शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा बहीण-भावाची शक्ती लागणार पणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST

बीड : नेहमी चर्चेत राहिलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या ...

बीड : नेहमी चर्चेत राहिलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या या बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या माजी मंत्री पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व आहे. २०१५ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस, रमेश आडसकर यांना सोबत घेऊन महायुती बनविली होतीण तर प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल रिंगणात उतरविले होते. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधून जयदत्त क्षीरसागर तर उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार निवडून आले होते. या ताकदीच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी २०१५ ची बँकेची निवडणूक जिंकताना राष्ट्रवादीतील गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलला होता. शीतल दिनकरराव कदम (बीड), संध्या दशरथ वनवे (शिरुर), सत्यभामा रामकृष्ण बांगर (शिरुर), ऋषिकेश प्रकाशराव देशमुख (आडसकर) (केज), साहेबराव पंढरीनाथ थोरवे (आष्टी) यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. १९ पैकी १६ जागा महायुतीने तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या.

यावेळी राज्यातील सत्तेची भाकरी फिरली आहे. त्यावेळी बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या, आता धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत. सत्ता बदलली तरी मतदार तेच आहेत. सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे तंत्रच वेगळे असते. आजही हे मतदार पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहेत. २०१५ मध्ये मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार जिंकले होते.

बीड जिल्हा बँकेत १३७५ मतदार असून, १९ संचालकांची ते निवड करणार आहेत. विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सत्ता ताब्यात घेतल्यापासून गेल्या पाच वर्षांत बँकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. प्रशासकाच्या काळात बँकेवर ३२७ कोटींचे कर्ज होते. गेल्या पाच वर्षांत हे कर्ज बेबाक केले आहे. बँकेची सध्या जवळपास १६०० कोटी रुपयांची उलाढाल आहे.