शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

केबीसी घोटाळ्यातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:10 IST

कमी वेळेत तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या नाशिकच्या आरती चव्हाण व भाऊसाहेब चव्हाण (रा. श्रीरामनगर, ता. जि. नाशिक) या दाम्पत्यास बीड पोलिसांनी अटक केली.

बीड : कमी वेळेत तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या नाशिकच्या आरती चव्हाण व भाऊसाहेब चव्हाण (रा. श्रीरामनगर, ता. जि. नाशिक) या दाम्पत्यास बीड पोलिसांनी अटक केली. दोन वर्षांपूर्वी साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी चव्हाण दाम्पत्यासह दोन एजंटांवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील एजंट फरार आहेत.नाईट बिलियन्स् चेंबर्स (केबीसी) या संस्थेच्या माध्यमातून चव्हाण दाम्पत्याने राज्यभर जाळे निर्माण केले. सर्वसामान्यांना दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन घेतली. हा सर्व पैसा शेअर बाजार व खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवला. सुरुवातीला काही दिवस गुंतवणूकदारांना वेळेत पैसे परत केले. त्यानंतर मात्र हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे परतूर तालुक्यातील आष्टी येथील गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आले. असाच काहीसा प्रकार बीडमध्येही घडला. मुदत संपूनही ठेव परत न मिळाल्याने बीडमधील अभिजित कल्याण गायकवाड यांनी शहर ठाण्यात २८ मे २०१६ रोजी केबीसीचे चव्हाण दांपत्य, एजंट संगीता मुळे, रामेश्वर पठारे (रा. औरंगाबाद) यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.जालना, बीडमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्यभर केबीसीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु झाली. चव्हाण दाम्पत्याची नाशिकच्या कारागृहातून सुटका होताच बीडच्या प्रकरणात अटक झाली. पो. नि. सय्यद सुलेमान, उप नि. मनीषा जोगदंड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरित दोन फरार एजंटांचा शोध सुरु असल्याचे सुलेमान म्हणाले.