शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयातील अपु-या कर्मचारी संख्यने माजलगावात शेतक-यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 17:47 IST

माजलगाव तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत.

ठळक मुद्देमागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार

माजलगांव ( बीड ), दि. १३ : तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. तसेच यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर देखील अतिरिक्त कामाचा ताण मोठया प्रमाणावर वाढला आहे. 

माजलगांव तालुका बीड जिल्हयातील सधन शेतक-यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील तालुका कृषी कार्यालयात मोठया प्रमाणावर शेतकरी विविध कामासाठी येतात. यासोबतच शेतक-यांना कृषी कर्मच्या-यांची फिल्डवरील अनेक कामांसाठी मदतची आवश्यकता असते. यात शेतक-यांना पिकांच्या संदर्भात योग्य माहिती देणे, नवनविन शेती औजारांबाबत शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मातीच्या गुणवत्तेनुसार कोणती पिके घ्यावीत या बाबत माहिती देणे तसेच इतर विविध प्रकारे शेतक-यांना माहिती पुरविणे त्यांच्या अडचणी दुर करणे तसेच शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोंच करणे अशी विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र, या कार्यालयात मागील दोन वर्षांपासुन कर्मचा-यांची संख्या अपुरी आहे. मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार चालवावा लागतो. 

अपु-या कर्मच्या-यांवरच मदार  यातच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसतांना यातील अनेक कर्मचारी अनुपस्थित राहतात. त्यामुळे शेतक-यांना आपली कामे करुन घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कार्यालयात तालुका कृषि अधिकारी 1 पद रिक्त आहे, मंडळ अधिका-यांच्या तीन जागा असुन तिनही जागा रिक्त आहेत, पर्यवेक्षकांच्या सात जागांपैकी तीन जागा रिक्त आहेत, कृषि सहाययकाच्या 37 जागांपैकी 22 जागा रिक्त आहेत , कारकुनाच्या 2 जागांपैकी दोन्ही जागा रिक्त आहेत तर शिपायाच्या 5 जागांपैकी 3 जागा रिक्त आहेत. 

माजलगाव कृषि कार्यालयांतर्गत सद्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांपैकी ब-याच कर्मचा-यांकडे इतर ठिकाणचे देखील चार्ज आहेत त्यांना ज्या ठिकाणचे चार्ज आहेत तेथे देखील वेळ द्यावा लागतो त्यामुळे माजलगांवचे कार्यालय हे अत्यल्प कर्मचा-यांवर सद्या चालु असल्यामुळे कृषि कार्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. या ठिकाणी कर्मचा-यांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात येवून कारभार सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे. 

आहे त्या कर्माचा-यांवर काम सुरु आहे कार्यालयाकडुन दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचा-यांबाबत अहवाल पाठविण्यात येतो. सध्या आम्ही आहे तेवढया कर्मचा-यांवरच कार्यालयाचे संपुर्ण काम करुन घेत आहोत.- एस.एम. काळेल, प्रभारी तालुका कृषि अधिकारी