शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीची, वेळेची बचत ठरू शकते जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST

बीड : जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांचे जाळे शहरालगत पसरले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी बायपास करण्यात आले आहेत. मात्र, लवकर पोहोचण्यासाठी ...

बीड : जिल्ह्यात सर्वत्र महामार्गांचे जाळे शहरालगत पसरले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी बायपास करण्यात आले आहेत. मात्र, लवकर पोहोचण्यासाठी राँग साईडने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण अपघात देखील घडले आहेत. मात्र, तरी देखील वाहनचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शार्टकटसाठी राँग साईडने जाणे महागात पडू शकते.

अनेकदा महामार्गावर राँग साईडने आल्यामुळे घडलेल्या अपघातांची संख्या जास्त आहे. तसेच भरधाव वेगातील वाहनांची जोरात धडक बसल्यामुळे यात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील जास्तीचे आहे. कारण एका बाजूने वाहतूक असल्यामुळे, मोठ्या वाहन चालकांचे, राँग साईडने कोण येतोय याकडे जास्त लक्ष नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

...

या मार्गावर मोठ्या प्रमाणात राँग साईड प्रवास

बीड बायपास रामनगर

बीड शहराजवळील धुळे-सोलापूर महामार्गावरील रामनगर येथून बीड शहरात येण्यासाठी थेट राँग साईडचा सर्रास वापर केला जातो. याच मार्गावर दुचाकीला अपघात होऊन दोघेजण ठार झाल्याची घटना ताजी आहे.

...

बीड बायपास पाली

धुळे-सोलापूर महामार्गावरील पाली येथून बिंदुसरा धरणाकडे जाण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाईडचा वापर करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

...

पोलिसांचे दुर्लक्ष

शहरातील तहसील ते शाहूनगर आदर्श किंवा चाणक्यनगर भागात जाणारे राँग साईडने जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याकडे वाहतूक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष असते.

...

सुभाष रोड

सुभाष रोड भागात बाजारपेठ असल्यामुळे नेहमी मोठी गर्दी असते. याच ठिकाणी वाहने चुकीच्या पद्धतीने पार्क केल्यामुळे वाहनचालक राँग साईडचा वापर करतात. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होते.

...

जालना रोडवर सुसाट

जालना रोड भागात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मोंढा रोड भागात जाण्यासाठी व त्या दिशेने येण्यासाठी अनेक वाहनचालक राँग साईडने येतात. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते.

...

जनजागृतीची गरज

धुळे - सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी बायपास करण्यात आलेले आहेत. मात्र, या परिसरातील वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत जनजागृती करणे गरजेचे आहे.

...

२०२१ मेपर्यंतचे अपघात २८२

जखमी १८०

मृत्यू १६०

राँग साईडमुळे झालेले अपघात ५५

मृत्यू ४५

जखमी ६५

..

महामार्ग पोलिसांकडून फक्त दंड वसुली

महामार्गावर वाहन चालकांकडून नियमांचे पालन व्हावे हे देखील महामार्ग पोलिसांचे काम आहे. मात्र, याकडे पूर्णत: दुर्लक्ष करून फक्त मोठी वाहने रस्त्यात कुठेही थांबवून अडवली जातात. त्यांच्याकडून विविध कारणांवरून दंड आकारला जातो. तसेच महामार्गावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनचालकांकडे तर, एक प्रकारचा पास आहे का ते पाहिले जाते व सोडून दिले जाते. ती एक प्रकारची अनधिकृत वसुलीच असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.