शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:49 IST

बेरोजगारीमुळे वडिलांच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत, या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते अपघाती निधन संचारबंदी लागू झाल्याने युवकाचा रोजगार बंद पडला

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-: वडिलांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली. त्यात लॉकडाऊनमुळे काम मिळेना.त्यातच आई आजारी असल्याने तिच्या उपचाराचा खर्च,घरात चार माणसांचा उदरनिर्वाह ही होईना. याचे नैराश्य आल्याने आकाश अशोक सावंत या २१ वर्षीय युवकाने सोमवारी आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने सावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे.

ही दुर्देवी व्यथा सावंत कुटुंबियांच्या नशिबी आली.सगळं काही सुरळीत सुरू होत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील कबीरनगर परिसरात राहणारे वाहन चालक अशोक सावंत यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा आकाश  व दोन मुली असा परिवार होता.वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जवाबदारी आकाश च्या खांद्यावर आली.तो बांधकामावर सेंटरिंग चे काम करत होता.तर त्याची आई सुनीता या मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागले.परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक संचारबंदी जाहीर केली. कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे बांधकामे ही ठप्प राहिली. परिणामी आकाशवर बेरोजगारीची वेळ आली. दुसरेही कामे मिळेनात. आई ही आजारी पडल्याने तिचाही कुटुंबाला लागणारा हातभार बंद झाला. त्यातच आईच्या उपचाराचा खर्च.लोकांकडून शे-पाचशे घेऊन खर्च भागवू लागला. मात्र, काम बंद असल्याने ते परत करायचे कसे? त्यातच उदरनिर्वाहाची दैनंदिन भेडसावू लागली.

चार जणांचे कुटूंब, घरात बसून कसे चालवायचे ? याची मोठी विवंचना आकाशला भेडसावू लागली. आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत. या नैराश्यातून आकाशने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन बेरोजगारी व उपासमारीचा तो बळी ठरला.आकाशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबासमोर मोठी भीषण समस्या निर्माण झाली आहे. घरातील दोन्ही पुरुष एका मागे एक निघून गेले. कर्ता व्यक्तीच कुटुंबात राहिला नाही. माय व दोन लेकी एवढेच कुटुंब पाठीमागे राहिले. एकमेव राहिलेला कुटुंबाचा आधार ही निघुन गेला.आता या कुटुंबाची मोठी परवड झाली आहे.

सावंत कुटुंबाला २५ लाखांची मदत करासावंत कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष एका पाठोपाठ निघून गेले.आज या कुटुंबाची मोठी दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने सावंत कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAmbajogaiअंबाजोगाईBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या