शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तुमची साडेसाती सुरू आहे? तर 'या' चुका टाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 18:07 IST

शनी महाराज अतिशय शिस्तप्रिय आहेत. साडेसातीच्या काळात ते आपली परीक्षा घेतात. या काळात आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे हेच महत्त्वाचे असते.

सर्व ग्रहांमध्ये मनुष्य घाबरतो ते शनी ग्रहाला. कारण शनी महाराजांची अवकृपा झाली, तर कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची आपल्याला भीती वाटत राहते. साडेसाती झालेल्यांना चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. या काळात कोणाचा उष्कर्ष होतो, तर कोणाला आयुष्यभराची शिकवण मिळते. साडेसाती देव दानवांनाही चुकलेली नाही, तर मानवाला तरी कशी चुकेल? या काळात आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे हेच महत्त्वाचे असते. शनी महाराज आपली परीक्षा घेत असतात. त्यावेळी न डगमगता आपण तत्वाला धरून आचरण केले पाहिजे आणि या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत. 

>> शनी महाराज अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांना अभक्ष्य आणि अपेयपान करणारे लोक आवडत नाहीत. म्हणून मांसाहार आणि मदिरापान करू नये. तसेच कोणाला दुखावणे, वाईट बोलणे, दुष्कृत्य करणे टाळले पाहिजे. त्याची भयंकर शिक्षा आपल्याला मिळू शकते. कारण शनी महाराज आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. 

>>  शनी महाराजांना ज्येष्ठ व्यक्ती आणि गरीब लोकांप्रती जास्त कणव असते. अशा लोकांना दुखावलेले, फसवलेले त्यांना अजिबात चालत नाही. एखाद्याची फसवणूक केली पण त्याला ती कळली नाही, तर यात आनंद मानू नका. कारण दुसऱ्याची फसवणूक केल्याची शिक्षा शनी महाराज नक्कीच देतात आणि ती शिक्षा भोगताना मात्र मनुष्य रडकुंडीला येतो. 

>> साडेसातीच्या काळात लोखंड, तेल आणि केरसुणीची खरेदी करू नये. या वस्तूंची खरेदी शनी महाराजांना अपमानास्पद वाटू शकते. या वस्तूंची खरेदी करण्याऐवजी शनिवारी या वस्तूंचे दान केले पाहिजे. तसेच काळे तीळ आणि उडीद डाळ दान केल्यास खूप लाभ होतो. 

>> पिंपळाच्या झाडावर शनी देवांचा वास असतो असे मानतात. परंतु घराच्या भिंतीवर उगवलेले पिंपळाचे रोपटे अशुभ मानले जाते, म्हणून ते वेळीच काढून टाकले जाते. परंतु साडेसातीच्या काळात पिंपळाचे मूळ उपटून शनी महाराजांचा रोष ओढवून घेऊ नये. उलट दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून यावे. 

>> ज्येष्ठ आणि गरीब व्यक्तींची सेवा सुश्रुषा केली असता शनी महाराज प्रसन्न होतात. म्हणून केवळ साडे सातीच्या काळातच नाही, तर अन्य वेळीसुद्धा ज्येष्ठांचा आदर करावा आणि गरीब, गरजू लोकांना यथाशक्ती दान करावे. त्यामुळे शनी महाराज प्रसन्न राहतात.