शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
6
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
7
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
8
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
9
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
10
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
11
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
12
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
13
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
14
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
15
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
16
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
17
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
18
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
19
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
20
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा बहीण-भावाची शक्ती लागणार पणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST

बीड : नेहमी चर्चेत राहिलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या ...

बीड : नेहमी चर्चेत राहिलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या या बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या माजी मंत्री पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व आहे. २०१५ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस, रमेश आडसकर यांना सोबत घेऊन महायुती बनविली होतीण तर प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल रिंगणात उतरविले होते. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधून जयदत्त क्षीरसागर तर उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार निवडून आले होते. या ताकदीच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी २०१५ ची बँकेची निवडणूक जिंकताना राष्ट्रवादीतील गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलला होता. शीतल दिनकरराव कदम (बीड), संध्या दशरथ वनवे (शिरुर), सत्यभामा रामकृष्ण बांगर (शिरुर), ऋषिकेश प्रकाशराव देशमुख (आडसकर) (केज), साहेबराव पंढरीनाथ थोरवे (आष्टी) यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. १९ पैकी १६ जागा महायुतीने तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या.

यावेळी राज्यातील सत्तेची भाकरी फिरली आहे. त्यावेळी बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या, आता धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत. सत्ता बदलली तरी मतदार तेच आहेत. सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे तंत्रच वेगळे असते. आजही हे मतदार पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहेत. २०१५ मध्ये मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार जिंकले होते.

बीड जिल्हा बँकेत १३७५ मतदार असून, १९ संचालकांची ते निवड करणार आहेत. विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सत्ता ताब्यात घेतल्यापासून गेल्या पाच वर्षांत बँकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. प्रशासकाच्या काळात बँकेवर ३२७ कोटींचे कर्ज होते. गेल्या पाच वर्षांत हे कर्ज बेबाक केले आहे. बँकेची सध्या जवळपास १६०० कोटी रुपयांची उलाढाल आहे.