शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, ही शिकवणारे गुरु, समाजशिक्षक यांची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 07:20 IST

परमेश्वर माणसातच आहे आणि माणसाची सेवा करणे हाच श्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्याचे अश्रू पुसणे, भुकेलेल्याला अन्न देणे यासारखी देवाची अन्य सेवा नाही. हा परिपाठ घालून देणारी व्यक्तीच आपल्या शिष्याची आत्मोन्नती साधू शकते. 

आपल्याकडे गुरु या संस्थेला प्रारंभापासून खूप महत्त्व आहे. गुरुंची महती अनेक शास्त्रांनी आणि धर्मग्रंथांनी गायली आहे. सर्वसामान्यजनांच्या गुरुभक्तीचा गैरफायदा घेऊन गुरु स्वार्थी, मतलबी वृत्तीने वागतात, असेही वारंवार निदर्शनास येते. समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात सद्गुरु स्तवन या नावाचा एक समास लिहिला आहे. त्यात समर्थ म्हणतात, 

हरिहरब्रह्मादिक, नाश पावती सकळीक,सर्वदा अविनाश येक, सद्गुरुपद।तयासी उपमा काय द्यावी,नाशिवंत सृष्टी आघवी,पंचभूतिक उठाठेवी, न चले तेथे।म्हणोनि सद्गुरु वर्णवेना, हे गे हे चि माझी वर्णना,अंतरस्थितीचिया खुणा,अंतर्निष्ठ जाणती।

हेही वाचा : देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

गुरुचे आणि सद्गुरुचे स्तवन करताना मोठमोठ्या कवींची आणि संतमहंतांची लेखणी कुंठित झाली आहे. सद्गुरुंनी आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे आणि शिष्यांच्या अभ्युदयाबरोबरच समाजाचा आणि देशाचा अभ्युदय कसा होईल, तेही पाहिले पाहिजे. कारण देश आणि समाज स्थिर राहिला, तरच त्यामधील लोक सुखी राहू शकतात.

आजकाल आपण काय पाहतो? अनेक ठिकाणी गुरु आपल्या गुरुपदाचा बाजार मांडताना दिसतात. गैरमार्गाने वागणारे धनिक मानसन्मानाच्या आणि खोट्या मन:शांतीच्या अपेक्षेने कोणत्या ना कोणत्या गुरुंच्या कळपात दाखल होतात. आणि हे भंपक गुरु त्यांच्या पैशावर आणि मोठेपणावर लट्टू होऊन त्यांना आपले शिष्य बनवतात. हे सर्वत्र दिसणारे चित्र आहे. 

गुरुपाशी मन:शांतीसाठी जावे, मार्गदर्शनासाठी जावे तर तो गुुरुच आपल्या शिष्यांना योग्य मार्ग दाखवण्याऐवजी त्यांच्या गैरमार्गांच्या व्यवहारातच स्वत: सामील झाल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. कोणी तथाकथित तांत्रिक आपले पद आणि प्रतिष्ठा अशा नादातच धुळीला मिळवतात. 

खरे म्हणजे गुरुंनी शिष्याला आणि समाजाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. संसारात राहूनच परमेश्वरप्राप्तीचा मार्ग चोखाळा, असे सांगितले पाहिजे. इतकेच नव्हे, तर स्वत:चा संसार करून परमार्थ कसा साधता येतो, हे आपल्यावरून उदाहरण घालून दिले पाहिजे.

परमेश्वर माणसातच आहे आणि माणसाची सेवा करणे हाच श्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्याचे अश्रू पुसणे, भुकेलेल्याला अन्न देणे यासारखी देवाची अन्य सेवा नाही. सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, हे समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे. कारण आता समाजातले दुर्जन वाढत आहेत. सज्जन कमी होत आहेत. सज्जनांच्या सत्य बोलण्याची किंमत उरलेली नाही. माणसे हिंस्त्र श्वापदांसारखी वागत आहेत आणि दुर्जनांना संरक्षण देण्यात धन्यता मानत आहेत. सत्यं वद, धर्म चर, असे वैदिककाळापासून सांगितले जाते. तेच पटवून देण्याची आणि शिकवण्याची सध्या गरज आहे. हा परिपाठ घालून देणारी व्यक्तीच आपल्या शिष्याची आत्मोन्नती साधू शकते. 

हेही वाचा : अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवला तसा आपला देवावर खरा विश्वास आहे का?... वाचा, एका छोट्या मुलीची गोष्ट