शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! आपण मंथरेच्या सहवासात आहात की श्रीकृष्णाच्या? हे तपासून पहा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 11, 2021 16:49 IST

नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल.

आपला जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नाही, परंतु आपण संगत कोणाशी ठेवू शकतो, हे आपल्या हातात आहे. कारण, आपण ज्या व्यक्तींच्या, विचारांच्या सान्निध्यात राहतो, तसे आपले विचार घडत जातात. आपल्याही नकळत दुसऱ्यांच्या लकबी, शब्द आत्मसात होतात. विशेषत: वाईट गोष्टी चटकन अंगवळणी पडतात. उदाहरण द्यायचे, तर अपशब्द किंवा शिव्या मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते शिकतात आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र चांगले श्लोक, सुविचार त्यांना शिकवावे लागतात. नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. तरी ऐनवेळेवर त्यांना ते सुचतील, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देत, 'आपल्या पाल्याची संगत बदला.' हा नियम शाळेपुरता नाही, तर आयुष्यभराचा आहे.

बालपणी आपल्याला छान श्लोक शिकवला होता, तो आठवतोय का? चला उजळणी करू.सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो,कलंक मतीचा घडो, विषय सर्वथा नावडो,सदंध्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो,वियोग घडता रडो, मन भवत्चरित्री जडो!

याची आणखीही कडवी आहेत. परंतु, इथे पाहूया, या श्लोकाची पहिली ओळ. नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल. पण नाही. आपण सतत नकारात्मक गोष्टींच्या छायेत असतो आणि तसाच विचार करू लागतो. यासाठी रामायण आणि महाभारतातील दोन उदाहरणे पाहू.

'कैकयी' या नावाभोवती नकारात्मक छटा आहे. कारण, तिने रामाला वनवासाला पाठवून, आपला पूत्र भरत याच्यासाठी राज्यसिंहासन मागून घेतले होते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कैकयी आधी तशी नव्हती. कौसल्येपेक्षा रामावर ती जास्त प्रेम करत होती. एवढेच नाही, तर भरतापेक्षाही जास्त, ती रामाचे लाड करत असे. मग असे असतानाही ती एकाएक रामाच्या बाबतीत एवढी कठोर का झाली? तर उत्तर आहे, संगत! मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली. तिने तिचे वाईट आणि कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्या विचाराने विचार करू लागली, मग तिलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा केवळ कैकयीच्या नाही तर आपल्याही अवती भोवती असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. टीव्ही, इंटरनेट, महामालिका, चित्रपट, सोशल मीडिया इ. गोष्टी ज्ञानाबरोबर वाईट गोष्टींचाही प्रसार करत आहेत. त्यांचा पुरेसा वापर करून त्यांना चार हात लांब ठेवणे उत्तम!

दुसरे उदाहरण कृष्णाचे. युद्धाचा प्रसंग जवळ आलेला असताना दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाजवळ आले. कृष्णाने विचारले, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य? दुर्योधनाने सैन्य तर अर्जुनाने कृष्णाला मागून घेतले. याचा परिणाम असा झाला, की कुरुक्षेत्रावर लढण्याऐवजी अर्जुनाला नकारात्मक विचारांनी घेरले, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले. त्याच्या मनातील वाईट गोष्टी बाजूला करून चांगल्या गोष्टींसाठी, ध्येयासाठी, अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याही आयुष्यात अर्जुनावर आली तशी वेळ वारंवार येत असते. तेव्हा आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल.

म्हणून आजपासून डोळसपणे पहा. आपण कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या, की कृष्णाच्या?