शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:49 IST

बेरोजगारीमुळे वडिलांच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत, या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते अपघाती निधन संचारबंदी लागू झाल्याने युवकाचा रोजगार बंद पडला

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-: वडिलांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली. त्यात लॉकडाऊनमुळे काम मिळेना.त्यातच आई आजारी असल्याने तिच्या उपचाराचा खर्च,घरात चार माणसांचा उदरनिर्वाह ही होईना. याचे नैराश्य आल्याने आकाश अशोक सावंत या २१ वर्षीय युवकाने सोमवारी आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने सावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे.

ही दुर्देवी व्यथा सावंत कुटुंबियांच्या नशिबी आली.सगळं काही सुरळीत सुरू होत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील कबीरनगर परिसरात राहणारे वाहन चालक अशोक सावंत यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा आकाश  व दोन मुली असा परिवार होता.वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जवाबदारी आकाश च्या खांद्यावर आली.तो बांधकामावर सेंटरिंग चे काम करत होता.तर त्याची आई सुनीता या मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागले.परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक संचारबंदी जाहीर केली. कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे बांधकामे ही ठप्प राहिली. परिणामी आकाशवर बेरोजगारीची वेळ आली. दुसरेही कामे मिळेनात. आई ही आजारी पडल्याने तिचाही कुटुंबाला लागणारा हातभार बंद झाला. त्यातच आईच्या उपचाराचा खर्च.लोकांकडून शे-पाचशे घेऊन खर्च भागवू लागला. मात्र, काम बंद असल्याने ते परत करायचे कसे? त्यातच उदरनिर्वाहाची दैनंदिन भेडसावू लागली.

चार जणांचे कुटूंब, घरात बसून कसे चालवायचे ? याची मोठी विवंचना आकाशला भेडसावू लागली. आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत. या नैराश्यातून आकाशने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन बेरोजगारी व उपासमारीचा तो बळी ठरला.आकाशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबासमोर मोठी भीषण समस्या निर्माण झाली आहे. घरातील दोन्ही पुरुष एका मागे एक निघून गेले. कर्ता व्यक्तीच कुटुंबात राहिला नाही. माय व दोन लेकी एवढेच कुटुंब पाठीमागे राहिले. एकमेव राहिलेला कुटुंबाचा आधार ही निघुन गेला.आता या कुटुंबाची मोठी परवड झाली आहे.

सावंत कुटुंबाला २५ लाखांची मदत करासावंत कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष एका पाठोपाठ निघून गेले.आज या कुटुंबाची मोठी दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने सावंत कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAmbajogaiअंबाजोगाईBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या