ते कोणाला उपदेश वगैरे करत नसत. परंतु ते ज्या गावी जात, तिथे गावाचा मध्य गाठून भर चौकात मोठमोठ्याने हसायला सुरुवात करत. कुठे भांडण सुरु झाले की आपण जसे कान टवकरतो, तसेच कुठून मोठमोठ्याने हसण्याचे आवाज आले, तरी आपण लगेच डोकावून पाहतो. हा मानवी स्वभावच आहे. साधूंच्या हसण्याने लोकांना प्रश्न पडत असे. पण हसण्याचे कारण न उमगल्याने बघणारेही साधुंसारखे अकारण हसायला लागत. एकाचे पाहून दुसऱ्याला हसू अनावर होत असे. दुसऱ्याचे पाहून तिसऱ्याला, तिसऱ्याचे पाहून चौथ्याला... असे करत गाव गोळा झाले आणि हसण्यात रममाण झाले, की साधू तिथून काढता पाय घेत पुढच्या गावी जात असत. 

हळू हळू साधूंच्या आधी त्यांची ख्याती गावोगावी पसरू लागली. लोक त्यांचे स्वागत करू लागले. पण कोणाकडून कसलीही सेवा न घेता, कोणाशीही बातचीत न करता साधूंनी आपला नेम सुरू ठेवला. गावोगावी हास्याचा मळा फुलवून साधू महाराज गावकऱ्यांना दैनंदिन दुःखातून काही क्षण आनंद देऊन जात असत. आपले दुःख विसरा आणि हसत राहा, दुःखही हसू लागेल आणि तुमचा निरोप घेईल. पण त्यासाठी तुम्ही हसत राहा, हा सुप्त संदेश ते लोकांना देत असत. 

एक दिवस बातमी आली, की तीन साधूंपैकी एका साधूचे निधन झाले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांना अतिशय दुःख झाले. त्या साधूचे अंतिम दर्शन घ्यायला आणि उर्वरित दोन साधूंचे सांत्वन करायला लोक दूरदूरहून अंत्यदर्शनाला पोहोचले. तिथे जाऊन पाहतो तर काय, उर्वरित दोन साधू नेहमीसारखे हसत होते. लोकांना आश्चर्य वाटले. कोणी त्यांना वेड्यात काढले, तर कोणी त्यांना अपमानास्पद बोलले, 'तुमचा मित्र गेला, त्याचा शोक करायचा सोडून तुम्ही हसताय, हा निर्लज्जपणा आहे!'

यावर साधू आणखी मोठ्याने हसले आणि म्हणाले, 'आमच्या शोक करण्याने आमचा मित्र परत येणार आहे का? जो गेला त्याच्यासाठी दुःख का? आज न उद्या सगळ्यांना जायचे आहे. तो उलट आम्हाला हरवून गेला, म्हणून जास्त हसू येत आहे. आम्हा तिघांमंध्ये पहिले कोण मरणार, अशी स्पर्धा लागलेली. ती स्पर्धा त्याने जिंकली आणि आम्ही हरलो. तो सुद्धा मेलाय तरी चेहऱ्यावर हास्य आहे की नाही बघा. तो तुम्हा सगळ्यांचे शोकाकुल चेहरे पाहून डोळे मिटून हसतोय. त्याला सुमनांजली नाही, तर हास्यांजली वहा आणि आनंदाने निरोप द्या. आम्ही पण तेच करतो.'

साधूंचे म्हणणे लोकांना पटले. गहिवरल्या डोळ्यांनी पण हास्यपूर्ण भावनेने त्यांनी साधूला निरोप दिला. तेव्हा उपदेशपर दोघे साधू म्हणाले, 'उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात, ते मरणासमान आहे. त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे!'