शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

ये रे घना ये रे घना, सोयाबीनने टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट संजय कातकडे उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ ...

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट

संजय कातकडे

उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरू असून, कोसा-कोसावर पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. कुठं अचानक ढगफुटी होऊन जमिनी वाहून जाणारा पाऊस पडतो तर तिथूनच काही अंतरावर पाण्याअभावी पिके वाळून जातात निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील उजनी महसूल मंडळातील गावांमध्ये यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरून आभाळाकडे डोळे लावले होते. कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसाने शिवारातील पिके बहरली होती. मात्र पावसाने तब्बल वीस दिवसांपासून पाठ फिरवली आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांची शेंगा भरण्याची अवस्था या महत्त्वाच्या वेळी पाऊस उघडल्याने ही पिकं शेंगा पक्व होण्याआधीच वाळून जात आहेत. तर परिसरात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनची सध्याची अवस्थादेखील फुलोरा व शेंगा लागण्याची आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकाचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पडत आहे व तापमानामध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे हलक्या जमिनीतील, माळरानावरील पिकांनी तर आता माना टाकून द्यायला सुरुवात झाली आहे.

महागडी खते, बी-बियाणे व औषधी वापरून जगविलेली पिके कोमेजून जात असलेली पाहून शेतकरी हतबल होत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.

उजनी परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळॆ परिसरातील नदी, नाले अजून कोरडेठाक आहेत. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकं कोमेजून जात आहेत.

- व्यंकटराव फड, शेतकरी, धसवाडी.

वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने सोयाबीन वाळत आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी सोयाबीन भिजविण्यासाठी रात्रंदिवस बेजार होत आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.

-विशाल मुंडे, शेतकरी, कुसळवाडी