शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:49 IST

बेरोजगारीमुळे वडिलांच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत, या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते अपघाती निधन संचारबंदी लागू झाल्याने युवकाचा रोजगार बंद पडला

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-: वडिलांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली. त्यात लॉकडाऊनमुळे काम मिळेना.त्यातच आई आजारी असल्याने तिच्या उपचाराचा खर्च,घरात चार माणसांचा उदरनिर्वाह ही होईना. याचे नैराश्य आल्याने आकाश अशोक सावंत या २१ वर्षीय युवकाने सोमवारी आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने सावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे.

ही दुर्देवी व्यथा सावंत कुटुंबियांच्या नशिबी आली.सगळं काही सुरळीत सुरू होत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील कबीरनगर परिसरात राहणारे वाहन चालक अशोक सावंत यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा आकाश  व दोन मुली असा परिवार होता.वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जवाबदारी आकाश च्या खांद्यावर आली.तो बांधकामावर सेंटरिंग चे काम करत होता.तर त्याची आई सुनीता या मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागले.परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक संचारबंदी जाहीर केली. कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे बांधकामे ही ठप्प राहिली. परिणामी आकाशवर बेरोजगारीची वेळ आली. दुसरेही कामे मिळेनात. आई ही आजारी पडल्याने तिचाही कुटुंबाला लागणारा हातभार बंद झाला. त्यातच आईच्या उपचाराचा खर्च.लोकांकडून शे-पाचशे घेऊन खर्च भागवू लागला. मात्र, काम बंद असल्याने ते परत करायचे कसे? त्यातच उदरनिर्वाहाची दैनंदिन भेडसावू लागली.

चार जणांचे कुटूंब, घरात बसून कसे चालवायचे ? याची मोठी विवंचना आकाशला भेडसावू लागली. आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत. या नैराश्यातून आकाशने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन बेरोजगारी व उपासमारीचा तो बळी ठरला.आकाशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबासमोर मोठी भीषण समस्या निर्माण झाली आहे. घरातील दोन्ही पुरुष एका मागे एक निघून गेले. कर्ता व्यक्तीच कुटुंबात राहिला नाही. माय व दोन लेकी एवढेच कुटुंब पाठीमागे राहिले. एकमेव राहिलेला कुटुंबाचा आधार ही निघुन गेला.आता या कुटुंबाची मोठी परवड झाली आहे.

सावंत कुटुंबाला २५ लाखांची मदत करासावंत कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष एका पाठोपाठ निघून गेले.आज या कुटुंबाची मोठी दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने सावंत कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAmbajogaiअंबाजोगाईBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या