शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्याची परंपरा यावेळीही राहील कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:28 IST

सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड लोकसभा मतदार संघाच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीवर दृष्टीक्षेप टाकला असता ...

ठळक मुद्देबीड लोकसभा मतदार संघ निवडणूक २००९। २०१४ : गोपीनाथरावांना सर्वच विधानसभा मतदारसंघांनी दिली होती आघाडी

सतीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदार संघाच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीवर दृष्टीक्षेप टाकला असता दोन्हीही वेळेस सहाच्या सहा विधानसभा मतदार संघाने भाजपाचे उमेदवार गोपीनाथराव मुंडे यांना मताधिक्य दिले आहे. २०१४ पोटनिवडणुकीत तर भाजपाच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी जवळपास सात लाखांच्या विक्रमी मताधिक्याने काँगे्रसचे अशोकराव पाटील यांचा पराभव केला होता.१९९६ पासून २०१४ च्या पोटनिवडणुकीसह सात लोकसभेसाठी निवडणुका झाल्या. २००४ चा अपवाद वगळला तर सहा निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. यावरून बीड मतदार संघावर भाजपाचा दबदबा दिसून येतो.शक्यतो ज्या विधानसभा मतदार संघातील उमेदवार असतो, सहसा त्या विधानसभा मतदार संघात त्या उमेदवारास इतर मतदार संघांच्या तुलनेत थोडी मते अधिक पडतात. २००९ मध्ये परळीने गोपीनाथरावांना ४३,७४८ मतांची आघाडी दिली होती परंतु, मोदी लाट असतानाही २०१४ मध्ये हे मताधिक्य २५ हजारांपर्यंत घसरले होते. कारण सख्खा पुतण्या धनंजय मुंडे हे त्यांच्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेससोबत होते.याउलट २००९ मध्ये राकाँचे रमेश आडसकर यांना केज मतदार संघात मताधिक्य मिळाले नसले तरी मुंडेंना त्यांनी रोखले होते. केजमध्ये मुंडेंना साडेनऊ हजारच मताधिक्य मिळाले. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये राकाँचे सुरेश धस यांनाही त्यांच्या आष्टी मतदार संघात आघाडी मिळाली नसली तरी त्यांनी मुंडेना रोखले होते. २००९ मध्ये आष्टीने मुंडेंना ३९ हजारांचे मताधिक्य होते ते १४ मध्ये ८ हजारांवर आले होते. याउलट मुंडेंनी २०१४ मध्ये केज मतदार संघात आपले मताधिक्य ३२ हजारांपर्यंत वाढविले होते.आता राकाँचे बजरंग सोनवणे हे केज मतदार संघात किती मते घेतात याबद्दल उत्सुकता आहे कारण यावेळी रमेश आडसकर, आ.सुरेश धस हे त्यावेळेसचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आता भाजपात असून डॉ. प्रीतम मुंडे यांची प्रचार यंत्रणा राबवित आहेत.चित्र बदलेल का? कसे?२००९ मध्ये भाजपासोबत माजी आ. अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे तर राकाँकडून माजी आ. प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.धोंडे, आ.क्षीरसागर होते.२०१४ भाजपासोबत आ.भीमराव धोंडे तर राकाँकडून आ.अमरसिंह पंडित, आ. सुरेश धस, क्षीरसागर, धनंजय मुंडे, सोळंके असे मातब्बर होते.२०१९ मध्ये अमरसिंह, सोळंके, धनंजय तर भाजपाकडून धस, धोंडे, क्षीरसागर, बदामराव, भाजपाचे आमदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPoliticsराजकारण