शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! आपण मंथरेच्या सहवासात आहात की श्रीकृष्णाच्या? हे तपासून पहा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 11, 2021 16:49 IST

नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल.

आपला जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नाही, परंतु आपण संगत कोणाशी ठेवू शकतो, हे आपल्या हातात आहे. कारण, आपण ज्या व्यक्तींच्या, विचारांच्या सान्निध्यात राहतो, तसे आपले विचार घडत जातात. आपल्याही नकळत दुसऱ्यांच्या लकबी, शब्द आत्मसात होतात. विशेषत: वाईट गोष्टी चटकन अंगवळणी पडतात. उदाहरण द्यायचे, तर अपशब्द किंवा शिव्या मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते शिकतात आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र चांगले श्लोक, सुविचार त्यांना शिकवावे लागतात. नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. तरी ऐनवेळेवर त्यांना ते सुचतील, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देत, 'आपल्या पाल्याची संगत बदला.' हा नियम शाळेपुरता नाही, तर आयुष्यभराचा आहे.

बालपणी आपल्याला छान श्लोक शिकवला होता, तो आठवतोय का? चला उजळणी करू.सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो,कलंक मतीचा घडो, विषय सर्वथा नावडो,सदंध्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो,वियोग घडता रडो, मन भवत्चरित्री जडो!

याची आणखीही कडवी आहेत. परंतु, इथे पाहूया, या श्लोकाची पहिली ओळ. नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल. पण नाही. आपण सतत नकारात्मक गोष्टींच्या छायेत असतो आणि तसाच विचार करू लागतो. यासाठी रामायण आणि महाभारतातील दोन उदाहरणे पाहू.

'कैकयी' या नावाभोवती नकारात्मक छटा आहे. कारण, तिने रामाला वनवासाला पाठवून, आपला पूत्र भरत याच्यासाठी राज्यसिंहासन मागून घेतले होते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कैकयी आधी तशी नव्हती. कौसल्येपेक्षा रामावर ती जास्त प्रेम करत होती. एवढेच नाही, तर भरतापेक्षाही जास्त, ती रामाचे लाड करत असे. मग असे असतानाही ती एकाएक रामाच्या बाबतीत एवढी कठोर का झाली? तर उत्तर आहे, संगत! मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली. तिने तिचे वाईट आणि कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्या विचाराने विचार करू लागली, मग तिलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा केवळ कैकयीच्या नाही तर आपल्याही अवती भोवती असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. टीव्ही, इंटरनेट, महामालिका, चित्रपट, सोशल मीडिया इ. गोष्टी ज्ञानाबरोबर वाईट गोष्टींचाही प्रसार करत आहेत. त्यांचा पुरेसा वापर करून त्यांना चार हात लांब ठेवणे उत्तम!

दुसरे उदाहरण कृष्णाचे. युद्धाचा प्रसंग जवळ आलेला असताना दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाजवळ आले. कृष्णाने विचारले, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य? दुर्योधनाने सैन्य तर अर्जुनाने कृष्णाला मागून घेतले. याचा परिणाम असा झाला, की कुरुक्षेत्रावर लढण्याऐवजी अर्जुनाला नकारात्मक विचारांनी घेरले, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले. त्याच्या मनातील वाईट गोष्टी बाजूला करून चांगल्या गोष्टींसाठी, ध्येयासाठी, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याही आयुष्यात अर्जुनावर आली तशी वेळ वारंवार येत असते. तेव्हा आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल.

म्हणून आजपासून डोळसपणे पहा. आपण कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या, की कृष्णाच्या?