शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

कृषी कार्यालयातील अपु-या कर्मचारी संख्यने माजलगावात शेतक-यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:47 IST

माजलगाव तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत.

ठळक मुद्देमागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार

माजलगांव ( बीड ), दि. १३ : तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. तसेच यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर देखील अतिरिक्त कामाचा ताण मोठया प्रमाणावर वाढला आहे. 

माजलगांव तालुका बीड जिल्हयातील सधन शेतक-यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील तालुका कृषी कार्यालयात मोठया प्रमाणावर शेतकरी विविध कामासाठी येतात. यासोबतच शेतक-यांना कृषी कर्मच्या-यांची फिल्डवरील अनेक कामांसाठी मदतची आवश्यकता असते. यात शेतक-यांना पिकांच्या संदर्भात योग्य माहिती देणे, नवनविन शेती औजारांबाबत शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मातीच्या गुणवत्तेनुसार कोणती पिके घ्यावीत या बाबत माहिती देणे तसेच इतर विविध प्रकारे शेतक-यांना माहिती पुरविणे त्यांच्या अडचणी दुर करणे तसेच शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोंच करणे अशी विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र, या कार्यालयात मागील दोन वर्षांपासुन कर्मचा-यांची संख्या अपुरी आहे. मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार चालवावा लागतो. 

अपु-या कर्मच्या-यांवरच मदार  यातच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसतांना यातील अनेक कर्मचारी अनुपस्थित राहतात. त्यामुळे शेतक-यांना आपली कामे करुन घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कार्यालयात तालुका कृषि अधिकारी 1 पद रिक्त आहे, मंडळ अधिका-यांच्या तीन जागा असुन तिनही जागा रिक्त आहेत, पर्यवेक्षकांच्या सात जागांपैकी तीन जागा रिक्त आहेत, कृषि सहाययकाच्या 37 जागांपैकी 22 जागा रिक्त आहेत , कारकुनाच्या 2 जागांपैकी दोन्ही जागा रिक्त आहेत तर शिपायाच्या 5 जागांपैकी 3 जागा रिक्त आहेत. 

माजलगाव कृषि कार्यालयांतर्गत सद्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांपैकी ब-याच कर्मचा-यांकडे इतर ठिकाणचे देखील चार्ज आहेत त्यांना ज्या ठिकाणचे चार्ज आहेत तेथे देखील वेळ द्यावा लागतो त्यामुळे माजलगांवचे कार्यालय हे अत्यल्प कर्मचा-यांवर सद्या चालु असल्यामुळे कृषि कार्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. या ठिकाणी कर्मचा-यांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात येवून कारभार सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे. 

आहे त्या कर्माचा-यांवर काम सुरु आहे कार्यालयाकडुन दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचा-यांबाबत अहवाल पाठविण्यात येतो. सध्या आम्ही आहे तेवढया कर्मचा-यांवरच कार्यालयाचे संपुर्ण काम करुन घेत आहोत.- एस.एम. काळेल, प्रभारी तालुका कृषि अधिकारी