शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दोन महिन्यांतच स्वच्छता ठेकेदाराने मान टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:39 IST

माजलगाव : येथील नगरपालिकेने नोव्हेंबरमध्ये शहरातील स्वच्छतेचे टेंडर औरंगाबाद येथील कंपनीला दिले होते. दोन महिने सुरळीत चालू ...

माजलगाव : येथील नगरपालिकेने नोव्हेंबरमध्ये शहरातील स्वच्छतेचे टेंडर औरंगाबाद येथील कंपनीला दिले होते. दोन महिने सुरळीत चालू असलेल्या या टेंडरवाल्याने अचानक मान टाकली. विविध भागांत दररोज जाणारी वाहने आता कधीतरी जात असल्याने, शहरात घरोघरी व जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. यामुळे नगरपालिकेचे करोडो रुपये कचऱ्यात जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

माजलगाव नगरपालिकेने ३-४ महिन्यांपूर्वी स्वच्छतेसह विविध कामांचे ऑनलाइन टेंडर काढले होते. स्वच्छतेचे टेंडर २ कोटी २३ लाख ८० हजार ९७६ रुपयांचे होते. ते औरंगाबाद येथील एका व्यक्तीने ३६ लाख रुपये मायनस म्हणजे १ कोटी ८७ लाख ७७ हजार ६३८ रुपयांना घेतले होते. स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेआधीच शहरातील स्वच्छतेची वर्क ऑर्डर २ नोव्हेंबर रोजी देण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ठेकेदाराच्या यंत्रणेने दररोज दारोदारी जाऊन कचरा गोळा केला. शहरातील जागोजागची स्वच्छता करत नाल्यांची सफाई केली. मात्र, महिना-दीड महिना उलटताच, संबंधित ठेकेदाराने यंत्रणेत कपात करणे सुरू केले. त्यामुळे दररोज दारात येणारी वाहने कधीतरी येऊ लागली. नाल्या जागोजागी तुंबलेल्या दिसत असून कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत.

सकाळी व संध्याकाळी कचरा गोळा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाडीत चालकासोबत एका सहकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्या व्यक्तीने नागरिकांच्या हातातील डबा घेऊन, तो घंटागाडीत टाकणे आवश्यक असताना, संबंधित कर्मचारी घंटागाडीतच बसून राहतात. घंटागाड्यात तक्रार पुस्तकही ठेवलेले नाही. यामुळे तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांपुढे आहे.

३६ लाखांचा मलिदा वाटताच यंत्रणा झाली कमी

या गुत्तेदाराने ३६ लाखांनी मायनस टेंडर भरून घेतले. संबंधित गुत्तेदाराने काम सुरू केल्यानंतर काही पदाधिकारी त्याला त्रास देऊ लागल्याने, त्याला काम करणे अवघड झाले होते. गुत्तेदार व पदाधिकाऱ्यांत काही व्यक्तींनी मध्यस्थी करत, या सर्वांना ३६ लाखांचा मलिदा वाटल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे. यामुळे संबंधित गुतेदाराने यंत्रणा कमी करत, ११९ कामगारांवरून ती संख्या ६०पर्यंत आणल्याने घाण पुन्हा घर करताना दिसत आहे.

संबंधित गुत्तेदाराला अनेक वेळा समजावून सांगण्यात आले आहे. त्याने सुरळीत काम केले नाही, तर त्याला दिलेल्या टेंडरबाबत विचार करण्यात येईल.

- शेख मंजूर, नगराध्यक्ष

फोटो ओळी

माजलगाव नगरपालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून टेंडर काढूनही जागोजागी घाण दिसू लागली असून, गटारीही तुंबल्या आहेत, तर घंटा गाडीत कर्मचारी लावलेले असताना, नागरिकांनाच कचरा टाकण्याची वेळ आली आहे.