शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

ये रे घना ये रे घना, सोयाबीनने टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट संजय कातकडे उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ ...

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट

संजय कातकडे

उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरू असून, कोसा-कोसावर पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. कुठं अचानक ढगफुटी होऊन जमिनी वाहून जाणारा पाऊस पडतो तर तिथूनच काही अंतरावर पाण्याअभावी पिके वाळून जातात निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील उजनी महसूल मंडळातील गावांमध्ये यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरून आभाळाकडे डोळे लावले होते. कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसाने शिवारातील पिके बहरली होती. मात्र पावसाने तब्बल वीस दिवसांपासून पाठ फिरवली आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांची शेंगा भरण्याची अवस्था या महत्त्वाच्या वेळी पाऊस उघडल्याने ही पिकं शेंगा पक्व होण्याआधीच वाळून जात आहेत. तर परिसरात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनची सध्याची अवस्थादेखील फुलोरा व शेंगा लागण्याची आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकाचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पडत आहे व तापमानामध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे हलक्या जमिनीतील, माळरानावरील पिकांनी तर आता माना टाकून द्यायला सुरुवात झाली आहे.

महागडी खते, बी-बियाणे व औषधी वापरून जगविलेली पिके कोमेजून जात असलेली पाहून शेतकरी हतबल होत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.

उजनी परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळॆ परिसरातील नदी, नाले अजून कोरडेठाक आहेत. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकं कोमेजून जात आहेत.

- व्यंकटराव फड, शेतकरी, धसवाडी.

वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने सोयाबीन वाळत आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी सोयाबीन भिजविण्यासाठी रात्रंदिवस बेजार होत आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.

-विशाल मुंडे, शेतकरी, कुसळवाडी