आष्टी : तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ६५ वर्षीय महिला देऊळगाव घाट येथे विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भामाबाई ज्ञानदेव गायकवाड (वय ६५, रा.मिरी ता. पाथर्डी, जि.अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते १४ तारखेच्या ४ वाजेदरम्यान आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील रसाळ यांच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याबाबत पोलीस पाटील यांनी माहिती दिली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी भेट दिली. पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. देवडे हे करत आहेत.
देऊळगाव घाट येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST