शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पिवळे सोने मातीमोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST

संडे स्टोरी तीन महिने घाम गाळून अपार कष्ट केले. पेरणी, खुरपणी, फवारणी करून पडत्या पावसातही कसेबसे पीक जोपासले. पीक ...

संडे स्टोरी

तीन महिने घाम गाळून अपार कष्ट केले. पेरणी, खुरपणी, फवारणी करून पडत्या पावसातही कसेबसे पीक जोपासले. पीक बहरलेले असतानाच परतीचा मुसळधार पाऊस कोसळला अन् शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याची काळी कहाणी शेतकऱ्यांच्या नशिबी आली. सोन्यासारख्या पिवळ्या सोयाबीनचं अक्षरश: मातेरं झालं. या दुर्दशेमुळे उत्पादन खर्च तर सोडाच साधा वाहतुकीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे.

...

अंबाजोगाई तालुक्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले ग्रहण काही सुटता सुटेना. नवनवीन संकटे शेतकऱ्यांसमोर उभीच आहेत. गेल्या पाच वर्षांपासून अत्यल्प असणाऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने चांगला पाऊस दिला. तरीही शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी ग्रहण लागले. पेरणीसाठी घेतलेले बियाणे अनेक ठिकाणी बोगस निघाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर कोसळले. एकवेळ पेरणी करणे दुरापास्त अशी स्थिती असताना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले. याहीस्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही. उसनवारी व कर्जबाजारी होऊन दुबार पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन जोमात आले. मात्र, पुन्हा वादळ व अतिवृष्टीसारख्या पावसाने थैमान मांडले. शेतांचे तलाव झाले. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्यात बुडाले. यावेळी लागलेल्या शेंगा पावसात भिजल्याने त्यांना कोंब फुटू लागले तर अनेकजणांचे सोयाबीन काळवंडले तर कुठे कुजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा काळ्या निघाल्या आहेत. यामुळे काळवंडलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरी पडले. अशाही स्थितीत सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. मजूर उपलब्ध झाले तर पडत्या पावसामुळे चिखलात सोयाबीन काढायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला. मजुरीचे दर दुप्पट वाढले. दुबार पेरणी, फवारणी, रासायनिक खते, काढणीचा दुप्पट खर्च यात शेतकरी मोठ्या प्रमाणात डुबला, तर निघालेले सोयाबीनही काळवंडले. अशास्थितीत शेतीचा गाडा हाकायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी ११ ते १२ हजारांचा भाव होता. मात्र, या महिन्यात बाजारात सोयाबीन विक्रीसाठी येणार म्हणताच एका झटक्यात भाव चक्क निम्म्यावर आले. गेल्यावर्षीच्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. आता असणारा ५ हजार रुपयांचा भावही स्थिर राहील, अशी स्थिती नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनची विक्री करायची म्हटले तर डागीला सोयाबीनला भावही मिळणार नाही. अशा स्थितीमुळे मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करून पुढील रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या सोयाबीनमधून उत्पादन खर्च तर सोडाच वाहतुकीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे.

...

आकडे जुळविण्यात यंत्रणा व्यस्त

अंबाजोगाई तालुक्यात गेल्यावर्षी १०८० शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाले. या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यांना ज्या कंपन्यांनी फसवले, त्या कंपन्यांवर शासनाने गुन्हे दाखल केले. आता त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश शासनाने दिले. काही कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देऊ लागल्या. मात्र, काही कंपन्यांची यंत्रणा अजूनही आकडे जुळविण्यातच व्यस्त आहे. त्यातच बाजारात बनावट कीटकनाशके विक्रीसाठी आल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

...

पाऊस थांबला; संघर्ष कायम

तब्बल आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. पाऊस थांबला तरीही शेतकऱ्यांचा विविध कारणांमुळे संघर्ष सुरूच आहे. या झालेल्या पावसाचा पिकांना फटका बसला असला, तरी शेतरस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहतुकीची साधने ठप्प झाली आहेत. अनेकांच्या शेतातच सोयाबीनच्या सुड्या सडल्या आहेत, तर शेती आणि शेतरस्तेही जलमय झाले आहेत. अशास्थितीत शेतकऱ्यांचा पावलोपावली संघर्ष सुरूच आहे.

...

250921\img-20210924-wa0016.jpg

सोयाबीन च्या पिकात पाणी