शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कुरुक्षेत्रावर निःशस्त्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने 'हा' प्रश्न विचारून निरुत्तर केले, तो प्रश्न होता... 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 9, 2021 16:13 IST

आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या.

शाळेत असताना बीजगणितातला शेवटचा 'ड' गट आठवतोय? अभ्यासात सामान्य असणारी मुले 'क' गटापर्यंत पोहोचण्यात धन्यता मानत आणि 'ड' गट आपल्या बुद्धीला पेलावणारा नाहीच, असे म्हणत त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत. खरे पाहता, 'ड' गट उर्वरित तीन गटांपैकी एका झटक्यात भरघोस मार्कांचे दान पदरात टाकणारा असे. पण त्याचा आपण कधी प्रयत्नच करून पाहिला नाही. आयुष्यात असे अस्पर्शित कितीतरी `ड' गटातले प्रश्न आपण न वाचता ऑप्शनला टाकून दिलेले असतात. एकदा त्या प्रश्नांना हाताळून तरी पाहूया. 

तुम्ही म्हणाल, आज जागतिक किंवा भारतीय गणित दिवस नाही, मग गणिताच्या त्या कटू आठवणी कशाला? उद्देश हाच, की आठवणी कटू नव्हत्या, आपण प्रयत्नच न केल्यामुळे त्या कटू बनत गेल्या. हीच बाब प्रत्येक समस्येबाबत घडते. प्रयत्न न करताच हार पत्करली तर तो प्रश्न नेमका किती मोठा होता हे कळणार कधी? 

ही अवस्था आपलीच नाही, तर खुद्द अर्जुनाची सुद्धा झाली होती. एवढा मोठा धनुर्धर अर्जून कुरुक्षेत्रावर प्रतिस्पर्ध्यांना पाहून, आपल्या हातून त्यांची हत्या नको, या विचाराने गर्भगळीत होतो आणि शस्त्रे खाली टाकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला भ्रमातून जागे करतात व त्याला खोचक प्रश्न विचारतात,

हतो वा प्राप्यसि स्वर्गं, जित्वा वा भोक्षसे महिम,तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:।।

तू जिंकणारेस हे तुला कोणी सांगितले? या युद्धात तू हरू शकतोस, मृत्यूमुखीदेखील पडू शकतोस, तू तुझे काम प्रामाणिकपणाने करणे, एवढेच अपेक्षित आहे. या युद्धात मेलास, तर तुला वीरमरण येऊन स्वर्गप्राप्ती होईल. जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. परंतु असा भ्याडासारखा युद्ध सोडून गेलास, तर स्वत:च्या नजरेतून कायमचा उतरशील. तसे रोजचे मरण पत्करण्यापेक्षा युद्ध करून परिस्थितीवर निकाल सोपव. 

कवी मनोहर कवीश्वर यांच्या गीतातील श्रीकृष्णसुद्धा हेच सांगतो, 

कर्मफलाते अर्पून मजला, सोड अहंता वृथा,सर्व धर्म परी त्यजूनि येई, शरण मला भारताकर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्थाकर्तव्याने घडतो माणूस जाणून परमार्था।।

हा संदेश फक्त अर्जुनाला नाही, तर आपणा सर्वांना आहे. आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या. मग तो प्रश्न अ गटातला असो नाहीतर ड गटातला!