शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

'आता शेती कराव की मराव'; ७२० किलो डाळींब विक्रीतून आले केवळ २३३ रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 18:41 IST

पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली.

- नितीन कांबळे 

कडा : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर बागा बहरल्या आहेत. अतिवृष्टीतही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागांची निगा राखल्याने फळ चांगली आहेत. मात्र, दर गडगडल्याने ७२० किलो डाळींबाची विक्री करून केवळ २३३ रुपये हाती आल्याने देवळाली येथील शेतकऱ्याने व्यथित मनाने 'शेती कराव की मराव' अशा भावना व्यक्त करत गावाची वाट धरली. 

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावची ओळख तशी पानमळ्याची आहे. पण पाणी नसल्याने पानमळे नामशेष झाली आणि आता फळबागाची मोठ्या प्रमाणावर लागवड असलेले गाव आहे. या गावातील रमेश डोके या सुशिक्षित शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी डाळींब तोडणी केली. यातील ७२० किलो डाळींब ३६ कॅरेटमध्ये घेऊन विक्रीसाठी ते सोलापूरच्या बाजारपेठेत गेले. येथे डाळींब विक्रीतून त्यांना 3933 रुपये मिळाले मात्र यातून 3000  रु गाडीभाडे, मापाडी हमाली 701 असे वजा होऊन केवळ 233 रूपयेच हाती आले. जीवाचे रान करून मोठ्या आशेने जपलेल्या डाळींबाच्या विक्रीतून तुटपुंजी रक्कम आल्याने खाली मान घालत डोळ्यातले पाणी व हुंदके लपवत डोके यांनी घराचा रस्ता धरला. पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली. पण फळाला योग्य भाव नसल्याने डोके यांना आर्थिक संकट दिसत आहे. यातूनच त्यांनी आता शेती कराव की मरव अशी व्यथा व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती