शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

अंबाजोगाई : बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील. यासाठी तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे, असे ...

अंबाजोगाई : बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील. यासाठी तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा आंतरभारतीचे राष्ट्रीय महासचिव अमर हबीब यांनी व्यक्त केले.

येथील नगरपरिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आंतरभारती अंबाजोगाई शाखेच्यावतीने राजू जांगीड यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी अमर हबीब बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, तर अध्यक्षा म्हणून प्रा. डॉ. अलका वाळचाळे या उपस्थित होत्या.

अमर हबीब पुढे म्हणाले की, समाजातील तरुणांनी प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून येणारे नवनवे बदल स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे. विभिन्न जाती-धर्म, भाषा, प्रांतातील लोकांना एकत्र आणून माणसांचा समूह निर्माण करण्यासाठी आंतरभारतीची निर्मिती झाली असून, हे सूत्र प्रचलित करण्यासाठी आंतरभारती अंबाजोगाईने स्नेहसंवर्धन पुरस्काराची सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा पुरस्कार हा भारतातील एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्नेहसंवर्धन या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित केलेल्या शंकर मेहता, प्राचार्य बी. आय. खडकभावी, प्राचार्य एम. बी. शेट्टी, आनंदराव अंकाम यांच्याहस्ते राजू जांगीड यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा आणि मिलिंद बोकील व अमर हबीब यांनी संपादित केलेले "धुन तरुणाई" हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राजू यांच्या पत्नीचा डॉ. अलका वालचाळे यांनी साडी-चोळीचा आहेर करून सत्कार केला.

वैजनाथ शेंगुळे आणि अनिकेत डिघोळकर यांनी गायिलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिकेत दिघोळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पद्माकर घोरपडे यांनी सन्मानपत्र वाचन केले. राजू जांगीड यांचा परिचय संतोष मोहिते यांनी करून दिला. संचालन ज्योती शिंदे यांनी केले, तर आभार दत्ता वालेकर यांनी मानले.

160821\img-20210816-wa0032.jpg

स्नेहवर्धन पुरस्कार वितरण