शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाचे काही फायदे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:17 IST

आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता भासत नाही. आणि कोणताही त्रास न होता, या दिवशी आपण अन्नसेवन न करता राहू शकता.

सद्गुरु: आपल्याला बळजबरीने उपास करायला न लागणे महत्वाचे आहे. आपण जर शरीराच्या नैसर्गिक चक्राकडेलक्ष देऊन पाहिले, तर त्यामध्ये मंडला म्हणून एक चक्र असते. मंडल म्हणजे प्रत्येक 40 ते 48 दिवसांनी आपली शरीर प्रणाली एका विशिष्ट चक्रातून जाते. प्रत्येक चक्रात तीन दिवस असे असतात जेंव्हा आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता नसते. आपले शरीर कसे कार्यरत आहे याविषयी आपण जर जागरूक असाल, तर आपल्या असे लक्षात येईल की या दिवसांमध्ये आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता भासत नाही. आणि कोणताही त्रास न होता, या दिवशी आपण अन्नसेवन न करता राहू शकता.आपण जर सतत चहा किंवा कॉफी घेत असाल, आणि जर आपण उपवास केलात, तर तुमच्यासाठी ते अतिशय त्रासदायक होईल; उपवास करणे अतिशय कठीण होईल. म्हणून आपल्याला जर उपवास करायचा असेल, तर प्रथम योग्य प्रकारचा आहार घेऊन आपले शरीर उपवासासाठी तयार करा.प्रत्येक 11 ते 14 दिवसांनी एकदा तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होणार नाही. त्या दिवशी आपण काहीही खाऊ नये. ही जाणीव कुत्रे आणि मांजरांमध्ये सुद्धा असते याची आपल्याला कल्पना आहे का? एखाद्या विशिष्ट दिवशी ते काहीही खात नाहीत हे आपल्या कधी लक्षात आले आहे का? त्यांना त्यांच्या शरीराची जाण असते. ज्या दिवशी शरीर सांगते, “अन्न नको”, म्हणजे तो स्वच्छतेचा दिवस आहे, त्या दिवशी ते काहीही खात नाहीत. तुमच्यामध्ये ही जाण नसल्यामुळे एकादशी म्हणजे उपवासाचा दिवस ठरविला गेला.चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक 14 दिवसांनंतर एकादशी येते. 14 दिवसांमध्ये किमान एक वेळा तरी तुम्ही अन्नग्रहण थांबवू शकता. आपल्याला जर अन्नग्रहण केल्यावाचून राहता येत नसेल, किंवा तुमची दिनाचर्या कठीण परिश्रमांची असेल, आणि उपवास सहन करण्यायेवढी आवश्यक अशी साधनेची बळकटी नसेल, तर आपण फळे खाऊन उपवास करू शकता. फक्त तुमच्या शरीर यंत्रणेचे बारकाईने निरीक्षण करा आणि तुमच्या असे लक्षात येईल, की काही ठराविक दिवशी, तुम्हाला काहीही खाण्याची गरज भासत नाही. त्या दिवशी बळजबरीने अन्नग्रहण करणे ही चांगली गोष्ट नव्हे. तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांची पुरेशी तयारी केल्याशिवाय जर बळजबरीने उपवास केला, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसानच होईल.समजा एखाद्या व्यक्तीला काही निश्चित काळासाठी उपवास करायचा आहे, तर त्याला योग्य प्रकारच्या आध्यात्मिक प्रक्रिया किंवा साधना यांची जोड देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांना पुरेसे तयार न करता, जर बळजबरीने उपवास केला, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसानच होईल. परंतु जर तुमचे शरीर त्यासाठी योग्य प्रकारे तयार केलेले असेल, आणि तुमचे मन एका खास अवस्थेत असेल, तुम्ही जर तुमची ऊर्जा उत्तमरित्या सक्रीय ठेवली असेल, तर उपवासाचे अनेक फायदे होतील.तुम्ही जर सतत चहा किंवा कॉफी घेत असाल, आणि जर तुम्ही उपवास केलात, तर तुमच्यासाठी ते अतिशय त्रासदायक होईल; उपवास करणे अतिशय कठीण होईल. म्हणून आपल्याला जर उपवास करायचा असेल, तर प्रथम योग्य प्रकारचा आहार घेऊन आपले शरीर उपवासासाठी तयार करा. तुम्ही खाण्याची इच्छा रोखून धरणे तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक होत असेल, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराचे केवळ नुकसानच करून घ्याल. कदाचित तुम्हाला एखादी सिद्धी करून दाखवायची असेल, “मी तीन दिवस काहीही खाल्ले नाही.” आणि सार्‍या जगाला हे ओरडून सांगायचे असेल, तर कृपया तसे काही करू नका. त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त तुम्हाला अशक्त बनवाल, येवढेच. आपले शरीर जाणून घेणे आणि आपल्या शरीर यंत्रणा कशी काम करते, आणि आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे याची सखोल जाणीव करून घेणे हे अशा गोष्टी करण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.प्रत्येक व्यक्तीसाठी उपवास करणे चांगलेच असेल असे नाही, परंतु यामागची योग्य, सखोल जाणीव करून घेऊन उपवास केले तर त्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून आपल्या शरीर यंत्रणेसाठी योग्य आणि सुसंगत पद्धत काय आहे हे शोधणे आणि त्यानुसार उपवास करणे उत्तम.