शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पिवळे सोने मातीमोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST

संडे स्टोरी तीन महिने घाम गाळून अपार कष्ट केले. पेरणी, खुरपणी, फवारणी करून पडत्या पावसातही कसेबसे पीक जोपासले. पीक ...

संडे स्टोरी

तीन महिने घाम गाळून अपार कष्ट केले. पेरणी, खुरपणी, फवारणी करून पडत्या पावसातही कसेबसे पीक जोपासले. पीक बहरलेले असतानाच परतीचा मुसळधार पाऊस कोसळला अन् शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याची काळी कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी आली. सोन्यासारख्या पिवळ्या सोयाबीनचं अक्षरश: मातेरं झालं. या दुर्दशेमुळे उत्पादन खर्च तर सोडाच साधा वाहतुकीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे.

...

अंबाजोगाई तालुक्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले ग्रहण काही सुटता सुटेना. नवनवीन संकटे शेतकऱ्यांसमोर उभीच आहेत. गेल्या पाच वर्षांपासून अत्यल्प असणाऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने चांगला पाऊस दिला. तरीही शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी ग्रहण लागले. पेरणीसाठी घेतलेले बियाणे अनेक ठिकाणी बोगस निघाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर कोसळले. एकवेळ पेरणी करणे दुरापास्त अशी स्थिती असताना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले. याहीस्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही. उसनवारी व कर्जबाजारी होऊन दुबार पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन जोमात आले. मात्र, पुन्हा वादळ व अतिवृष्टीसारख्या पावसाने थैमान मांडले. शेतांचे तलाव झाले. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्यात बुडाले. यावेळी लागलेल्या शेंगा पावसात भिजल्याने त्यांना कोंब फुटू लागले तर अनेकजणांचे सोयाबीन काळवंडले तर कुठे कुजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा काळ्या निघाल्या आहेत. यामुळे काळवंडलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरी पडले. अशाही स्थितीत सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. मजूर उपलब्ध झाले तर पडत्या पावसामुळे चिखलात सोयाबीन काढायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला. मजुरीचे दर दुप्पट वाढले. दुबार पेरणी, फवारणी, रासायनिक खते, काढणीचा दुप्पट खर्च यात शेतकरी मोठ्या प्रमाणात डुबला, तर निघालेले सोयाबीनही काळवंडले. अशास्थितीत शेतीचा गाडा हाकायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी ११ ते १२ हजारांचा भाव होता. मात्र, या महिन्यात बाजारात सोयाबीन विक्रीसाठी येणार म्हणताच एका झटक्यात भाव चक्क निम्म्यावर आले. गेल्यावर्षीच्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. आता असणारा ५ हजार रुपयांचा भावही स्थिर राहील, अशी स्थिती नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनची विक्री करायची म्हटले तर डागीला सोयाबीनला भावही मिळणार नाही. अशा स्थितीमुळे मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करून पुढील रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या सोयाबीनमधून उत्पादन खर्च तर सोडाच वाहतुकीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे.

...

आकडे जुळविण्यात यंत्रणा व्यस्त

अंबाजोगाई तालुक्यात गेल्यावर्षी १०८० शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाले. या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यांना ज्या कंपन्यांनी फसवले, त्या कंपन्यांवर शासनाने गुन्हे दाखल केले. आता त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश शासनाने दिले. काही कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देऊ लागल्या. मात्र, काही कंपन्यांची यंत्रणा अजूनही आकडे जुळविण्यातच व्यस्त आहे. त्यातच बाजारात बनावट कीटकनाशके विक्रीसाठी आल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

...

पाऊस थांबला; संघर्ष कायम

तब्बल आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. पाऊस थांबला तरीही शेतकऱ्यांचा विविध कारणांमुळे संघर्ष सुरूच आहे. या झालेल्या पावसाचा पिकांना फटका बसला असला, तरी शेतरस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहतुकीची साधने ठप्प झाली आहेत. अनेकांच्या शेतातच सोयाबीनच्या सुड्या सडल्या आहेत, तर शेती आणि शेतरस्तेही जलमय झाले आहेत. अशास्थितीत शेतकऱ्यांचा पावलोपावली संघर्ष सुरूच आहे.

...

250921\img-20210924-wa0016.jpg

सोयाबीन च्या पिकात पाणी