शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुरुक्षेत्रावर निःशस्त्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने 'हा' प्रश्न विचारून निरुत्तर केले, तो प्रश्न होता... 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 9, 2021 16:13 IST

आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या.

शाळेत असताना बीजगणितातला शेवटचा 'ड' गट आठवतोय? अभ्यासात सामान्य असणारी मुले 'क' गटापर्यंत पोहोचण्यात धन्यता मानत आणि 'ड' गट आपल्या बुद्धीला पेलावणारा नाहीच, असे म्हणत त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत. खरे पाहता, 'ड' गट उर्वरित तीन गटांपैकी एका झटक्यात भरघोस मार्कांचे दान पदरात टाकणारा असे. पण त्याचा आपण कधी प्रयत्नच करून पाहिला नाही. आयुष्यात असे अस्पर्शित कितीतरी `ड' गटातले प्रश्न आपण न वाचता ऑप्शनला टाकून दिलेले असतात. एकदा त्या प्रश्नांना हाताळून तरी पाहूया. 

तुम्ही म्हणाल, आज जागतिक किंवा भारतीय गणित दिवस नाही, मग गणिताच्या त्या कटू आठवणी कशाला? उद्देश हाच, की आठवणी कटू नव्हत्या, आपण प्रयत्नच न केल्यामुळे त्या कटू बनत गेल्या. हीच बाब प्रत्येक समस्येबाबत घडते. प्रयत्न न करताच हार पत्करली तर तो प्रश्न नेमका किती मोठा होता हे कळणार कधी? 

ही अवस्था आपलीच नाही, तर खुद्द अर्जुनाची सुद्धा झाली होती. एवढा मोठा धनुर्धर अर्जून कुरुक्षेत्रावर प्रतिस्पर्ध्यांना पाहून, आपल्या हातून त्यांची हत्या नको, या विचाराने गर्भगळीत होतो आणि शस्त्रे खाली टाकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला भ्रमातून जागे करतात व त्याला खोचक प्रश्न विचारतात,

हतो वा प्राप्यसि स्वर्गं, जित्वा वा भोक्षसे महिम,तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:।।

तू जिंकणारेस हे तुला कोणी सांगितले? या युद्धात तू हरू शकतोस, मृत्यूमुखीदेखील पडू शकतोस, तू तुझे काम प्रामाणिकपणाने करणे, एवढेच अपेक्षित आहे. या युद्धात मेलास, तर तुला वीरमरण येऊन स्वर्गप्राप्ती होईल. जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. परंतु असा भ्याडासारखा युद्ध सोडून गेलास, तर स्वत:च्या नजरेतून कायमचा उतरशील. तसे रोजचे मरण पत्करण्यापेक्षा युद्ध करून परिस्थितीवर निकाल सोपव. 

कवी मनोहर कवीश्वर यांच्या गीतातील श्रीकृष्णसुद्धा हेच सांगतो, 

कर्मफलाते अर्पून मजला, सोड अहंता वृथा,सर्व धर्म परी त्यजूनि येई, शरण मला भारताकर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्थाकर्तव्याने घडतो माणूस जाणून परमार्था।।

हा संदेश फक्त अर्जुनाला नाही, तर आपणा सर्वांना आहे. आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या. मग तो प्रश्न अ गटातला असो नाहीतर ड गटातला!