शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रडत राहण्यापेक्षा हसत राहणे केव्हाही चांगले; वाचा ही बोधकथा!`

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 2, 2021 15:48 IST

उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात, ते मरणासमान आहे. त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे!'

रडायला कारण लागत नाही, पण हसायला कारण शोधावे लागते, अशी आजची परिस्थिती झाली आहे. आपण शेवटचे मनमोकळेपणाने केव्हा हसलो होतो, हेही  आता आठवावे लागेल. परंतु सतत रडून प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना? मग हसून प्रश्नांना सामोरे जायला तरी शिकूया!

तीन साधू असतात. त्यांचा पेहराव अगदी साधा. ते कोणाला उपदेश वगैरे करत नसत. परंतु ते ज्या गावी जात, तिथे गावाचा मध्य गाठून भर चौकात मोठमोठ्याने हसायला सुरुवात करत. कुठे भांडण सुरु झाले की आपण जसे कान टवकरतो, तसेच कुठून मोठमोठ्याने हसण्याचे आवाज आले, तरी आपण लगेच डोकावून पाहतो. हा मानवी स्वभावच आहे. साधूंच्या हसण्याने लोकांना प्रश्न पडत असे. पण हसण्याचे कारण न उमगल्याने बघणारेही साधुंसारखे अकारण हसायला लागत. एकाचे पाहून दुसऱ्याला हसू अनावर होत असे. दुसऱ्याचे पाहून तिसऱ्याला, तिसऱ्याचे पाहून चौथ्याला... असे करत गाव गोळा झाले आणि हसण्यात रममाण झाले, की साधू तिथून काढता पाय घेत पुढच्या गावी जात असत. 

हळू हळू साधूंच्या आधी त्यांची ख्याती गावोगावी पसरू लागली. लोक त्यांचे स्वागत करू लागले. पण कोणाकडून कसलीही सेवा न घेता, कोणाशीही बातचीत न करता साधूंनी आपला नेम सुरू ठेवला. गावोगावी हास्याचा मळा फुलवून साधू महाराज गावकऱ्यांना दैनंदिन दुःखातून काही क्षण आनंद देऊन जात असत. आपले दुःख विसरा आणि हसत राहा, दुःखही हसू लागेल आणि तुमचा निरोप घेईल. पण त्यासाठी तुम्ही हसत राहा, हा सुप्त संदेश ते लोकांना देत असत. 

एक दिवस बातमी आली, की तीन साधूंपैकी एका साधूचे निधन झाले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांना अतिशय दुःख झाले. त्या साधूचे अंतिम दर्शन घ्यायला आणि उर्वरित दोन साधूंचे सांत्वन करायला लोक दूरदूरहून अंत्यदर्शनाला पोहोचले. तिथे जाऊन पाहतो तर काय, उर्वरित दोन साधू नेहमीसारखे हसत होते. लोकांना आश्चर्य वाटले. कोणी त्यांना वेड्यात काढले, तर कोणी त्यांना अपमानास्पद बोलले, 'तुमचा मित्र गेला, त्याचा शोक करायचा सोडून तुम्ही हसताय, हा निर्लज्जपणा आहे!'

यावर साधू आणखी मोठ्याने हसले आणि म्हणाले, 'आमच्या शोक करण्याने आमचा मित्र परत येणार आहे का? जो गेला त्याच्यासाठी दुःख का? आज न उद्या सगळ्यांना जायचे आहे. तो उलट आम्हाला हरवून गेला, म्हणून जास्त हसू येत आहे. आम्हा तिघांमंध्ये पहिले कोण मरणार, अशी स्पर्धा लागलेली. ती स्पर्धा त्याने जिंकली आणि आम्ही हरलो. तो सुद्धा मेलाय तरी चेहऱ्यावर हास्य आहे की नाही बघा. तो तुम्हा सगळ्यांचे शोकाकुल चेहरे पाहून डोळे मिटून हसतोय. त्याला सुमनांजली नाही, तर हास्यांजली वहा आणि आनंदाने निरोप द्या. आम्ही पण तेच करतो.'

साधूंचे म्हणणे लोकांना पटले. गहिवरल्या डोळ्यांनी पण हास्यपूर्ण भावनेने त्यांनी साधूला निरोप दिला. तेव्हा उपदेशपर दोघे साधू म्हणाले, 'उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात, ते मरणासमान आहे. त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे!'