शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ये रे घना ये रे घना, सोयाबीनने टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट संजय कातकडे उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ ...

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट

संजय कातकडे

उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरू असून, कोसा-कोसावर पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. कुठं अचानक ढगफुटी होऊन जमिनी वाहून जाणारा पाऊस पडतो तर तिथूनच काही अंतरावर पाण्याअभावी पिके वाळून जातात निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील उजनी महसूल मंडळातील गावांमध्ये यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरून आभाळाकडे डोळे लावले होते. कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसाने शिवारातील पिके बहरली होती. मात्र पावसाने तब्बल वीस दिवसांपासून पाठ फिरवली आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांची शेंगा भरण्याची अवस्था या महत्त्वाच्या वेळी पाऊस उघडल्याने ही पिकं शेंगा पक्व होण्याआधीच वाळून जात आहेत. तर परिसरात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनची सध्याची अवस्थादेखील फुलोरा व शेंगा लागण्याची आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकाचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पडत आहे व तापमानामध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे हलक्या जमिनीतील, माळरानावरील पिकांनी तर आता माना टाकून द्यायला सुरुवात झाली आहे.

महागडी खते, बी-बियाणे व औषधी वापरून जगविलेली पिके कोमेजून जात असलेली पाहून शेतकरी हतबल होत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.

उजनी परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळॆ परिसरातील नदी, नाले अजून कोरडेठाक आहेत. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकं कोमेजून जात आहेत.

- व्यंकटराव फड, शेतकरी, धसवाडी.

वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने सोयाबीन वाळत आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी सोयाबीन भिजविण्यासाठी रात्रंदिवस बेजार होत आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.

-विशाल मुंडे, शेतकरी, कुसळवाडी