शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

ये रे घना ये रे घना, सोयाबीनने टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट संजय कातकडे उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ ...

: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट

संजय कातकडे

उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरू असून, कोसा-कोसावर पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. कुठं अचानक ढगफुटी होऊन जमिनी वाहून जाणारा पाऊस पडतो तर तिथूनच काही अंतरावर पाण्याअभावी पिके वाळून जातात निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील उजनी महसूल मंडळातील गावांमध्ये यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरून आभाळाकडे डोळे लावले होते. कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसाने शिवारातील पिके बहरली होती. मात्र पावसाने तब्बल वीस दिवसांपासून पाठ फिरवली आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांची शेंगा भरण्याची अवस्था या महत्त्वाच्या वेळी पाऊस उघडल्याने ही पिकं शेंगा पक्व होण्याआधीच वाळून जात आहेत. तर परिसरात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनची सध्याची अवस्थादेखील फुलोरा व शेंगा लागण्याची आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकाचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पडत आहे व तापमानामध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे हलक्या जमिनीतील, माळरानावरील पिकांनी तर आता माना टाकून द्यायला सुरुवात झाली आहे.

महागडी खते, बी-बियाणे व औषधी वापरून जगविलेली पिके कोमेजून जात असलेली पाहून शेतकरी हतबल होत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.

उजनी परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळॆ परिसरातील नदी, नाले अजून कोरडेठाक आहेत. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकं कोमेजून जात आहेत.

- व्यंकटराव फड, शेतकरी, धसवाडी.

वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने सोयाबीन वाळत आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी सोयाबीन भिजविण्यासाठी रात्रंदिवस बेजार होत आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.

-विशाल मुंडे, शेतकरी, कुसळवाडी