शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 14, 2020 09:07 IST

Adhik Maas 2020: आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही. 

ठळक मुद्दे'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' हा स्वधर्म माऊलींनाही अपेक्षित आहे. गावच्या देवळातल्या मूर्तीसमोर गावगड्याने घातलेले मालवणी गाऱ्हाणे, हीदेखील वैश्विकप्रार्थनाच नव्हे का?

ज्योत्स्ना गाडगीळ

'अधिकस्य अधिकम फलम्' असे म्हणत, अधिक मासात महिनाभर आपण विविध तऱ्हेने  पूजा अर्चना करीत, देवाकडून स्वत:साठी बरेच काही मागून घेतले. पुण्यसंचय केला. आजपासून तीन दिवस, साऱ्या विश्वावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून दान मागुया. असे दान,जे माऊलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले, 'पसायदाना'च्या रूपाने!

आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,तोषोनि मज द्यावे, पसायदान हे।।

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये  भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी! हेच संतलक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, साधू-संतांनी जेव्हा जेव्हा भगवंताकडे याचना केली, त्यात कधी स्वार्थ नव्हताच, तर केवळ 'समष्टी'साठी प्रार्थना होती. आठवून पहा...

आरती झाल्यावर आपण एक भला मोठा श्लोक म्हणतो, त्याला 'मंत्रपुष्पांजली' म्हणतात. तो पाठ करून, घोकून, रेटून, आवाजाची चढाओढ करून म्हणताना जेवढी गंमत वाटते ना, तेवढीच त्याचा अर्थ जाणून घेतल्यावरही वाटेल. 'पृथ्वीव्यै समुद्रपर्यंता या एकराळिती' केवढा दूरचा विचार ऋषींनी करून ठेवला आहे. आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही. 

हेही वाचा: तुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा!; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.

तीच बाब, गाऱ्हाण्याची...गावच्या देवळातल्या मूर्तीसमोर गावगड्याने घातलेले मालवणी गाऱ्हाणे, 'बा देवा म्हाराजा, जगाच्या नाथा, रवळनाथा' म्हणत गावच्या प्रत्येक घरासाठी केलेली प्रार्थना आणि इतरांनी 'व्हय म्हाराजा' म्हणत दिलेली पुष्टी हीदेखील वैश्विकप्रार्थनाच नव्हे का...?

देवासमोर उभे राहिलो, की आपले हात फक्त आपल्या सुख शांतीसाठी जोडले जातात. परंतु, हा आपला धर्मसंस्कार नाही. 'सर्वेपि सुखिन: सन्तु:' अर्थात सगळे सुखी झाल्याशिवाय मी सुखी होऊच शकत नाही, हे समाजभान आपल्याला संतांनी करून दिले आहे.

पसायदानातही माऊली विश्वात्मक देवाला आर्जव करते, माझ्याकडून जो वाग्यज्ञ करवून घेतलास, त्यात सारे काही सांगून झाले आहे आणि आता मागायची वेळ आली आहे. हे मागणे माझ्या एकट्यासाठी नसून अखिल विश्वासाठी आहे, ते तू पूर्ण कर. तोषावे म्हणजे तृप्त हो आणि तृप्त होऊन मी जे सर्वांसाठी मागतोय, ते पसाय म्हणजे प्रसादरूपी दान आमच्या पदरात घाल.

जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे 

माऊलींना माहित आहे, आजवरचा इतिहास पाहता सृष्टीत सत्व-रज-तम वृत्तीचे लोक वारंवार निपजत असतात. म्हणून पृथ्वीवरील वातावरण संतुलित आहे. यातील तम वृत्ती सर्वांचे अहित योजणारी असते. देवा-दानवांपासून, थोर राष्ट्रपुरुषांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी दुष्टांचा नायनाट केला, परंतु दुष्ट वृत्ती शिल्लक राहिली. म्हणून माऊली म्हणते, जे खल आहेत, म्हणजे वाईट लोक आहेत, त्यांची व्यंकटी सांडो...व्यंकटी म्हणजे वाईट वृत्ती, तीच 'सांडो'... शब्दांचा किती चपखलपणे वापर केला आहे पहा, 'सांडो' म्हटले आहे,  'जावो' म्हटले नाही. कारण, गेलेली गोष्ट परत येऊ शकते, परंतु सांडलेली गोष्ट पुनर्वापरात आणू शकत नाही. म्हणून खलवृत्ती सांडून गेली, की पुन्हा आचरणात येणार नाही. 

एकदा का वाईट वृत्ती नष्ट झाली, तर उरतील फक्त चांगले लोक. जे समष्टीचा विचार करतील, ज्यांच्या ठायी भूतदया असेल, परस्पर प्रेम असेल, सद्भावना असेल, ते केवळ चांगल्या कार्यासाठीच प्रवृत्त होतील, त्यांच्या हातून चांगलीच कामे घडतील आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे विश्व अतिशय सुंदर होईल. कारण येथील प्रत्येक जीवाला, दुसऱ्या जीवाप्रती सहानुभूती असेल. असे खरोखरच घडले, तर काय होईल, ते पाहू उद्याच्या भागात...!

जय हरी माऊली।

हेही वाचा : Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना